ETV Bharat / state

उद्या रत्नागिरीत संचारबंदी; चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

author img

By

Published : Jun 2, 2020, 2:05 PM IST

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता उद्या (बुधवार) संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ प्रमाणे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी संबंधित आदेश काढला आहे.

curfew in ratnagiri
चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता उद्या (बुधवार) संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

रत्नागिरी - चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता उद्या (बुधवार) संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ प्रमाणे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी संबंधित आदेश काढला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली. या वादळामुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी ०३ जूनला लोकांनी अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला.

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता उद्या (बुधवार) संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
निसर्ग चक्रीवादळ व अतिवृष्टीचा धोका 1) मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये.2) दिनांक-3 जूनला अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. 3) निवासस्थान मोडकळीस आलेल्या स्थितीत किंवा कच्च्या स्वरुपाचे असल्यास तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री घेऊन स्थलांतरीत व्हावे4) निवाऱ्याच्या जवळपास विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्याने त्यापासून खबरदारी घ्यावी.5) पशुधन व अन्य पाळीव प्राण्यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हालवावे 6) जवळ रॉकेलवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी जवळ बाळगावे 7) हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडीओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.8 आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे9) पिण्याचे पाणी शुद्ध करावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे.

10) मच्छिमारांनी आपल्या बोटींचे नुकसान टाळण्यासाठी त्या सुरक्षित स्थळी ठेवाव्या.

11) अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्र किनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.
13) ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.
14) सद्यस्थितीत जिल्ह्यात घरीच क्वारंटाइन असलेले नागरीक व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवताना वेगळी व्यवस्था करावी
15) मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत / तहसिलदार कार्यालय / जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02352- 226248, 222233 वर संपर्क साधावा

रत्नागिरी - चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता उद्या (बुधवार) संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ प्रमाणे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी संबंधित आदेश काढला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली. या वादळामुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी ०३ जूनला लोकांनी अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला.

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता उद्या (बुधवार) संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
निसर्ग चक्रीवादळ व अतिवृष्टीचा धोका 1) मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये.2) दिनांक-3 जूनला अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. 3) निवासस्थान मोडकळीस आलेल्या स्थितीत किंवा कच्च्या स्वरुपाचे असल्यास तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री घेऊन स्थलांतरीत व्हावे4) निवाऱ्याच्या जवळपास विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्याने त्यापासून खबरदारी घ्यावी.5) पशुधन व अन्य पाळीव प्राण्यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हालवावे 6) जवळ रॉकेलवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी जवळ बाळगावे 7) हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडीओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.8 आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे9) पिण्याचे पाणी शुद्ध करावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे.

10) मच्छिमारांनी आपल्या बोटींचे नुकसान टाळण्यासाठी त्या सुरक्षित स्थळी ठेवाव्या.

11) अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्र किनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.
13) ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.
14) सद्यस्थितीत जिल्ह्यात घरीच क्वारंटाइन असलेले नागरीक व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवताना वेगळी व्यवस्था करावी
15) मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत / तहसिलदार कार्यालय / जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02352- 226248, 222233 वर संपर्क साधावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.