सांगली - अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेली द्राक्षबाग वाया गेल्याने एका शेतकऱ्यांनी स्वतःच्या हाताने द्राक्षबाग जमीनदोस्त केली आहे. एक एकरावरील बाग पावसाने वाया गेल्याने खानापूरच्या आळसंदमधील द्राक्षबाग शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागेवर कोयता चालवताना शेतकऱ्याला अश्रु अनावर झाले होते.
पावसाने दुसऱ्यांदा द्राक्षबागेवर फिरवलं पाणी..शेतकऱ्याने द्राक्षवेलींवर चालवला कोयता - सांगलीत द्राक्षबागेचे नुकसान
सलग दुसऱ्या वर्षीही अतिवृष्टीमुळे द्राक्ष बाग वाया गेली. त्यामुळे खानापूरच्या आळसंदमधील द्राक्षबाग शेतकऱ्याच्या पदरी निराशा आली. चार ते पाच लाख रुपये उत्पन्न त्यांना यंदा अपेक्षित होतं, मात्र या सर्वावर पावसानं पाणी फिरलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यासमोर बाग तोडण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही आणि जड अंतकरणातून त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागेवर कोयता चालवला.
![पावसाने दुसऱ्यांदा द्राक्षबागेवर फिरवलं पाणी..शेतकऱ्याने द्राक्षवेलींवर चालवला कोयता grape crop Damage](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9372073-324-9372073-1604072751117.jpg?imwidth=3840)
द्राक्षवेलींवर चालवला कोयता
सांगली - अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेली द्राक्षबाग वाया गेल्याने एका शेतकऱ्यांनी स्वतःच्या हाताने द्राक्षबाग जमीनदोस्त केली आहे. एक एकरावरील बाग पावसाने वाया गेल्याने खानापूरच्या आळसंदमधील द्राक्षबाग शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागेवर कोयता चालवताना शेतकऱ्याला अश्रु अनावर झाले होते.
शेतकऱ्याने द्राक्षवेलींवर चालवला कोयता
शेतकऱ्याने द्राक्षवेलींवर चालवला कोयता
Last Updated : Oct 30, 2020, 9:27 PM IST