ETV Bharat / state

..तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल; ओबीसींच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड नाही - भानुदास माळी - congress leader bhanudas mali

ओबीसींच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड काँग्रेस पक्ष राज्य पातळीवर असेल, देशपातळीवर असेल करणार नाही, त्यांच्या हिताला बाधा येईल अशी कोणतीही गोष्ट आमच्याकडून होणार नाही, आणि जर आमच्याकडून तसं काही झालं तर जनता आम्हाला माफ करणार नाही

भानुदास माळी
भानुदास माळी
author img

By

Published : Jun 16, 2021, 6:39 AM IST

Updated : Jun 16, 2021, 7:29 AM IST

रत्नागिरी - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे. ते मंगळवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. भानुदास माळी सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.

..तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल
काँग्रेस ओबीसींच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही चिपळूण येथे पत्रकार परिषदेत भानुदास माळी म्हणाले की, ओबीसींच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड काँग्रेस पक्ष राज्य पातळीवर असेल, देशपातळीवर असेल करणार नाही. त्यांच्या हिताला बाधा येईल अशी कोणतीही गोष्ट आमच्याकडून होणार नाही, आणि जर आमच्याकडून तसं काही झालं तर जनता आम्हाला माफ करणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी भानुदास माळी यांनी यावेळी दिला.

राज्यात सध्या आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच ओबीसी देखील आक्रमक झाले आहेत. त्यातच आजपासून मराठा समाजाचे आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोल्हापुरातून आंदोलन सुरु होत आहे.

रत्नागिरी - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे. ते मंगळवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. भानुदास माळी सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.

..तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल
काँग्रेस ओबीसींच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही चिपळूण येथे पत्रकार परिषदेत भानुदास माळी म्हणाले की, ओबीसींच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड काँग्रेस पक्ष राज्य पातळीवर असेल, देशपातळीवर असेल करणार नाही. त्यांच्या हिताला बाधा येईल अशी कोणतीही गोष्ट आमच्याकडून होणार नाही, आणि जर आमच्याकडून तसं काही झालं तर जनता आम्हाला माफ करणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी भानुदास माळी यांनी यावेळी दिला.

राज्यात सध्या आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच ओबीसी देखील आक्रमक झाले आहेत. त्यातच आजपासून मराठा समाजाचे आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोल्हापुरातून आंदोलन सुरु होत आहे.

Last Updated : Jun 16, 2021, 7:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.