ETV Bharat / state

एसटीचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात, एसटीमुळे ग्रामीण भागाचा विकास - जि.प. अध्यक्षा

author img

By

Published : Jun 1, 2019, 6:39 PM IST

विभाग नियंत्रक विजय दिवटे म्हणाले की, गाडीत 2 प्रवासी असतीले तरीही त्यांना इच्छित स्थळी सोडताना एसटीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सुरुवातीला केवळ 30 बस असलेल्या महामंडळात आज 15 हजारपेक्षा जास्त बसेस आहेत. कमचार्‍यांच्या सहकार्यामुळेच एसटीची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. ही सेवा विश्‍वासार्ह आणि सर्वसामान्यांना परवडणारी सेवा आहे.

एसटीचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात, एसटीमुळे ग्रामीण भागाचा विकास - जि.प. अध्यक्षा

रत्नागिरी - एसटीचा 71 वा वर्धापन दिन रत्नागिरीत उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त एसटी प्रशासनाकडून शहरातील रहाटागर बसस्थानकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एसटी हा सर्व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एसटीमुळे ग्रामीण भागाचा विकास होत आहे. प्रवाशांना एसटी बस हे हक्‍काचे साधन आहे. एसटीतून प्रवास करताना कधीही गैरसोय जाणवत नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यावेळी म्हणाल्या. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

एसटीचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात, एसटीमुळे ग्रामीण भागाचा विकास - जि.प. अध्यक्षा

यावेळी साळवी म्हणाल्या की, मागील 71 वर्षांच्या काळात एसटी महामंडळाने ग्रामीण भागात मोठी वाहतूक सुविधा पुरवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची एसटी ही जीवनवाहिनी आहे. एसटी महामंडळातही परिवर्तन होत असून, शिवशाही सारख्या आरामदायी गाड्या एसटीच्या ताफ्यात आल्या आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या महामंडळाचा डोलारा सांभाळताना थोड्या त्रुटी असणारच पण प्रवासी आणि नागरिकांनी एसटीप्रती नेहमीच सहकार्याची भावना ठेवावी.

विभाग नियंत्रक विजय दिवटे म्हणाले की, गाडीत 2 प्रवासी असतीले तरीही त्यांना इच्छित स्थळी सोडताना एसटीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सुरुवातीला केवळ 30 बस असलेल्या महामंडळात आज 15 हजारपेक्षा जास्त बसेस आहेत. कमचार्‍यांच्या सहकार्यामुळेच एसटीची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. ही सेवा विश्‍वासार्ह आणि सर्वसामान्यांना परवडणारी सेवा आहे.

या कार्यक्रमाला विभाग नियंत्रक विजय दिवटे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, निरुळच्या सरपंच श्रेयसी बने, अनंत जाधव आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विनातक्रार सेवा बजावणारे चालक संजय गझने आणि नटेश्‍वर शिरधनकर यांचा स्वरुपा साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उदय पारकर यांनी केले. आभार संतोष बोगरे यांनी मानले.

रत्नागिरी - एसटीचा 71 वा वर्धापन दिन रत्नागिरीत उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त एसटी प्रशासनाकडून शहरातील रहाटागर बसस्थानकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एसटी हा सर्व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एसटीमुळे ग्रामीण भागाचा विकास होत आहे. प्रवाशांना एसटी बस हे हक्‍काचे साधन आहे. एसटीतून प्रवास करताना कधीही गैरसोय जाणवत नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यावेळी म्हणाल्या. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

एसटीचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात, एसटीमुळे ग्रामीण भागाचा विकास - जि.प. अध्यक्षा

यावेळी साळवी म्हणाल्या की, मागील 71 वर्षांच्या काळात एसटी महामंडळाने ग्रामीण भागात मोठी वाहतूक सुविधा पुरवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची एसटी ही जीवनवाहिनी आहे. एसटी महामंडळातही परिवर्तन होत असून, शिवशाही सारख्या आरामदायी गाड्या एसटीच्या ताफ्यात आल्या आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या महामंडळाचा डोलारा सांभाळताना थोड्या त्रुटी असणारच पण प्रवासी आणि नागरिकांनी एसटीप्रती नेहमीच सहकार्याची भावना ठेवावी.

विभाग नियंत्रक विजय दिवटे म्हणाले की, गाडीत 2 प्रवासी असतीले तरीही त्यांना इच्छित स्थळी सोडताना एसटीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सुरुवातीला केवळ 30 बस असलेल्या महामंडळात आज 15 हजारपेक्षा जास्त बसेस आहेत. कमचार्‍यांच्या सहकार्यामुळेच एसटीची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. ही सेवा विश्‍वासार्ह आणि सर्वसामान्यांना परवडणारी सेवा आहे.

या कार्यक्रमाला विभाग नियंत्रक विजय दिवटे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, निरुळच्या सरपंच श्रेयसी बने, अनंत जाधव आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विनातक्रार सेवा बजावणारे चालक संजय गझने आणि नटेश्‍वर शिरधनकर यांचा स्वरुपा साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उदय पारकर यांनी केले. आभार संतोष बोगरे यांनी मानले.

Intro:
एसटीचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात

एसटीमुळे ग्रामीण भागाचा विकास - जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी

रत्नागिरी, प्रतिनिधी


एसटीचा 71 वा वर्धापन दिन रत्नागिरीत उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त एसटी प्रशासनाकडून शहरातील रहाटागर बसस्थानकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान एसटी हा सर्व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एसटीमुळे ग्रामीण भागाचा विकास होत आहे. प्रवाशांना एसटी बस हे हक्‍काचे साधन आहे. एसटीतून प्रवास करताना कधीही गैरसोय जाणवत नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यावेळी म्हणाल्या. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी साळवी म्हणाल्या की, मागील 71 वर्षांच्या काळात एसटी महामंडळाने ग्रामीण भागात मोठी वाहतूक सुविधा पुरवली आहे.त्यामुळे ग्रामीण भागाची एसटी ही जीवनवाहिनी आहे. एसटी महामंडळातही परिवर्तन होत असून, शिवशाही सारख्या आरामदायी गाड्या एसटीच्या ताफ्यात आल्या आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या महामंडळाचा डोलारा सांभाळताना थोड्या त्रुटी असणारच पण प्रवासी आणि नागरिकांनी एसटीप्रती नेहमीच सहकार्याची भावना ठेवावी.
विभाग नियंत्रक विजय दिवटे म्हणाले की, गाडीत 2 प्रवासी असतील तरीही त्यांना इच्छित स्थळी सोडताना एसटीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सुरुवातीला केवळ 30 बस असलेल्या महामंडळात आज 15 हजारपेक्षा जास्त बसेस आहेत. कमचार्‍यांच्या सहकार्यामुळेच एसटीची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. ही विश्‍वासार्ह आणि सर्वसामान्यांना परवडणारी सेवा आहे.
या कार्यक्रमाला विभाग नियंत्रक विजय दिवटे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, निरुळच्या सरपंच श्रेयसी बने, अनंत जाधव आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विनातक्रार सेवा बजावणारे चालक संजय गझने आणि नटेश्‍वर शिरधनकर यांचा स्वरुपा साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उदय पारकर यांनी केले. आभार संतोष बोगरे यांनी मानले.
Body:एसटीचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात

एसटीमुळे ग्रामीण भागाचा विकास - जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवीConclusion:एसटीचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात

एसटीमुळे ग्रामीण भागाचा विकास - जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.