सांगली - मला फेकुचंद म्हणता, मीही तुम्हाला शरद पवारांचे पंटर, खबऱ्या म्हणू शकतो, पण माझी ती संस्कृती नाही. मात्र, आपला पगार किती आणि बोलता किती? अशा खरमरीत शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर पत्र लिहून निशाणा साधला आहे.
सामनातून पडळकरांच्यावर टीका..
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मुंबई अधिवेशन दरम्यान करण्यात आलेल्या आंदोलनावरून शिवसेना मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेख मधून पडळकर यांचा "फेकुचंद", असा उल्लेख करत टीका करण्यात आली होती. या टीकेला पडळकर यांनी खरमरीत पत्र लिहून संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.
पडळकर यांनी सामना मधून करण्यात आलेल्या टिकेवर बोलताना म्हटले आहे की, सामना मी कधीच वाचत नाही, सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली. परंतु मला आंदोलन करण्यासाठी सरकारच्या किंवा शिवसेनेच्या परवानगीची गरज नाही. मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने तो अधिकार दिला आहे. त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करत आहेत. त्याचसाठी हा पत्र प्रपंच केला आहे.पडळकरांचे संजय राऊतांना खरमरीत पत्र काय लिहले आहे पत्रात..? आदरणीय संजय राऊत साहेब असे म्हणत पडळकरांनी पत्राची सुरुवात करत पुढील मजकुरातून राऊत यांच्यावर टीकांची झोड उठवली आहे. मी आपणास खरेतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे उद्बोधन देऊन लिहू शकलो असतो. परवाच्या सामनाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख "फेकूचंद पडळकर" असा केला आहे. या पद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता, पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे. हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला असल्याचे म्हणत राऊतांना संस्कारावरून टोला लगवाला आहे. आपण सामनाच्या अग्रलेखात जी मुक्ताफळे उधळली आहेत. ती मुद्दाम लोकांना कळावित म्हणून मी हे पत्र लिहित आहे. त्या अग्रलेखात आपण असे लिहिले आहे, की महाराष्ट्रात हुकूमशाही वा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोल-ताशांसह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे.
बोलण्याचे लायसन्स मातोश्रीमधून की गोविंदबागेतून? सतेच्या धुंदीत विरोधकांवर चालते लेखणी..राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मी धनगरी पेहराव करून ढोल वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण व भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत, असा त्या मागचा उद्देश होता. मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुखदुःखाशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या दुःखी धनगर समाजाचे दुःख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही हजारवेळा येईन, ते स्वातंत्र्य आपण वा आपल्या सरकारने मला दिलेले नाही. ते स्वातंत्र्य मला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते. मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार, असा उल्लेख करत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले आहे. भुरट्या मर्दानगीच, हे कसलं स्त्री दाक्षिण्य ? राऊतांनी, आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे. सगळं लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमधे असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरू आहे, याचा अंदाज तरी कसा येणार? राज्याच्या प्रतिष्ठेवर दारूची गुळणी करणाऱ्याला जाब विचारताना संजय राऊतांनी, दारूची दुकानं उघडून मंदीर बंद ठेवण्याने राज्याची कोणती प्रतिष्ठा वाढली गेली, हे ही सांगावे, असा सवालही पडळकर यांनी पत्रातून केला आहे. फक्त टिका केली म्हणून एखाद्या नटीला जेरीस आणायचं अन् उखाड दिया म्हणत, अशा भुरट्या मर्दानगीच प्रदर्शन मांडायचे, हे कसलं स्त्रीदाक्षिण्य? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही दाखले देत, आपले राजकारण करता त्यांचा आदर्श विसरलात का? शत्रुगटातील स्त्री असली तरी, तिची खणानारळाने ओटी भरून यथोचित सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. तेही महाविकास
पडळकरांचे संजय राऊतांना खरमरीत पत्र आघाडीत जाऊन विसरले असल्याची टीका करत पडळकरांनी कंगना प्रकरणातील कारवाईवरूनही राऊतांवर आसूड ओडले आहेत.
आपला पगार किती आणि आपण बोलता किती ? संजय राऊतजी, आपला पगार किती आणि आपण बोलता किती? आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडून आले ते भाजपच्या आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवशावर निवडून आलेले आहेत, याचा इतक्या लवकर आपल्याला विसर पडला का? पंतप्रधान मोदींवर वाट्टेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? ऊठसुठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे लायसन्स आपल्याला मातोश्रीतून मिळाले की, बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले? हे महाराष्ट्राला कळू द्या. शरद पवार यांच्याविषयी मध्यंतरी मी काही विधाने केली, तेव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता, ते साहजिकही आहे, असे म्हणत संजय राऊतांच्या पवार प्रेमावरही पडळकरांनी निशाणा साधला आहे.
मातोश्री पेक्षा पवारांची हुजरेगिरी..कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहे, असे शिवसेनेतील आमचे मित्र आम्हाला सांगत असतात. माझ्यात सभ्यता आहे आणि अजूनतरी, ती मी आपल्याबाबतीत सोडलेली नाही. पण आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी बघता, आपल्याला "तीच" उपाधी मी देखील द्यावी असे राहून राहून वाटते, अशा खरमरीत पत्र आमदार पडळकर यांनी, संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. पडळकरांच्या या टीकात्मक पत्रावर संजय राऊत प्रतिक्रिया देऊन पडळकरांचे महत्व वाढवणार की या दुर्लक्ष करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.