ETV Bharat / state

नव्वदीचा 'आयर्विन पूल' आणि त्याच्या साक्षीदार लक्ष्मीबाई....

author img

By

Published : Dec 6, 2019, 10:06 AM IST

कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या सांगली शहराची ओळख आज अनेक कारणांनी जगात पोहोचली आहे. इथली हळद, द्राक्ष, साहित्य, कुस्ती किंवा राजकारण या सगळ्या गोष्टींना जगात तोड नाही. मात्र, या सर्वांना सधन आणि समृद्ध बनवले ते सांगलीच्या आयर्विन पुलाने...पाहूया 'ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट....

sangli
iarwin pool

सांगली- शहराच्या वैभवात आयर्विन पुलामुळे भर पडली. या ऐतिहासिक पुलाला नुकतीच ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलाच्या निर्मितीमध्ये हातभार लावलेल्या एकमेव जिवंत साक्षीदार असणाऱ्या लक्ष्मीबाई पुजारी आजही या पुलाचे कवित्व मोठ्या अभिमानाने सांगत आहेत. 'काही काळजी करू नका अजून 50 वर्षे पुलाला काही होणार नाही', असे भविष्य बिनधास्तपणे वर्तवत आहेत.

सांगलीच्या आयर्वीन पुलाला बांधकाम होऊन ९० वर्षे पूर्ण झाली आहेत.....पाहूया 'ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट...


'सांगली बहू परिस चांगली' अशी बिरुदावली सांगलीच्या बाबतीत मिरवली जाते. कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या सांगली शहराची ओळख आज अनेक कारणांनी जगात पोहोचली आहे. इथली हळद, द्राक्ष, साहित्य, कुस्ती किंवा राजकारण या सगळ्या गोष्टींना जगात तोड नाही. मात्र, या सर्वांना सधन आणि समृद्ध बनवले ते सांगलीच्या आयर्विन पुलाने.


या पुलाच्या निर्मितीमध्ये अवघ्या 10 वर्ष वयात डोक्यावरून घमेला घेऊन खडी टाकण्याचे काम करून लक्ष्मीबाई काम्मणा पुजारी यांनी योगदान दिले होते. आता त्यांनीही वयाची शंभरी पार केली आहे. लक्ष्मीबाई या आयर्विन पुलाच्या बांधकामासाठी कर्नाटकतील जामखंडी तालुक्यामध्ये तोदलबगी येथून सांगलीत पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय अवघे 10 वर्ष होते. आणि आपल्या कुटुंबासह लक्ष्मीबाई पुलाच्या बांधकामासाठी मजूर म्हणून काम करत होत्या. खडी टाकण्यापासून माती टाकण्यापर्यंत लक्ष्मीबाई आपल्या कुटुंबासमवेत राबायच्या. या ठिकाणी जवळपास 1 हजारहून अधिक लोक काम करत असत. ज्यामध्ये अवघ्या 5 वर्षाच्या मुलांपासून वयोवृद्धांचाही समावेश होता. 3 वर्षाच्या कालखंडात ह्या पुलाच्य़ा बांधकामाचे काम पूर्ण झाले. या पुलावरून पहिली गाडी गेली, ती म्हणजे बैलगाडी. त्यांनतर घोडागाडी, मग सायकल असा प्रवास पुलावर उद्घाटनानंतर सुरू झाल्याचे त्या सांगतात. वयाची शंभरी पार करूनही लक्ष्मीबाई यांची स्मृती उत्तम असून त्यावेळी कशा पध्दतीने काम करण्यात आले याचा अनुभव त्या अगदी स्पष्टपणे सांगतात.


१९२९ आधी सांगली शहराला पुणे मुंबईकडे जाण्याचा मार्ग हा व्हाया कोल्हापूर असा होता. कारण कृष्णा नदीवर कोणताच पूल नव्हता. नदीच्या पलीकडून जायचे झाले तर नावेतून जीव धोक्यात घालून जावे लागे. त्यामुळे बहुतांश प्रवास हा कोल्हापूर मार्गे होत असे. मात्र, कृष्णाकाठी वसलेल्या या शहराला 1914 मध्ये महापुराचा फटका बसला आणि त्यानंतर सांगलीचे संस्थानिक पटवर्धन सरकारांनी याठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या उभारणीला प्रत्यक्ष सुरवात झाली ती १४ फेब्रुवारी १९२७मध्ये. ब्रिटिश आधिपत्याखाली जरी या पुलाला मान्यता मिळाली असली तरी, याचे सर्व श्रेय आणि नियंत्रण हे पटवर्धन सरकारांच्या आधिपत्याखाली होते. तर या पुलाच्या बांधकामाचे कंत्राटाचे काम पुण्यातील रानडे कंपनीला देण्यात आले होते.


पुलाला आयर्विन नाव कसे पडले ?

या पुलाचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले ते भारताचे ब्रिटिश राजवटीतील गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड ज्यांना बॅरेन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल ही पदवी होती. या पदवीवरून सांगली संस्थानाकडून या पुलाला आयर्विन हे नाव देण्यात आले.
आज मोठ्या दिमाखात सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या या आयर्विन पुलाला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. ९० वर्षांच्या कालखंडात या पुलाने अनेक स्थितांतरे पहिली आहेत. इतकेच नव्हे तर अनेक महापूर पचवले आहेत. नुकत्याच आलेल्या भयानक महापुरात या पुलाची थोडी वाताहत झाली आहे. परंतु, तरीही आज पूल मोठ्या दिमाखाने उभा आहे. हा ऐतिहासिक पूल आणि पुलाच्या उभारणीत हातभार लागलेल्या लक्ष्मीबाई पुजारी, हे दोघेही एकमेकांची साक्ष देत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे..

सांगली- शहराच्या वैभवात आयर्विन पुलामुळे भर पडली. या ऐतिहासिक पुलाला नुकतीच ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलाच्या निर्मितीमध्ये हातभार लावलेल्या एकमेव जिवंत साक्षीदार असणाऱ्या लक्ष्मीबाई पुजारी आजही या पुलाचे कवित्व मोठ्या अभिमानाने सांगत आहेत. 'काही काळजी करू नका अजून 50 वर्षे पुलाला काही होणार नाही', असे भविष्य बिनधास्तपणे वर्तवत आहेत.

सांगलीच्या आयर्वीन पुलाला बांधकाम होऊन ९० वर्षे पूर्ण झाली आहेत.....पाहूया 'ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट...


'सांगली बहू परिस चांगली' अशी बिरुदावली सांगलीच्या बाबतीत मिरवली जाते. कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या सांगली शहराची ओळख आज अनेक कारणांनी जगात पोहोचली आहे. इथली हळद, द्राक्ष, साहित्य, कुस्ती किंवा राजकारण या सगळ्या गोष्टींना जगात तोड नाही. मात्र, या सर्वांना सधन आणि समृद्ध बनवले ते सांगलीच्या आयर्विन पुलाने.


या पुलाच्या निर्मितीमध्ये अवघ्या 10 वर्ष वयात डोक्यावरून घमेला घेऊन खडी टाकण्याचे काम करून लक्ष्मीबाई काम्मणा पुजारी यांनी योगदान दिले होते. आता त्यांनीही वयाची शंभरी पार केली आहे. लक्ष्मीबाई या आयर्विन पुलाच्या बांधकामासाठी कर्नाटकतील जामखंडी तालुक्यामध्ये तोदलबगी येथून सांगलीत पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय अवघे 10 वर्ष होते. आणि आपल्या कुटुंबासह लक्ष्मीबाई पुलाच्या बांधकामासाठी मजूर म्हणून काम करत होत्या. खडी टाकण्यापासून माती टाकण्यापर्यंत लक्ष्मीबाई आपल्या कुटुंबासमवेत राबायच्या. या ठिकाणी जवळपास 1 हजारहून अधिक लोक काम करत असत. ज्यामध्ये अवघ्या 5 वर्षाच्या मुलांपासून वयोवृद्धांचाही समावेश होता. 3 वर्षाच्या कालखंडात ह्या पुलाच्य़ा बांधकामाचे काम पूर्ण झाले. या पुलावरून पहिली गाडी गेली, ती म्हणजे बैलगाडी. त्यांनतर घोडागाडी, मग सायकल असा प्रवास पुलावर उद्घाटनानंतर सुरू झाल्याचे त्या सांगतात. वयाची शंभरी पार करूनही लक्ष्मीबाई यांची स्मृती उत्तम असून त्यावेळी कशा पध्दतीने काम करण्यात आले याचा अनुभव त्या अगदी स्पष्टपणे सांगतात.


१९२९ आधी सांगली शहराला पुणे मुंबईकडे जाण्याचा मार्ग हा व्हाया कोल्हापूर असा होता. कारण कृष्णा नदीवर कोणताच पूल नव्हता. नदीच्या पलीकडून जायचे झाले तर नावेतून जीव धोक्यात घालून जावे लागे. त्यामुळे बहुतांश प्रवास हा कोल्हापूर मार्गे होत असे. मात्र, कृष्णाकाठी वसलेल्या या शहराला 1914 मध्ये महापुराचा फटका बसला आणि त्यानंतर सांगलीचे संस्थानिक पटवर्धन सरकारांनी याठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या उभारणीला प्रत्यक्ष सुरवात झाली ती १४ फेब्रुवारी १९२७मध्ये. ब्रिटिश आधिपत्याखाली जरी या पुलाला मान्यता मिळाली असली तरी, याचे सर्व श्रेय आणि नियंत्रण हे पटवर्धन सरकारांच्या आधिपत्याखाली होते. तर या पुलाच्या बांधकामाचे कंत्राटाचे काम पुण्यातील रानडे कंपनीला देण्यात आले होते.


पुलाला आयर्विन नाव कसे पडले ?

या पुलाचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले ते भारताचे ब्रिटिश राजवटीतील गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड ज्यांना बॅरेन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल ही पदवी होती. या पदवीवरून सांगली संस्थानाकडून या पुलाला आयर्विन हे नाव देण्यात आले.
आज मोठ्या दिमाखात सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या या आयर्विन पुलाला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. ९० वर्षांच्या कालखंडात या पुलाने अनेक स्थितांतरे पहिली आहेत. इतकेच नव्हे तर अनेक महापूर पचवले आहेत. नुकत्याच आलेल्या भयानक महापुरात या पुलाची थोडी वाताहत झाली आहे. परंतु, तरीही आज पूल मोठ्या दिमाखाने उभा आहे. हा ऐतिहासिक पूल आणि पुलाच्या उभारणीत हातभार लागलेल्या लक्ष्मीबाई पुजारी, हे दोघेही एकमेकांची साक्ष देत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे..

Intro:स्लग - नव्वदीच्या ऐतिहासिक 'आयर्विन पुलाच्या ' साक्षीदार लक्ष्मीबाई आणि पुलाचे भविष्य ...

अँकर - सांगलीच्या वैभवात आयर्विन पुलामुळे भर पडली,आणि अश्या या ऐतिहासिक पुलाला नुकतेच 90 वर्षे पूर्ण झाली आहेत.
आणि या पुलाच्या निर्मिती मध्ये हातभार लावलेल्या एकमवे जिवंत साक्षीदार असणाऱ्या लक्ष्मीबाई पुजारी आजही या पुलाचे कवित्व मोठ्या अभिमानाने सांगत आहेत,
आणि काय पण काळजी करू नका अजून 50 वर्षे पुलाला काय होणार नाही,असे भविष्य बिनधास्त पणे वर्तवत आहेत..


Body:"सांगली बहू परिस चांगली"अशी बिरुदावली सांगलीच्या बाबतीत मिरवली जाते.कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या सांगली शहराची ओळख आज अनेक कारणांनी जगात पोहचली आहे,मग ती इथल्या हळद,द्राक्ष,साहित्य,कुस्ती,
राजकारण असो किंवा अन्य गोष्टी.
मात्र या सर्वांना सधन आणि समृद्ध बनवलं सांगलीच्या आयर्विन पुलाने.
कारण या सर्वांचा राजमार्ग बनला तो आयर्विन ब्रिज.

आणि अश्या या पुलाच्या निर्मिती मध्ये अवघ्या 10 वर्षाच्या वयात डोक्यावरून घमेला घेऊन खडी टाकण्याचे काम करणाऱ्या लक्ष्मीबाई काम्मणा पुजारी यांनी केले होते.आता त्यांनी वयाची शंभरी पार केली आहे.लक्ष्मीबाई या आयर्विन पुलाच्या बांधकामासाठी कर्नाटका राज्यातील जामखंडी तालुक्यातील तोदलबगी येथून सांगलीत पोहचल्या होत्या,
त्यावेळी त्याचे वय अवघे 10 वर्षाचे होते.आणि आपल्या कुटुंबासह लक्ष्मीबाई पुलाच्या बांधकामासाठी मजूर म्हणून काम करत होत्या,खडी टाकण्यापासून माती टाकण्यापर्यंत लक्ष्मीबाई आपल्या कुटुंबासमवेत राबायच्या ,जवळपास 1 हजार हुन अधिक लोक ज्या मध्ये अवघ्या 5 वर्षाच्या मुलापासून वयोवृद्ध यांचा समावेश होता.
3 वर्षाच्या कालखंडात हा पूल पूर्ण रित्या उभा झाला .आणि या पुलावरून पहिली गाडी गेली ,ती म्हणजे बैलगाडी,त्यांनतर घोडागाडी,मग सायकल असं प्रवासा हा पुलावर उदघाटन झाल्यानंतर सुरू झाल्याचे लक्ष्मीबाई सांगतात, वयाची शंभरी पार करूनही लक्ष्मीबाई यांची स्मृती उत्तम आहे. आणि त्यावेळी कश्या पध्दतीने काम करण्यात आल्याचे लक्ष्मी आजी स्पष्टपणे सांगतात.
आज त्या आपल्या कुटुंबासमवेत सांगलीच्या विजयनगर याठिकाणी राहतात,आणि आयर्विन पुलाला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या प्रकाशझोतात आल्या.


1929 आधी सांगली शहराला पुणे मुंबईकडे जाण्याचा मार्ग हा व्हाया कोल्हापूर असा होता.कारण कृष्णा नदीवर कोणताच पूल नव्हता,आणि नदीच्या पलीकडून जायचे झाले तर नावेतून जीव धोक्यात घालून जावे लागत,त्यामुळे बहुतांश प्रवास हा 1929 च्या आधी कोल्हापूर मार्गे होत असे.

मात्र कृष्णाकाठी वसलेल्या या शहराला 1914 मध्ये महापूराचा फटका बसला आणि त्यानंतर सांगलीचे संस्थानिक पटवर्धन सरकारांनी याठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेतला,आणि अनेक बाबतीत त्यावेळच्या सांगली स्टेट असेंम्बली मध्ये यावर चर्चा होऊन,निधी जमवून या पूल उभारणीला प्रत्यक्ष सुरवात झाली,14 फेब्रुवारी 1927 मध्ये.

ब्रिटिश आधिपत्याखाली जरी या पुलाला मान्यता मिळाली असली तरी,याचा सर्व श्रेय आणि नियंत्रण हे पटवर्धन सरकारांच्या आधिपत्याखाली होतं,तर या पुलाचे बांधकामाचे कंत्राट पुण्यातील रानडे कंपनीला देण्यात आला होता,आणि सांगली शहरातील काळा दगड,
कर्नाटकातील गोकाक येथील लाल दगड,शिसे यांचा वापर करून हा पूल बांधण्यात आला,तर हा पूल उभारताना यावर रेखीव आणि देखण्या रुपाची हस्तकला ही करण्यात आली,12 कमानींच्या जोरावर उभा राहिलेला हा भव्य दिव्य पुल अखेर 18 नोव्हेंबर 1929 मध्ये सर्वार्थाने पूर्ण झाला.तर या पुलाला त्यावेळी 6 लाख 50 हजार रुपये इतका खर्च आला.आणि आणि पटवर्धन संस्थानिकांनी मोठ्या थाटामाटात या पुलाचे उद्घाटन भारताचे ब्रिटिश राजवटीचे तत्कालीन गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते करण्यात आले.आणि एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड यांच्या पत्नीने या सुंदर पुलाचे तोंड भरून कौतुक केले होते.

आयर्विन पुलाच्या निर्माणामुळे खरंतर सांगलीच्या प्रगतीची मार्ग खुला झाली.आणि बघता बघता सांगली हे एक व्यापारी केंद्र बनले.आणि सांगलीला एक समृद्ध शहर बनवण्याचा आयर्विन पूल हा राजमार्ग ठरला.

पुलाला आयर्विन नाव कसे पडले ?

या पुलाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले,ते भारताचे ब्रिटिश राजवटीतील गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड आणि त्यांना बॅरेन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल ही पदवी होती.आणि या पदवीवरून सांगली संस्थानकडून या पुलाला आयर्विन हे नाव देण्यात आले.

आज मोठ्या दिमाखात सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या या आयर्विन पुलाला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत.
आणि 90 वर्षाच्या कालखंडात या पुलाने अनेक स्थितांतरे पहिली आहेत.इतकेच नव्हे तर अनेक महापूर पचवली आहेत.नुकत्याच आलेल्या भयानक महापुरात या पुलाची थोडी वाताहत झाली आहे.पण तरीही आज पूल मोठ्या दिमाखाने उभा आहे.

अश्या हा ऐतिहासिक आयर्विन पूल आणि पुलाच्या उभारणीत हातभार लागलेल्या लक्ष्मीबाई पुजारी, हे दोघेही एकमेकांची साक्ष देत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे..

बाईट -मानसिंग कुमठेकर - इतिहास अभ्यासक,मिरज.

बाईट - संजय चव्हाण - सामाजिक कार्यकर्ते,सांगली.




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.