ETV Bharat / state

कोरोनाचे संकट डोक्यावर असताना रायगड जिल्ह्यात आता पाणीटंचाई समस्या - पेण, रोहा, पोलादपूर, महाड मधील 119 गाव वाड्या तहानलेल्या

कोरोनाचे संकट डोक्यावर असताना रायगड जिल्ह्यात आता पाणी टंचाई समस्या सुरू झाली आहे. पेण, रोहा, पोलादपूर, महाड मधील 119 गाव वाड्या तहानलेल्या असून टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय.

Water supply problem in Raigad district
रायगड जिल्ह्यात आता पाणी टंचाई समस्या सुरू
author img

By

Published : Apr 16, 2020, 4:18 PM IST

रायगड : एकीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर टांगती तलवार घेऊन उभे ठाकले असताना जिल्ह्यात आता दरवर्षी प्रमाणे पाणीटंचाई समस्येने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील पेण, रोहा, पोलादपूर, महाड तालुक्यातील 119 गाववाड्यामध्ये पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे पाणी टंचाई सुरू झालेल्या गाव वाड्यावर आता 12 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. मात्र असे असतानाही जिल्हा प्रशासन रायगड जिल्हा हा टँकरमुक्त कधी करणार हा प्रश्न दरवर्षीप्रमाणे अनुत्तरीतच राहिला आहे.

रायगड जिल्ह्यात पाणी समस्या उग्र बनत चालली आहे

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस दरवर्षी पडत असून सरासरी तीन हजार मी. मी. पाऊस पडत असतो. 2019साली तर हा रेकॉर्ड तोडून साडेचार हजार मी. मी. पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागणार नाही, असे चित्र तयार झाले होते. मात्र योग्य नियोजन अभावामुळे यावर्षीही पाणीटंचाई समस्येने डोके वर काढले आहे. दरवर्षी जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार केला जातो. यावर्षी हा आराखडा नऊ कोटीच्या घरात गेला आहे. दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखड्यात वाढ होत चालली आहे. मात्र पाणी टंचाई समस्या जैसे थी राहिली आहे.

एप्रिल महिना सुरू झाला की पाणी समस्या डोके वर काढत असते. जिल्ह्यातील पेण, रोहा, पोलादपूर, महाड या तालुक्यातील दुर्गम गाव वाड्यावर पाणी टंचाई समस्या सुरू झाली आहे. पेण तालुक्यात 9 गावे, 61 वाड्या, रोहा तालुक्यात 4 गाव, 2 वाड्या, महाड तालुक्यात 1 गाव 2 वाड्या, तर पोलासपूर तालुक्यात 13 गाव, 27 वाड्या अशा 119 गाव वाड्या तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. तर रोहा तालुक्यातील 2896 लोक पाणी समस्येने बाधित झाले आहे.

दरवर्षी उत्पन्न होणाऱ्या पाणी समस्येमुळे घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत असते. पेण गटास सात, पोलादपूर 3 तर महाड साठी 2 टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. तर उर्वरित ठिकाणी टँकरना जीपीएस ट्रेंकिंग सिस्टम लावल्यानंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. कोरोनासारख्या शत्रूला हरविण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असताना जिल्ह्यातील दरवर्षी उत्पन्न होणारी पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कायमस्वरूपी पावले उचलणे महत्वाचे आहे.

रायगड : एकीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर टांगती तलवार घेऊन उभे ठाकले असताना जिल्ह्यात आता दरवर्षी प्रमाणे पाणीटंचाई समस्येने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील पेण, रोहा, पोलादपूर, महाड तालुक्यातील 119 गाववाड्यामध्ये पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे पाणी टंचाई सुरू झालेल्या गाव वाड्यावर आता 12 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. मात्र असे असतानाही जिल्हा प्रशासन रायगड जिल्हा हा टँकरमुक्त कधी करणार हा प्रश्न दरवर्षीप्रमाणे अनुत्तरीतच राहिला आहे.

रायगड जिल्ह्यात पाणी समस्या उग्र बनत चालली आहे

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस दरवर्षी पडत असून सरासरी तीन हजार मी. मी. पाऊस पडत असतो. 2019साली तर हा रेकॉर्ड तोडून साडेचार हजार मी. मी. पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागणार नाही, असे चित्र तयार झाले होते. मात्र योग्य नियोजन अभावामुळे यावर्षीही पाणीटंचाई समस्येने डोके वर काढले आहे. दरवर्षी जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार केला जातो. यावर्षी हा आराखडा नऊ कोटीच्या घरात गेला आहे. दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखड्यात वाढ होत चालली आहे. मात्र पाणी टंचाई समस्या जैसे थी राहिली आहे.

एप्रिल महिना सुरू झाला की पाणी समस्या डोके वर काढत असते. जिल्ह्यातील पेण, रोहा, पोलादपूर, महाड या तालुक्यातील दुर्गम गाव वाड्यावर पाणी टंचाई समस्या सुरू झाली आहे. पेण तालुक्यात 9 गावे, 61 वाड्या, रोहा तालुक्यात 4 गाव, 2 वाड्या, महाड तालुक्यात 1 गाव 2 वाड्या, तर पोलासपूर तालुक्यात 13 गाव, 27 वाड्या अशा 119 गाव वाड्या तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. तर रोहा तालुक्यातील 2896 लोक पाणी समस्येने बाधित झाले आहे.

दरवर्षी उत्पन्न होणाऱ्या पाणी समस्येमुळे घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत असते. पेण गटास सात, पोलादपूर 3 तर महाड साठी 2 टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. तर उर्वरित ठिकाणी टँकरना जीपीएस ट्रेंकिंग सिस्टम लावल्यानंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. कोरोनासारख्या शत्रूला हरविण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असताना जिल्ह्यातील दरवर्षी उत्पन्न होणारी पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कायमस्वरूपी पावले उचलणे महत्वाचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.