ETV Bharat / state

सनातनशी संबंधांवरून काँग्रेसचे उमेदवार बांदिवडेकर अडचणीत; आरोपांचे कार्यकर्त्यांकडून खंडण

author img

By

Published : Mar 22, 2019, 6:08 PM IST

काँग्रेसकडून उमेदवार म्हणून घोषित झालेल्या बांदिवडेकर यांचा संबध थेट सनातनशी जोडला गेला आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरही नेटिझन्सनी ट्रोल केले.याप्रकारानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेईल, असे म्हटले आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे मुख्यालय

रत्नागिरी - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीआघाडीने नविनचंद्र बांदिवडेकरांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांचे संबंध थेट सनातन संस्थेशी असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या आरोपांचे खंडन केले असून याचा कोणताही परिणाम आघाडीच्या कार्यकर्त्यांवर होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नविनचंद्र बांदिवडेकर यांच्यावरील आरोपांचे कार्यकर्त्यांकडून खंडण


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर सध्या अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसकडून उमेदवार म्हणून घोषित झालेल्या बांदिवडेकर यांचा संबध थेट सनातनशी जोडला गेला आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरही नेटिझन्सनी ट्रोल केले. याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. याप्रकारानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेईल, असे म्हटले आहे. मात्र, मतदारसंघातील आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बांदिवडेकरांचा पाठराखण केले आहे.

  • रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. काँग्रेस सनातनसारख्या कट्टरतावादी विचारांच्या विरोधात आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबाबत योग्य निर्णय घेईल.

    — Ashok Chavan (@AshokChavanINC) March 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


बांदिवडेकरांचा संबंध सनातनशी जोडल्यानंतरदेखील कार्यकर्ते रत्नागिरी जिल्ह्यातील आजही त्यांचा प्रचार करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही संभ्रम नाही. उलट हे आरोप झाल्यानंतर आणखी जोरात प्रचाराला लागणार असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. नविनचंद्र बांदिवडेकर हे एक चांगले काम करणारे व्यक्ती आहेत. ते निष्कलंक चारित्र्याचे असून त्यांना उमेदवारी मिळाल्याने ते निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, आणि त्यामुळेच विरोधकांनी ही खोटी आवई उठवल्याची प्रतिक्रिया भंडारी समाजाचे स्थानिक नेते आणि आघाडीचे कार्यकर्ते राजीव किर यांनी यावेळी दिली.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीआघाडीने नविनचंद्र बांदिवडेकरांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांचे संबंध थेट सनातन संस्थेशी असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या आरोपांचे खंडन केले असून याचा कोणताही परिणाम आघाडीच्या कार्यकर्त्यांवर होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नविनचंद्र बांदिवडेकर यांच्यावरील आरोपांचे कार्यकर्त्यांकडून खंडण


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर सध्या अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसकडून उमेदवार म्हणून घोषित झालेल्या बांदिवडेकर यांचा संबध थेट सनातनशी जोडला गेला आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरही नेटिझन्सनी ट्रोल केले. याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. याप्रकारानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेईल, असे म्हटले आहे. मात्र, मतदारसंघातील आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बांदिवडेकरांचा पाठराखण केले आहे.

  • रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. काँग्रेस सनातनसारख्या कट्टरतावादी विचारांच्या विरोधात आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबाबत योग्य निर्णय घेईल.

    — Ashok Chavan (@AshokChavanINC) March 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


बांदिवडेकरांचा संबंध सनातनशी जोडल्यानंतरदेखील कार्यकर्ते रत्नागिरी जिल्ह्यातील आजही त्यांचा प्रचार करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही संभ्रम नाही. उलट हे आरोप झाल्यानंतर आणखी जोरात प्रचाराला लागणार असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. नविनचंद्र बांदिवडेकर हे एक चांगले काम करणारे व्यक्ती आहेत. ते निष्कलंक चारित्र्याचे असून त्यांना उमेदवारी मिळाल्याने ते निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, आणि त्यामुळेच विरोधकांनी ही खोटी आवई उठवल्याची प्रतिक्रिया भंडारी समाजाचे स्थानिक नेते आणि आघाडीचे कार्यकर्ते राजीव किर यांनी यावेळी दिली.

Intro:काँग्रेस उमेदवार बांदिवडेरांवरील आरोपांचं कार्यकर्त्यांकडून खंडन

...उलट आम्ही जोमाने प्रचाराला लागलोय- कार्यकर्ते

विरोधकांनीच उठवलीय खोटी आवई - राजीव किर

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांडीवडेकरांचा संबंध थेट सनातन संस्थेशी जोडला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र याचा कोणताही परिणाम आघाडीच्या कार्यकर्त्यांवर झाला नसून, त्यांच्यावरील आरोप हे बिनबुडाचे असून उलट आम्ही कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागलो असल्याचं आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.. राजीव किर, कुमार शेट्ये, राकेश चव्हाण आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते..
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून काॅग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर सध्या अडचणीत सापडले आहेत. काॅग्रेसकडून उमेदवार म्हणून घोषीत झालेल्या बांदिवडेकर यांचा संबध थेट सनातनशी जोडला गेला आहे.. त्यामुळे सोशल मीडियावरही नेटिझन्सनी ट्रोल केलं आहे.. याचमुळे राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. या साऱ्या प्रकारानंतर रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातील आघाडीच्या कार्यकर्त्यांचा रोख काय आहे याचा आम्ही अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी जिल्ह्यातील काॅग्रेसचं मुख्यालय असलेल्या ठिकाणी वर्दळ तशी कमी होती. मात्र बांदिवडेकरांचा संबध सनातनशी जोडल्यानंतर देखील कार्यकर्ते आजही बांदिवडेकरांचा प्रचार करत असल्याचं चित्र पहायला मिळाले. काॅग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही संभ्रम नाही. उलट हे आरोप झाल्यानंतर आणखी जोरात प्रचाराला लागल्याचं काॅग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी सांगण्यात आलं. नविनचंद्र बांदिवडेकर हे एक चांगले काम करणारे व्यक्ती आहेत. ते निष्कलंक चारित्र्याचे असून त्यांना उमेदवारी मिळाल्याने ते निवडून येणार ही काळया दगडावरची रेघ आहे, आणि त्यामुळेच विरोधकानी ही खोटी आवई उठवल्याची प्रतिक्रीया भंडारी समाजाचे स्थानिक नेते आणि आघाडीचे कार्यकर्ते राजीव किर यांनी यावेळी दिली..
याचसंदर्भात रत्नागिरी काॅग्रेसच्या जिल्हा कार्यालयातून काॅग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट संवाद साधलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.Body:काँग्रेस उमेदवार बांदिवडेरांवरील आरोपांचं कार्यकर्त्यांकडून खंडन

...उलट आम्ही जोमाने प्रचाराला लागलोय- कार्यकर्ते

विरोधकांनीच उठवलीय खोटी आवई - राजीव किरConclusion:काँग्रेस उमेदवार बांदिवडेरांवरील आरोपांचं कार्यकर्त्यांकडून खंडन

...उलट आम्ही जोमाने प्रचाराला लागलोय- कार्यकर्ते

विरोधकांनीच उठवलीय खोटी आवई - राजीव किर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.