ETV Bharat / state

'एलदिलानं काम केल्यास जिल्ह्यात कमळ उगवणार नाही' - एलदिलानं काम केल्यास जिल्ह्यात कमळ उगवणार नाही

जिल्ह्यात काँग्रेसची एकजूट झाल्यास जिल्ह्यात कमळ उगवणार नाही, असा विश्वास कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्याच्या गतिमान विकासासाठी एकदिलाने काम करू, असेही कदम म्हणाले. सांगलीमध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी विश्वजीत कदम बोलत होते.

vishwajeet kadam comment on bjp in sangli
कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम
author img

By

Published : Jan 25, 2020, 9:14 AM IST

सांगली - जिल्ह्यात काँग्रेसची एकजूट झाल्यास जिल्ह्यात कमळ उगवणार नाही, असा विश्वास कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्याच्या गतीमान विकासासाठी एकदिलाने काम करु असेही कदम म्हणाले. सांगलीमध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी विश्वजीत कदम बोलत होते.

राज्याच्या कृषी व सहकार राज्यमंत्रीपदी पलूस-कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची निवड झाली. या निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्हा काँग्रेसकडून मंत्री विश्वजीत कदम यांचा सांगलीत भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. या सत्काराच्या निमित्ताने मंत्री विश्वजित कदम यांची सांगलीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेसीबीने कदम यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर शहरातील स्टेशन चौक या ठिकाणी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम

लागेल तो विकासनिधी देणार
जिल्ह्याच्या विकासासाठी लागेल तेवढी नीधी देणार आहे. विकासासाठी सर्व जीती धर्माच्या, सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे विश्वजीत कदम म्हणाले. सांगलीमध्ये विकासाची काम आणणार असल्याचेही कदम म्हणाले.

सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते व वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि मंत्री विश्वजित कदम यांच्या टोलेबाजी रंगल्याचे पाहायला मिळाले.

सांगली - जिल्ह्यात काँग्रेसची एकजूट झाल्यास जिल्ह्यात कमळ उगवणार नाही, असा विश्वास कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्याच्या गतीमान विकासासाठी एकदिलाने काम करु असेही कदम म्हणाले. सांगलीमध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी विश्वजीत कदम बोलत होते.

राज्याच्या कृषी व सहकार राज्यमंत्रीपदी पलूस-कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची निवड झाली. या निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्हा काँग्रेसकडून मंत्री विश्वजीत कदम यांचा सांगलीत भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. या सत्काराच्या निमित्ताने मंत्री विश्वजित कदम यांची सांगलीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेसीबीने कदम यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर शहरातील स्टेशन चौक या ठिकाणी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम

लागेल तो विकासनिधी देणार
जिल्ह्याच्या विकासासाठी लागेल तेवढी नीधी देणार आहे. विकासासाठी सर्व जीती धर्माच्या, सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे विश्वजीत कदम म्हणाले. सांगलीमध्ये विकासाची काम आणणार असल्याचेही कदम म्हणाले.

सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते व वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि मंत्री विश्वजित कदम यांच्या टोलेबाजी रंगल्याचे पाहायला मिळाले.

Intro:File name - mh_sng_01_mantri_kadam_satkar_sohala_vis_01_7203751 - to - mh_sng_01_mantri_kadam_satkar_sohala_byt_03_7203751


स्लग - एलदिलाने काम करू कमळ उगवणार पण नाही - राज्यमंत्री विश्वजीत कदम.

अँकर - काँग्रेस एकजूट झाल्यास जिल्ह्यात कमळ उगवणार नाही,असा विश्वास कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्ह्यातील काँग्रेस बळकट व जिल्ह्याचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाहीही मंत्री कदम यांनी दिली आहे.सांगली मध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.Body:राज्याच्या कृषी व सहकार राज्यमंत्री पदी पलूस कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची निवड झाली आहे .या निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्हा काँग्रेस कडून मंत्री विश्वजीत कदम यांचा सांगलीत भव्य नागरी सत्कार सोहळा मंगळवारी पार पडला.या सत्काराच्या निमित्ताने मंत्री विश्वजित कदम यांची सांगलीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी जेसीबीने कदम यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.त्यानंतर शहरातील स्टेशन चौक या ठिकाणी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा पार पडला.यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीकाँग्रेस आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते व वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि मंत्री विश्वजित कदम यांच्या टोलेबाजी रंगली. विशाल पाटील यांनी आपल्या भाषणा दरम्यान स्वर्गीय पतंगराव कदम यांचा उल्लेख आंब्याचे झाड असे करत आंब्याच्या झाडाला आम्ही दगड मारत होतो,आणि आम्हाला आंब्याचा गोडवा मिळत असे,आज आंब्याच्या वृक्षाच्या पोटी विश्‍वजित कदम यांच्या रुपाने आंब्याचा वृक्ष आलेले आहे.आणि या आंब्याच्या झाडाला आम्ही दगड मारलेली आहेत,पण आता या आंब्याचा गोडवा आम्हाला मिळावा,अशी अपेक्षा व्यक्त केली.

बाईट - विशाल पाटील - युवा नेते ,सांगली.

तर विशाल पाटील यांच्या भाषणाचा धागा पकडत विश्वजीत कदम यांनी बोलताना आंब्याच्या झाडाला दगड मारला,तर वर गेलेला दगड शेवटी खाली येऊन तुमच्यावरच पडतो.त्यामुळे विशाल पाटील तुम्ही आता दगड मारणे बंद करा,असा सल्ला यावेळी विश्वजीत कदम यांनी दिला.

बाईट - विश्वजीत कदम - राज्यमंत्री कृषी व सहकार.

त्याचबरोबर जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत जनतेच्या समस्या आहेत.त्या सोडवण्यासाठी एकदिलाने काम करण्याची गरज आहे,आणि एकजूट होऊन काम केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक गतीने होईल आणि कुणीच माईका लाल ? कुठले कमळही जिल्ह्यात उगवणार नाही,असा विश्वास यावेळी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

बाईट - विश्वजीत कदम - राज्यमंत्री कृषी व सहकार. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.