ETV Bharat / state

मंत्रिमंडळाची एक तरी बैठक रायगडावर घ्या- खासदार छत्रपती संभाजीराजे

author img

By

Published : Oct 26, 2019, 9:03 PM IST

छत्रपती उदयनराजे यांचा बंधू या नात्याने त्यांचा पराभव म्हणजे तो आमचा पण पराभव आहे. या पराभवचे मनापासून आम्हाला पण दुःख वाटत आहे. पण सुख आणि दुःख बघण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे. आजचा पराभव हा उद्या विजयाकडे कसा नेता येईल, याचा उदयनराजे नक्की विचार करत असतील.

मंत्रिमंडळाची एक तरी बैठक रायगडावर घ्या; उदयनराजेच्या पराभवाचे आम्हालाही दुःख - खासदार छत्रपती संभाजीराजे

सांगली - राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाची एक तरी बैठक ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर व्हावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच उदयनराजेंच्या पराभवाचे आम्हालाही दुःख आहे. या पराभवाचा ते नक्कीच विचार करतील, असा विश्वासही खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीच्या कवलापूर येथे बोलत होते.

मंत्रिमंडळाची एक तरी बैठक रायगडावर घ्या; उदयनराजेच्या पराभवाचे आम्हालाही दुःख - खासदार छत्रपती संभाजीराजे

सांगलीच्या कवलापूर मधील स्वराज्य दौलत दुर्गनाद प्रतिष्ठानने पन्हाळा गडाची प्रतिकृती साकारली आहे. या किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संभाजीराजे कवलापूरमध्ये आले होते. या उद्घाटानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, छत्रपती उदयनराजे यांचा बंधू या नात्याने उदयनराजे यांचा पराभव म्हणजे तो आमचा पण पराभव आहे. या पराभवचे मनापासून आम्हाला पण दुःख वाटत आहे. पण सुख आणि दुःख बघण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे. आजचा पराभव हा उद्या विजयाकडे कसा नेता येईल, याचा उदयनराजे नक्की विचार करत असतील, असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - VIDEO: महाराष्ट्राच्या जनादेशाचे सविस्तर विश्लेषण...

पद हा एक भाग आहे. मात्र, छत्रपतींची पदवी ही महत्वाची असते. रयतेची सेवा करणे ही छत्रपती घराण्याची परंपरा आहे. उदयनराजे पुन्हा एकदा नव्या जोमाने काम सुरू करतील आणि या पराभवातून ते बाहेर पडतील, असा विश्वास संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. त्याच बरोबर राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळाला उद्देशुन बोलताना गावाचा विकास करायचा असेल तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्यायला हवे. त्यासाठी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हायला पाहिजे. फक्त जय जयकार करून चालणार नाही. मंत्रिमंडळाची एक तरी कॅबिनेट बैठक रायगडावर घ्यावी, अशी विनंती नवीन होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपण करणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - 'सभागृह नेता' निवडण्यासाठी भाजपने बोलावली बैठक

खासदार आणि राजकीय नेता अशी माझी फक्त ओळख असण्याऐवजी किल्ले संवर्धन करणारा, अशी माझी ओळख भविष्यात व्हावी. रायगड पूर्वी जसा होता तसा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 600 कोटी मंजूर केले आहेत. तर अन्य 10 किल्ल्यांसाठी आणखी 100 कोटी केंद्राकडून मिळणार आहेत. असेही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी स्पष्ट केले.

सांगली - राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाची एक तरी बैठक ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर व्हावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच उदयनराजेंच्या पराभवाचे आम्हालाही दुःख आहे. या पराभवाचा ते नक्कीच विचार करतील, असा विश्वासही खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीच्या कवलापूर येथे बोलत होते.

मंत्रिमंडळाची एक तरी बैठक रायगडावर घ्या; उदयनराजेच्या पराभवाचे आम्हालाही दुःख - खासदार छत्रपती संभाजीराजे

सांगलीच्या कवलापूर मधील स्वराज्य दौलत दुर्गनाद प्रतिष्ठानने पन्हाळा गडाची प्रतिकृती साकारली आहे. या किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संभाजीराजे कवलापूरमध्ये आले होते. या उद्घाटानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, छत्रपती उदयनराजे यांचा बंधू या नात्याने उदयनराजे यांचा पराभव म्हणजे तो आमचा पण पराभव आहे. या पराभवचे मनापासून आम्हाला पण दुःख वाटत आहे. पण सुख आणि दुःख बघण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे. आजचा पराभव हा उद्या विजयाकडे कसा नेता येईल, याचा उदयनराजे नक्की विचार करत असतील, असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - VIDEO: महाराष्ट्राच्या जनादेशाचे सविस्तर विश्लेषण...

पद हा एक भाग आहे. मात्र, छत्रपतींची पदवी ही महत्वाची असते. रयतेची सेवा करणे ही छत्रपती घराण्याची परंपरा आहे. उदयनराजे पुन्हा एकदा नव्या जोमाने काम सुरू करतील आणि या पराभवातून ते बाहेर पडतील, असा विश्वास संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. त्याच बरोबर राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळाला उद्देशुन बोलताना गावाचा विकास करायचा असेल तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्यायला हवे. त्यासाठी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हायला पाहिजे. फक्त जय जयकार करून चालणार नाही. मंत्रिमंडळाची एक तरी कॅबिनेट बैठक रायगडावर घ्यावी, अशी विनंती नवीन होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपण करणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - 'सभागृह नेता' निवडण्यासाठी भाजपने बोलावली बैठक

खासदार आणि राजकीय नेता अशी माझी फक्त ओळख असण्याऐवजी किल्ले संवर्धन करणारा, अशी माझी ओळख भविष्यात व्हावी. रायगड पूर्वी जसा होता तसा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 600 कोटी मंजूर केले आहेत. तर अन्य 10 किल्ल्यांसाठी आणखी 100 कोटी केंद्राकडून मिळणार आहेत. असेही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी स्पष्ट केले.

Intro:File name - mh_sng_04_sambhajiraje_on_mantrimandal_vis_01_7203751 - to - mh_sng_04_sambhajiraje_on_mantrimandal_byt_04_7203751


स्लग - मंत्रिमंडळाची एक तरी बैठक रायगडावर घ्या,उदयनराजेच्या पराभवाचे आम्हलाही दुःख - खासदार छत्रपती संभाजीराजे

अँकर - राज्याच्या नव्या मंत्रीमंडळाची एक तरी बैठक ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर व्हावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.तसेच
उदयनराजेच्या पराभवाचे आम्हलाही दुःख आहे.आणि या पराजयाचा उदयनराजे नक्कीच विचार करतील असा विश्वासही खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे.ते सांगलीच्या कवलापूर येथे बोलत होते.Body:सांगलीच्या कवलापूर मधील स्वराज्य दौलत दुर्गनाद प्रतिष्ठानने पन्हाळा गडाची प्रतिकृती साकारली.या किल्लाच्या प्रतिकृतीच्या उदघाटनच्या निमित्ताने संभाजीराजे कवलापूर मध्ये आले होते.या उद्घाटानंतर प्रसार माध्यमांशी कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी साताऱ्यातील उदयनराजे भोसले यांच्या पराभवरून बोलताना छत्रपती उदयनराजे यांचा बंधू या नात्याने उदयनराजे यांचा पराजय म्हणजे तो आमचा पण पराजय आहे. आणि या पराभवचे मनापासून आम्हाला पण दुःख वाटतंय,पण सुख आणि दुःख बघण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे. आजचा पराजय हा उद्या विजयाकडे कसा नेता येईल याकडे उदयनराजे पाहतील,व नक्की विचार करत असतील असं मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केला.तसेच पद हा एक भाग आहे,मात्र छत्रपतींची पदवी ही महत्वाची असते, रयतेची सेवा करणे ही छत्रपती घराण्याची परंपरा आहे ,आणि उदयनराजे पुन्हा एकदा,नव्या जोमाने काम सुरू करतील,व या पराभवातून उदयनराजे बाहेर पडतील,असा विश्वास संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे.

त्याच बरोबर राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळाला उद्देशुन बोलताना गावाचा विकास करायचा असेल तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज याना समजून घ्यायला हवं,त्यासाठी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हायला पाहिजे.फक्त जयजयकार करून चालणार नाही.म्हणून मंत्रिमंडळाची एक तरी कॅबिनेट बैठक रायगडावर घ्यावी अशी विनंती नवीन होणाऱ्या मुख्यमंत्री यांना आपण करणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.खासदार आणि राजकीय नेता अशी माझी फक्त ओळख असण्या ऐवजी किल्ले संवर्धन करणारा अशी माझी ओळख भविष्यात व्हावी, रायगड पूर्वी जसा होता, तसा करण्याचा आम्ही प्रयत्न सुरू आहे, किल्याच संवर्धना साठी 600 कोटी किल्यासाठी मंजूर आहेत,तर अन्य 10 किल्ल्यासाठी आणखीन 100 कोटी केंद्राकडून मिळणार आहेत असेही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

बाईट-: छत्रपती संभाजीराजे - खासदार.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.