ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू; एकूण संख्या 52 वर

author img

By

Published : Jul 27, 2020, 12:37 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बाधितांच्या संख्येसह मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात एकुण 52 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ratnagiri government hospital
ratnagiri government hospital

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनामुळे रविवारी (दि. 26 जुलै) आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन रुग्ण रत्नागिरी व एक रुग्ण राजापूर येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 52 वर पोहोचली आहे.

दरम्यान, सोमवारी (दि. 27 जुलै) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 618 झाली आहे.

148 प्रतिबंधित क्षेत्र

जिल्ह्यात सध्या 148 प्रतिबंधित क्षेत्र असून रत्नागिरी तालुक्यात 26 गावांमध्ये, दापोली मध्ये 2 गावांमध्ये, खेड मध्ये 35 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 65 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनामुळे रविवारी (दि. 26 जुलै) आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन रुग्ण रत्नागिरी व एक रुग्ण राजापूर येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 52 वर पोहोचली आहे.

दरम्यान, सोमवारी (दि. 27 जुलै) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 618 झाली आहे.

148 प्रतिबंधित क्षेत्र

जिल्ह्यात सध्या 148 प्रतिबंधित क्षेत्र असून रत्नागिरी तालुक्यात 26 गावांमध्ये, दापोली मध्ये 2 गावांमध्ये, खेड मध्ये 35 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 65 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.