सातारा - खटाव तालुक्यातील धकटवाडी येथील जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव हे बीएसएफ जम्मू आणि काश्मीरमध्ये आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान, त्यांना १० जानेवारीला वीर मरण आले आहे. ज्ञानेश्वर यांचे पार्थिव काल शनिवारी विमानाने सहा वाजता पुणे येथे अणण्यात आले होते. तर, आज सकाळी आठ वाजता त्यांच्या मूळ गावी खटाव तालुक्यातील धकटवाडी येथे पार्थिव पोहोचले. जिल्ह्यातील हजारो नागरिक या ठिकाणी जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यांना काही वेळापूर्वी लष्करी इतमामात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
हेही वाचा- 'कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार'