ETV Bharat / state

उद्योजकांनी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्यावे.. शंभूराज देसाई यांचे आवाहन

author img

By

Published : Jun 16, 2020, 12:20 AM IST

जिल्ह्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

shambhuraj-desai
शंभूराज देसाई

सातारा- कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊमुळे उद्योग, व्यवसाय बंद पडल्याने परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात गेले आहेत. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. पण सध्या मजूर नसल्याने कामगारांची कमतरता भासत आहे. यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांनी भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले आहे.

जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गृह राज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे.जगदाळे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, सचिन जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.


जिल्ह्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करुन देसाई पुढे म्हणाले की, एमआयडीसींमध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणात कामावर होते. ते आता आपल्या राज्यात निघून गेले आहेत. त्यांच्या जागी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या. एमआयडीसीतील उद्योजकांबरोबर लवकरच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घेऊन बैठक घेतली जाईल, आणि जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील.

एमआयडीसीतील उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाईल. 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगांना कुशल कामगार मिळतील. कामगार विभागाने व उद्योग विभागाने उद्योगांना किती कुशल कामगारांची गरज आहे, याची नोंदणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत केल्या आहेत.

सातारा- कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊमुळे उद्योग, व्यवसाय बंद पडल्याने परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात गेले आहेत. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. पण सध्या मजूर नसल्याने कामगारांची कमतरता भासत आहे. यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांनी भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले आहे.

जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गृह राज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे.जगदाळे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, सचिन जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.


जिल्ह्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करुन देसाई पुढे म्हणाले की, एमआयडीसींमध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणात कामावर होते. ते आता आपल्या राज्यात निघून गेले आहेत. त्यांच्या जागी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या. एमआयडीसीतील उद्योजकांबरोबर लवकरच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घेऊन बैठक घेतली जाईल, आणि जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील.

एमआयडीसीतील उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाईल. 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगांना कुशल कामगार मिळतील. कामगार विभागाने व उद्योग विभागाने उद्योगांना किती कुशल कामगारांची गरज आहे, याची नोंदणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.