रत्नागिरी- जिल्ह्यात बंडखोरी नसल्याने आम्ही सुदैवी आहोत. त्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तसेच या वेळेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाढतील, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आहेत. या ठिकाणचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील. आणि राज्यभरातही गेल्या वेळ पेक्षा महायुतीच्या जागा यावेळी वाढतील, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.
हेही वाचा- राणे साहेब जिथे गेलेत तिथे यशस्वी होवोत...हुसेन दलवाईंची राणेंना कोपरखळी