ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटना : एसआयटीची घटनास्थळाला भेट; गावकाऱ्यांना दिले कारवाईचे आश्वासन

author img

By

Published : Jul 15, 2019, 8:09 PM IST

सरकारने दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. याच चौकशी पथकाने आज घटनास्थळाला भेट दिली. यावेळी चौकशी समितीमधील सद्स्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी धरण फुटण्यापूर्वीची दुरवस्था पथकासमोर कथन केली.

एसआयटीची घटनास्थळाला भेट

रत्नागिरी - तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाने आज घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी पथकाने गावकऱ्यांची कहाणी ऐकून घेतली. तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने गावकऱ्यांशी साधलेला संवाद.

एसआयटीची घटनास्थळाला भेट

गेल्या ३ जुलैला रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले होते. या दुर्घटनेत २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी २१ जणांचे मृतदेह सापडले आहेत. ग्रामस्थांनी या धरणाला गळती लागल्याच्या तक्रारी वारंवार केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने लक्ष दिले नाही. शेवटी धरण फुटून लोकांना जीव गमवावा लागला.

सरकारने दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. याच चौकशी पथकाने आज घटनास्थळाला भेट दिली. यावेळी चौकशी समितीमधील सद्स्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी धरण फुटण्यापूर्वीची दुरवस्था पथकासमोर कथन केली. धरणाला गळती लागल्यानंतर कितीवेळा आवाज उठवला? याबद्दल चौकशी समितीला माहिती देण्यात आली. त्यानंतर धरणाच्या गळतीबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार करणाऱ्या दोघा भावंडांना घेऊन समितीने धरणाची पाहणी केली. समितीच्या सद्स्यांनी गावकऱ्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्यामुळे दोषींवर नक्की कारवाई होणार, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी - तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाने आज घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी पथकाने गावकऱ्यांची कहाणी ऐकून घेतली. तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने गावकऱ्यांशी साधलेला संवाद.

एसआयटीची घटनास्थळाला भेट

गेल्या ३ जुलैला रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले होते. या दुर्घटनेत २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी २१ जणांचे मृतदेह सापडले आहेत. ग्रामस्थांनी या धरणाला गळती लागल्याच्या तक्रारी वारंवार केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने लक्ष दिले नाही. शेवटी धरण फुटून लोकांना जीव गमवावा लागला.

सरकारने दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. याच चौकशी पथकाने आज घटनास्थळाला भेट दिली. यावेळी चौकशी समितीमधील सद्स्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी धरण फुटण्यापूर्वीची दुरवस्था पथकासमोर कथन केली. धरणाला गळती लागल्यानंतर कितीवेळा आवाज उठवला? याबद्दल चौकशी समितीला माहिती देण्यात आली. त्यानंतर धरणाच्या गळतीबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार करणाऱ्या दोघा भावंडांना घेऊन समितीने धरणाची पाहणी केली. समितीच्या सद्स्यांनी गावकऱ्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्यामुळे दोषींवर नक्की कारवाई होणार, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Intro:तिवरे धरण दुर्घटना

आमच्या आशा पल्लवित - ग्रामस्थ

रत्नागिरी, प्रतिनिधी

तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आलेल्या विशेष चौकशी पथकाने ग्रामस्थांशी देखील यावेळी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी धरण फुटण्या आधीची दुरावस्था या पथकासमोर कथन केली. ज्यांनी धऱणाच्या गळती संदर्भात पहिल्यापासून आवाज उठवला ते अजित चव्हाण आणि तानाजी चव्हाण यांनी कशा प्रकारे धरण दुरुस्तीसाठी आपण धडपडत होतो हे सांगितलं. अधिकाऱ्यांनी काय उत्तरे दिलं त्याचे कथन सुद्धा या समितीसमोर या दोघांनी केले. या दोघांना घेवून हि समिती थेट धरणाच्या भिंतीपर्यत गेली होती. आणि एकूण सर्व परिस्थिती ग्रामस्थांकडूनही जाणून घेतली. दरम्यान आमच्या आशा आता पल्लवीत झाल्या असून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा या धरणासंदर्भात पहिल्यापासून आवाज उठवणाऱ्या चव्हाण बंधूनी व्यक्त केली. या दोघा भावांशी संवाद साधलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

बाईट-१- ग्रास्थांसोबत 121-------


Body:तिवरे धरण दुर्घटना

आमच्या आशा पल्लवित - ग्रामस्थ
Conclusion:तिवरे धरण दुर्घटना

आमच्या आशा पल्लवित - ग्रामस्थ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.