ETV Bharat / state

अपराध असेल त्यांना मुख्यमंत्री कधीच पाठीशी घालणार नाहीत - खा. विनायक राऊत

author img

By

Published : Feb 25, 2021, 12:58 PM IST

महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे समजूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना न्याय देण्याचे काम करत असतात. त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कारट्या ही नीती उद्धव साहेबांकडे कधीच नसल्याचेही खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

mp raut
खा. विनायक राऊत

रत्नागिरी - ज्याचा अपराध असेल त्याला मुख्यमंत्री कधीच पाठीशी घालणार नाहीत, असे रोखठोक विधान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने आरोप केलेल्या मंत्री संजय राठोड यांच्याबाबत बोलताना खासदार राऊत यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संजय राठोड यांच्यावर पक्षातून कारवाई होणार का? याबाबत तर्क वितर्कांना उधान आले आहे. राऊत आज रत्नागिरीत बोलत होते.


तर त्या प्रकाराला मुख्यमंत्री भीक घालणार नाहीत

यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, जर चूक असेल तर त्यावर कारवाई नक्की केली जाईल, पण एखाद्याला बळी देण्याचा प्रकार जर भाजप करत असेल तर त्या प्रकाराला मुख्यमंत्री कदापी भीक घालणार नाहीत, असेही खासदार विनायक राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे समजूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना न्याय देण्याचे काम करत असतात. त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कारट्या ही नीती उद्धव साहेबांकडे कधीच नसल्याचेही खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

खा. विनायक राऊत
निर्बंधांचे पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता-संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनाबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशी स्थिती असताना गर्दी होणे किंवा करणे हे देखील चुकीचे आहे. कोरोनाची वाढ होत असताना त्याला अनुसरून जे निर्बंध घातलेले आहेत, त्या निर्बंधांचे पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. ते तोडण्याची हिम्मत जबाबदार व्यक्तींनी करणे चुकीचे असल्याचेही खासदार राऊत यावेळी म्हणाले.

रत्नागिरी - ज्याचा अपराध असेल त्याला मुख्यमंत्री कधीच पाठीशी घालणार नाहीत, असे रोखठोक विधान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने आरोप केलेल्या मंत्री संजय राठोड यांच्याबाबत बोलताना खासदार राऊत यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संजय राठोड यांच्यावर पक्षातून कारवाई होणार का? याबाबत तर्क वितर्कांना उधान आले आहे. राऊत आज रत्नागिरीत बोलत होते.


तर त्या प्रकाराला मुख्यमंत्री भीक घालणार नाहीत

यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, जर चूक असेल तर त्यावर कारवाई नक्की केली जाईल, पण एखाद्याला बळी देण्याचा प्रकार जर भाजप करत असेल तर त्या प्रकाराला मुख्यमंत्री कदापी भीक घालणार नाहीत, असेही खासदार विनायक राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे समजूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना न्याय देण्याचे काम करत असतात. त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कारट्या ही नीती उद्धव साहेबांकडे कधीच नसल्याचेही खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

खा. विनायक राऊत
निर्बंधांचे पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता-संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनाबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशी स्थिती असताना गर्दी होणे किंवा करणे हे देखील चुकीचे आहे. कोरोनाची वाढ होत असताना त्याला अनुसरून जे निर्बंध घातलेले आहेत, त्या निर्बंधांचे पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. ते तोडण्याची हिम्मत जबाबदार व्यक्तींनी करणे चुकीचे असल्याचेही खासदार राऊत यावेळी म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.