ETV Bharat / state

तान्हाजी मालुसरेंचे जन्मगाव आजही वंचितच; चित्रपटावर ग्रामस्थ नाराज

author img

By

Published : Jan 14, 2020, 8:31 PM IST

Updated : Jan 17, 2020, 6:58 PM IST

गोडवली हे गाव पाचगणीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतर‍ावर टेबल लँडच्या कुशीत वसलेले आहे. या गावात आजही सुमारे ७० टक्के कुटुंब मालुसरे आडनाव‍ाची आहेत. गावात प्रवेश केल्यानंतर मध्यावर, वस्तीत मोकळे पटांगण दिसते. त्याला 'तानाजीचं परडं' असंही पडनाव आहे. याच जागेत पूर्वी तान्हाजी मालुसरे यांचे घर होते, असे गावातील वडीलधारी मंडळी सांगतात.

government not fulfilled basic facilities of tanhaji malusare native village in satara
तान्हाजी मालुसरेंचे जन्मगाव आजही दुर्लक्षितच...

सातारा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेतील वीर सरदार असलेले तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिटकडे वाटचाल याने वाटचाल केली, तर तेच दुसरीकडे तान्हाजी मालुसरे य‍ांचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली हे मुळगाव आजही विकासापासून दुर्लक्षित आहे. याचमुळेच गोडवलीचे ग्रामस्थ या चित्रपटावरही नाराज आहेत.

तान्हाजी मालुसरेंचे जन्मगाव आजही वंचितच...

गोडवली हे गाव पाचगणीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतर‍ावर, टेबल लँडच्या कुशीत वसलेले आहे. या गावात आजही सुमारे ७० टक्के कुटुंबे मालुसरे आडनाव‍ाची आहेत. गावात प्रवेश केल्यानंतर मध्यावर, वस्तीत मोकळे पटांगण दिसते. त्याला 'तानाजीचं परडं' असंही पडनाव आहे. याच जागेत पूर्वी तान्हाजी मालुसरे यांचे घर होते, असे गावातील वडीलधारी मंडळी सांगतात. ग्रामस्थांच्या पुढाकाराने पूर्वीच या ठिकाणी तान्हाजी मालुसरे यांचा अर्धाकृती पुतळा बसवला आहे.

हेही वाचा - 'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - हसन मुश्रीफ

इतिहासाचे अभ्यासक दत्ताजी नलवडे (रा. निगडे मोसे, ता. वेल्हे जि.पुणे) यांनी तान्हाजी मालुसरे यांचे गाव पुराव्यानिशी शोधून तान्हाजींवर पुस्तक लिहिले आहे. 'उमरठ ही तान्हाजी मालुसरे यांची कर्मभूमी तर गोडवली ही त्यांची जन्मभूमी आहे. त्यांचे बालपण याच गावात गेले. लहान वयातच त्यांचे वडील काळोजीराव मालुसरे निर्वतले. त्यांच्याकडे गावची पाटीलकी होती. तान्हाजी त्यावेळी 8-9 वर्षांचे तर त्याचा धाकटा भाऊ सुर्याजी 7 वर्षांचा असावा. सख्खे मामा शेलारमामा यांनी दोघांची जबाबदारी स्वीकारली आणि दोघ‍ांनाही घेऊन ते प्रतापगडाच्या पायथ्याला कुडपन या गावी गेले. शेलारमामांकडे काही काळ राहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तान्हाजींना गोडवलीची पाटीलकी दिली. तान्हाजी पुन्हा गोडोलीत गेले. नंतर त्यांना कोकण प्रांताची सुभेदारी देण्यात आली. त्याकाळात ते उमरठ येथे राहिले', अशी माहिती नलवडे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना दिली.

वाडकरांचा कागद उपलब्ध आहे. त्यामधील कैफीयतमध्ये 'मौजे गोडवली तान्हाजी मालुसरे मुकादम' असा उल्लेख आढळतो. अफजल खानाच्या वधाच्या नजिकच्या कालखंडातील हा कागद आहे. याचा अर्थ तान्हाजी मालुसरे पुन्हा गोडवलीला आले. खानाच्या वधानंतर स्वराज्य उभारणीच्या कामात ते शिवरायांसोबत सावलीसारखे राहिले. स्वराज्य‍ विस्ताराच्या कामात नरवीर तान्ह‍ाजी मालुसरे हे पहिले सुभेदार होते, असेही दत्ताजी नलवडे यांनी सांगितले आहे. मात्र, अजय देवगण य‍ांच्या चित्रपटात गोडोली गावाचा साधा उल्लेखही नाही. यामुळे गोडोलीचे सरपंच सुरेश तुकाराम मालुसरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटामुळे शासन आणि एकूणच समाजाचे गावाकडे लक्ष वेधले जाईल. तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यातून लोक प्रेरणा घेतील, अशा पद्धतीचे काम येथे उभे करता येईल अशी धारणा होती. मात्र, चित्रपटाने आम्हा ग्रामस्थांची मोठी निराशा केली, असेही सरपंच मालुसरे म्हणाले आहेत.

हेही वाचा - 'तान्हाजी' उत्तरप्रदेशमध्ये टॅक्स फ्री, काजोलने मानले सरकारचे आभार

ग्रामस्थांची मागणी -
गावाला जमीन असली तरी मुरमाड जमिनीमुळे बटाटे, वाटणा व स्ट्रॉबेरी ही मर्यादीतच पिके येतात. अल्प उत्पन्नामुळे रोजगार, व्यवसायासाठी लोक पाचगणीला जातात. या चित्रपटाच्या माध्यमातून गोडवली गावाचे नाव प्रकाशात यावे, अशी मागणी योगेश मालुसरे म्हणाले.

शिवसेनेच्या अधिपत्याखालील सरकारच्या माध्यमातून या गावात तान्हाजी मालुसरे यांच्या स्मृतींना उजाळा देणारे यथोचित स्मारक उभारण्यासाठी आम्ही ग्रामस्थ पाठपुर‍ावा करणार आहोत. यामुळे पर्यटकांची पावले गावाकडे वळतील. तसेच पर्यटन विकासाला चालना मिळून रोजगार-व्यापार उदीम वाढेल, असे स्थानिक कार्यकर्ते संदीप मालुसरे म्हणाले.

सातारा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेतील वीर सरदार असलेले तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिटकडे वाटचाल याने वाटचाल केली, तर तेच दुसरीकडे तान्हाजी मालुसरे य‍ांचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली हे मुळगाव आजही विकासापासून दुर्लक्षित आहे. याचमुळेच गोडवलीचे ग्रामस्थ या चित्रपटावरही नाराज आहेत.

तान्हाजी मालुसरेंचे जन्मगाव आजही वंचितच...

गोडवली हे गाव पाचगणीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतर‍ावर, टेबल लँडच्या कुशीत वसलेले आहे. या गावात आजही सुमारे ७० टक्के कुटुंबे मालुसरे आडनाव‍ाची आहेत. गावात प्रवेश केल्यानंतर मध्यावर, वस्तीत मोकळे पटांगण दिसते. त्याला 'तानाजीचं परडं' असंही पडनाव आहे. याच जागेत पूर्वी तान्हाजी मालुसरे यांचे घर होते, असे गावातील वडीलधारी मंडळी सांगतात. ग्रामस्थांच्या पुढाकाराने पूर्वीच या ठिकाणी तान्हाजी मालुसरे यांचा अर्धाकृती पुतळा बसवला आहे.

हेही वाचा - 'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - हसन मुश्रीफ

इतिहासाचे अभ्यासक दत्ताजी नलवडे (रा. निगडे मोसे, ता. वेल्हे जि.पुणे) यांनी तान्हाजी मालुसरे यांचे गाव पुराव्यानिशी शोधून तान्हाजींवर पुस्तक लिहिले आहे. 'उमरठ ही तान्हाजी मालुसरे यांची कर्मभूमी तर गोडवली ही त्यांची जन्मभूमी आहे. त्यांचे बालपण याच गावात गेले. लहान वयातच त्यांचे वडील काळोजीराव मालुसरे निर्वतले. त्यांच्याकडे गावची पाटीलकी होती. तान्हाजी त्यावेळी 8-9 वर्षांचे तर त्याचा धाकटा भाऊ सुर्याजी 7 वर्षांचा असावा. सख्खे मामा शेलारमामा यांनी दोघांची जबाबदारी स्वीकारली आणि दोघ‍ांनाही घेऊन ते प्रतापगडाच्या पायथ्याला कुडपन या गावी गेले. शेलारमामांकडे काही काळ राहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तान्हाजींना गोडवलीची पाटीलकी दिली. तान्हाजी पुन्हा गोडोलीत गेले. नंतर त्यांना कोकण प्रांताची सुभेदारी देण्यात आली. त्याकाळात ते उमरठ येथे राहिले', अशी माहिती नलवडे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना दिली.

वाडकरांचा कागद उपलब्ध आहे. त्यामधील कैफीयतमध्ये 'मौजे गोडवली तान्हाजी मालुसरे मुकादम' असा उल्लेख आढळतो. अफजल खानाच्या वधाच्या नजिकच्या कालखंडातील हा कागद आहे. याचा अर्थ तान्हाजी मालुसरे पुन्हा गोडवलीला आले. खानाच्या वधानंतर स्वराज्य उभारणीच्या कामात ते शिवरायांसोबत सावलीसारखे राहिले. स्वराज्य‍ विस्ताराच्या कामात नरवीर तान्ह‍ाजी मालुसरे हे पहिले सुभेदार होते, असेही दत्ताजी नलवडे यांनी सांगितले आहे. मात्र, अजय देवगण य‍ांच्या चित्रपटात गोडोली गावाचा साधा उल्लेखही नाही. यामुळे गोडोलीचे सरपंच सुरेश तुकाराम मालुसरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटामुळे शासन आणि एकूणच समाजाचे गावाकडे लक्ष वेधले जाईल. तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यातून लोक प्रेरणा घेतील, अशा पद्धतीचे काम येथे उभे करता येईल अशी धारणा होती. मात्र, चित्रपटाने आम्हा ग्रामस्थांची मोठी निराशा केली, असेही सरपंच मालुसरे म्हणाले आहेत.

हेही वाचा - 'तान्हाजी' उत्तरप्रदेशमध्ये टॅक्स फ्री, काजोलने मानले सरकारचे आभार

ग्रामस्थांची मागणी -
गावाला जमीन असली तरी मुरमाड जमिनीमुळे बटाटे, वाटणा व स्ट्रॉबेरी ही मर्यादीतच पिके येतात. अल्प उत्पन्नामुळे रोजगार, व्यवसायासाठी लोक पाचगणीला जातात. या चित्रपटाच्या माध्यमातून गोडवली गावाचे नाव प्रकाशात यावे, अशी मागणी योगेश मालुसरे म्हणाले.

शिवसेनेच्या अधिपत्याखालील सरकारच्या माध्यमातून या गावात तान्हाजी मालुसरे यांच्या स्मृतींना उजाळा देणारे यथोचित स्मारक उभारण्यासाठी आम्ही ग्रामस्थ पाठपुर‍ावा करणार आहोत. यामुळे पर्यटकांची पावले गावाकडे वळतील. तसेच पर्यटन विकासाला चालना मिळून रोजगार-व्यापार उदीम वाढेल, असे स्थानिक कार्यकर्ते संदीप मालुसरे म्हणाले.

Intro:तान्हाजी मालुसरेंचे जन्मगाव दुर्लक्षित !
देवगणच्या चित्रपटावर ग्रामस्थ नाराज

सातारा : नुकताच प्रदर्शित झालेला व अजय देवगणची मुख्य़ भूमिका असलेला 'तान्हाजी द अनसंग वाॅरिअर' हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सुपर-डुपर हिटकडे वाटचाल करत असला तरी तान्हाजी मालुसरे य‍ांचे मुळगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील गोडवलीचे ग्रामस्थ या चित्रपटावर नाराज आहेत. यव चित्रपटाने निराशा केली. नरवीर त‍ान्हाजी मालुसरे यांचे मुळगाव दुर्लक्षित राहिल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
Body:पाचगणीपासून सुमारे 3 किलोमिटर अंतर‍ावर, टेबल लँडच्या कुशीत वसलेले गाव म्हणजे गोडवली. या गावात आजही सुमारे ७० टक्के कुटुंबे मालुसरे आडनाव‍ाची आहेत. गावात प्रवेश केल्यानंतर मध्यावर, वस्तीत मोकळे पटांगण दिसते. त्याला 'तानाजीचं परडं' असंही पडनाव आहे. याच जागेत पुर्वी तान्हाजी मालुसरे यांचे घर होते, असे गावातील बुजुर्ग मंडळी सांगतात. ग्रामस्थांच्या पुढाकाराने पुर्वीच या ठिकाणी तान्हाजी मालुसरे यांचा अर्धाकृती पुतळा बसवला आहे.

इतिहासाचे अभ्यासक दत्ताजी नलवडे (रा. निगडे मोसे, ता. वेल्हे जि.पुणे) यांनी तान्हाजी मालुसरे यांचे गाव पुराव्यांनिशी शोधून तान्हाजींवर पुस्तक लिहिले आहे. 'ईटिव्हीशी' बोलताना ते म्हणाले "उमरठ ही तान्हाजी मालुसरे यांची कर्म भुमी तर गोडवली ही त्यांची जन्मभुमी. त्यांचे बालपण याच गावात गेले. लहान वयातच वडील काळोजीराव मालुसरे निर्वतले. त्यांच्याकडे गावची पाटीलकी होती. तान्हाजी त्यावेळी 8-9 वर्षांचे तर त्याचा धाकटा भाऊ सुर्याजी 7 वर्षांचा असावा. सख्खे मामा शेलारमामा यांनी दोघांची जबाबदारी स्विकारली व दोघ‍ांनाही घेऊन ते प्रतापगडाच्या पायथ्याला कुडपन या गावी गेले. शेलारमामांकडे काही काळ राहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तान्हाजींना गोडवलीची पाटीलकी दिली. तान्हाजी पुन्हा गोडोलीत गेले. नंतर त्यांना कोकण प्रांताची सुभेदारी देण्यात आली. त्याकाळात ते उमरठ येथे राहिले. पुढचा इतिहास सर्वांना माहित आहे."

वाडकरांचा कागद उपलब्ध आहे. त्यामधील कैफीयतीमध्ये 'मौजे गोडवली तान्हाजी मालुसरा मुकादम' असा उल्लेख आढळतो. अफजल खानाच्या वधाच्या नजिकच्या कालखंडातील हा कागद आहे. याचा अर्थ तान्हाजी मालुसरे पुन्हा गोडवलीला आले. खानाच्या वधानंतर स्वराज्य उभारणीच्या कामात ते शिवरायांसोबत सावलीसारखे राहिले. स्वराज्य‍ विस्ताराच्या कामात नरवीर तान्ह‍ाजी मालुसरे हे पहिले सुभेदार होते," असेही दत्ताजी नलवडे यांनी स्पष्ट केले.

अजय देवगण य‍ांच्या चित्रपटात गोडोली गावाचा साधा उल्लेखही नसल्याने गोडोलीचे सरपंच सुरेश तुकाराम मालुसरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. "या चित्रपटामुळे शासन व एकूणच समाजाचे गावाकडे लक्ष वेधले जाईल. तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यातून लोक प्रेरणा घेतील, अशा पद्धतीचे काम येथे उभे करता येईल अशी धारणा होती. परंतू चित्रपटाने आम्हा ग्रामस्थांची मोठी निराशा केली" असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्थ‍ानिक कार्यकर्ते संदीप मालुसरे म्हणाले की "शिवसेनेच्या अधिपत्याखालील सरकारच्या माध्यमातून या गावात तान्हाजी मालुसरे यांच्या स्मृतींना उजाळा देणारे यथोचित स्मारक उभारण्यासाठी आम्हीं ग्रामस्थ पाठपुर‍ावा करु. त्यामुळे पर्यटकांची पावले गावाकडे वळतील. पर्यटन विकासाला चालना मिळून रोजगार-व्यापार उदीम वाढेल."

"गावाला जमिन असलीतरी मुरमाड जमिनीमुळे बटाटे, वाटणा व स्टाॅबेरी ही मर्यादीतच पिके येतात. अल्प उत्पन्नामुळे रोजगार, व्यवसायासाठी लोक पाचगणीला जातात. या चित्रपटाच्या माध्यमातून गोडवली गावाचे नाव प्रकाशात यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ योगेश मालुसरे यांनी व्यक्त केली.
____________________
कॅप्शन

बोलताना स्थानिक कार्यकर्ते संदीप मालुसरे
Conclusion:
Last Updated : Jan 17, 2020, 6:58 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.