ETV Bharat / state

दाभोळ खाडीमध्ये पुन्हा एकदा मृत माशांचा खच; मासेमारी व्यवसाय धोक्यात

लोटे औद्योगीक वसाहतीतील रसायनमिश्रीत दूषित पाण्यामुळे दाभोळ खाडीतील मच्छी व्यवसाय धोक्यात आला आहे. ज्या वेळी खाडीत मासे मोठया प्रमाणात येतात, त्याचवेळी हे दूषित पाणी खाडीत सोडले जाते. मासे मृत होण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

author img

By

Published : Nov 13, 2019, 12:36 PM IST

मृत मासे

रत्नागिरी - करंबवणे, आयनी, भिले-केतकी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारपासून नदी काठालगत मृत माशांचा खच दिसत आहेत. लोटे येथील कारखान्यांचे प्रदूषित पाणी दाभोळच्या खाडीमध्ये सोडल्यामुळे मासे मेल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जल प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दाभोळ खाडीतील मच्छी व्यवसाय धोक्यात


लोटे औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रीत दूषित पाणी दाभोळ खाडीत सोडण्यात येते. त्यामुळे दाभोळ खाडीतील लाखो मासे दरवर्षी मृत्यूमुखी पडतात. मागील दोन दिवसांपासून, करंबवणे, भिले-केतकी, आयनी परिसरात दाभोळ खाडीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून येत आहेत. दरम्यान, या प्रकाराची माहिती सीईटीपी (सांडपाणी प्रक्रिया) व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा - कोकणात आजही जपली जातेय वाघबारसची प्रथा


लोटे औद्योगीक वसाहतीतील रसायनमिश्रीत दूषित पाण्यामुळे दाभोळ खाडीतील मच्छी व्यवसाय धोक्यात आला आहे. ज्या वेळी खाडीत मासे मोठया प्रमाणात येतात, त्याचवेळी हे दूषित पाणी खाडीत सोडले जाते. मासे मृत होण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? हा प्रश्न मच्छिमारांसमोर उभा आहे.
दरम्यान, सीईटीपी व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. प्रदूषित पाणी दाभोळ खाडीमध्ये सोडणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

रत्नागिरी - करंबवणे, आयनी, भिले-केतकी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारपासून नदी काठालगत मृत माशांचा खच दिसत आहेत. लोटे येथील कारखान्यांचे प्रदूषित पाणी दाभोळच्या खाडीमध्ये सोडल्यामुळे मासे मेल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जल प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दाभोळ खाडीतील मच्छी व्यवसाय धोक्यात


लोटे औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रीत दूषित पाणी दाभोळ खाडीत सोडण्यात येते. त्यामुळे दाभोळ खाडीतील लाखो मासे दरवर्षी मृत्यूमुखी पडतात. मागील दोन दिवसांपासून, करंबवणे, भिले-केतकी, आयनी परिसरात दाभोळ खाडीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून येत आहेत. दरम्यान, या प्रकाराची माहिती सीईटीपी (सांडपाणी प्रक्रिया) व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा - कोकणात आजही जपली जातेय वाघबारसची प्रथा


लोटे औद्योगीक वसाहतीतील रसायनमिश्रीत दूषित पाण्यामुळे दाभोळ खाडीतील मच्छी व्यवसाय धोक्यात आला आहे. ज्या वेळी खाडीत मासे मोठया प्रमाणात येतात, त्याचवेळी हे दूषित पाणी खाडीत सोडले जाते. मासे मृत होण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? हा प्रश्न मच्छिमारांसमोर उभा आहे.
दरम्यान, सीईटीपी व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. प्रदूषित पाणी दाभोळ खाडीमध्ये सोडणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Intro:दाभोळ खाडीमध्ये पुन्हा एकदा मृत माशांचा खच

कारखान्यांतील प्रदूषित पाणी खाडीत सोडल्याने माशांचा मृत्यू, ग्रामस्थांचा आरोप

रत्नागिरी, प्रतिनिधी

करंबवणे, आयनी, भिले -केतकी या परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मासे मेल्याची घटना घडली आहे. सोमवारपासून हे मृत मासे नदीच्या काठालगत मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. लोटे येथील कारखान्यांचे प्रदूषित पाणी दाभोळच्या खाडीमध्ये सोडल्यामुळे हे मासे मेल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जल प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीचे रसायनमिश्रीत दूषित पाणी दाभोळ खाडीत वारंवार सोडण्यात येते. त्यामुळे दाभोळ खाडीतील लाखो मासे दरवर्षी मृत्यू पावतात. आताही दोन दिवसांपासून, करंबवणे, भिले- केतकी, आयनी परिसरातल्या दाभोळ खाडीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच आढळून येत आहे. गेल्या पाच महिन्यांत मासे मृत होण्याचा हा दुसऱ्यांदा प्रकार घडला आहे. दरम्यान या सर्व प्रकारची माहिती सीईटीपी व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.
लोटे एमआयडीसीचे रसायनमिश्रीत दूषित पाणी सोडण्यात येऊ लागल्याने दाभोळ खाडीतील मच्छी व्यवसाय धोक्यात आला आहे. मासे मरतुकीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ज्या वेळी मासे मोठया प्रमाणात येतात नेमके त्याचवेळी पाणी खाडीत  सोडले जाते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न मच्छिमारांसमोर उभा आहे. त्यामुळे प्रदूषीत पाणी दाभोळ खाडीमध्ये सोडणार्या कारखान्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सध्या करण्यात येत आहे. दरम्यान सीईटीपी व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत..Body:दाभोळ खाडीमध्ये पुन्हा एकदा मृत माशांचा खच

कारखान्यांतील प्रदूषित पाणी खाडीत सोडल्याने माशांचा मृत्यू, ग्रामस्थांचा आरोपConclusion:दाभोळ खाडीमध्ये पुन्हा एकदा मृत माशांचा खच

कारखान्यांतील प्रदूषित पाणी खाडीत सोडल्याने माशांचा मृत्यू, ग्रामस्थांचा आरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.