सांगली - केंद्र सरकारने शहाणपणाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवावा अन्यथा देशात 'अराजकता' निर्माण होईल, असा इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना जर कायदा नको, असेल तर कशाला लादत आहात, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. कृषी कायद्याविरोधात सांगली मध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
शहाणपणाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा देशात अराजकता माजेल - राजू शेट्टी
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याच प्रमाणे देशभरातील शेतकरी संघटनांकडून या कायद्याला विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधत हे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.
अन्यथा देशात अराजकता माजेल - राजू शेट्टी
सांगली - केंद्र सरकारने शहाणपणाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवावा अन्यथा देशात 'अराजकता' निर्माण होईल, असा इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना जर कायदा नको, असेल तर कशाला लादत आहात, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. कृषी कायद्याविरोधात सांगली मध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.