ETV Bharat / state

उन्हाळा नाही तरीही पनवेलकरांवर पाणीटंचाईचे सावट!

महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर पनवेल शहराची पाणी समस्या नष्ट होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, मागील तीन वर्षांत याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे.

author img

By

Published : Dec 21, 2019, 10:10 PM IST

पनवेल पाणी टंचाई
पनवेल पाणी टंचाई

रायगड - डिसेंबर महिन्यातच पनवेलमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. पनवेलमध्ये यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली, तरीही आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे पनवेलकरांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

पनवेलकरांवर पाणीटंचाईचे सावट


पनवेल शहराला दररोज सुमारे तीस दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. त्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चार ते पाच एमएलडी आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून सहा एमएलडी पाणीपुरवठा शहराला केला जातो. सध्या देहरंग धरणात दीड हजार दशलक्ष लिटर पाणी आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. या वर्षीही तशी परिस्थिती येऊ नये म्हणून पालिकाप्रशासनाने आत्तापासूनच पाणी एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - मुंबई महानगरपालिका मुख्यालयात काचा फुटून झालेल्या अपघातानंतर आता अ‍ॅक्रॅलिकचा वापर

वेगवेगळ्या विभागात चार वेगवेगळ्या दिवशी पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे एकत्रितपणे पनवेलकरांवर याचा ताण पडणार नाही. उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या पाण्याच्या तुटवड्यावर नियोजन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिन्याला सुमारे 120 एमएलडी पाण्याची बचत होणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांनी दिली.


महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर पनवेल शहराची पाणी समस्या नष्ट होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, मागील तीन वर्षांत याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. पाणीकपातीच्या या निर्णयाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक सतीश पाटील यांनी विरोध करून निषेध व्यक्त केला आहे. येत्या महासभेत हा प्रश्न लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या पाणी कपातीमुळे विशेष करून महिलांना खूप त्रास होणार असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. धरणांमध्ये पाणीसाठा शिल्लक असताना पाणीकपात कशाला? असा प्रश्न महिला रहिवाशांनी केला आहे.

रायगड - डिसेंबर महिन्यातच पनवेलमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. पनवेलमध्ये यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली, तरीही आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे पनवेलकरांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

पनवेलकरांवर पाणीटंचाईचे सावट


पनवेल शहराला दररोज सुमारे तीस दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. त्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चार ते पाच एमएलडी आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून सहा एमएलडी पाणीपुरवठा शहराला केला जातो. सध्या देहरंग धरणात दीड हजार दशलक्ष लिटर पाणी आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. या वर्षीही तशी परिस्थिती येऊ नये म्हणून पालिकाप्रशासनाने आत्तापासूनच पाणी एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - मुंबई महानगरपालिका मुख्यालयात काचा फुटून झालेल्या अपघातानंतर आता अ‍ॅक्रॅलिकचा वापर

वेगवेगळ्या विभागात चार वेगवेगळ्या दिवशी पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे एकत्रितपणे पनवेलकरांवर याचा ताण पडणार नाही. उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या पाण्याच्या तुटवड्यावर नियोजन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिन्याला सुमारे 120 एमएलडी पाण्याची बचत होणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांनी दिली.


महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर पनवेल शहराची पाणी समस्या नष्ट होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, मागील तीन वर्षांत याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. पाणीकपातीच्या या निर्णयाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक सतीश पाटील यांनी विरोध करून निषेध व्यक्त केला आहे. येत्या महासभेत हा प्रश्न लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या पाणी कपातीमुळे विशेष करून महिलांना खूप त्रास होणार असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. धरणांमध्ये पाणीसाठा शिल्लक असताना पाणीकपात कशाला? असा प्रश्न महिला रहिवाशांनी केला आहे.

Intro:सोबत व्हिडीओ आणि बाईट जोडल्या आहेत.

पनवेल

पावसाळासंपत नाही तोच पनवेलमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. पनवेलमध्ये यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली तरीही पनवेलकरांच्या पाचवीला पूजेलेलं पाणीसंकट काही जायचं नाव घेत नाहीये. येत्या काळात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पनवेल महापालिकेने घेतल्यानं पनवेलकरांमध्ये नाराजी दिसून येत आहे. Body:पनवेल शहराला सुमारे ३० एमएलडी इतक्या पाण्याची गरज आहे. त्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ४ ते पाच एमएलडी आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून सहा एमएलडी पाणीपुरवठा शहराला केला जातो. देहरंग धरणात दीड हजार दशलक्ष लिटर पाणी आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात पनवेलमध्ये तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता.


शहरातील प्रत्येक क्षेत्रात आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा होणार नाही यासाठी शहरात रिक्षातून भोंग्याने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर पनवेल शहर हे पाण्यामध्ये समृद्ध होईल अशी अपेक्षा होती. मात्र मागील तीन वर्षांत याबाबत कोणतीही ठोस पावले राज्य पातळीवर सरकाने गतिमान पद्धतीने उचलली गेली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.


पाणीकपात वेगवेगळ्या विभागात चार वेगवेगळ्या दिवशी केल्याने एकत्रितपणे पनवेलकरांवर त्याचा अतिरिक्त ताण पडणार नाही. महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढल्याने या धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. सव्वीसशे एमएलडी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची साठवण क्षमता सतराशे एम एल डी वर येऊन पोहोचली आहे.

उन्हाळ्यातच निर्माण होणार्‍या पाण्याच्या तुटवड्यावर नियोजन करण्याच्या दृष्टीने महिन्याला सुमारे 120 एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. त्यादृष्टीने नियोजन केले असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांनी सांगितले आहे

बाईट: प्रशांत रसाळ,अतिरिक्त आयुक्त, पनवेल पालिकाConclusion:मात्र ह्या पाणीकपातीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक सतीश पाटील यांनी विरोध दर्शवत निषेध व्यक्त केला आहे. येत्या महासभेत हा प्रश्न लावून धरण्याचे त्यांनी सांगितले आहे.

बाईट:सतीश पाटील,नगरसेवक

या पाणी कपातीमुळे विशेष करून महिलांना खूप त्रास होणार असल्याचे रहिवाशांचे म्हणणं आहे. पाणीसाठा असताना पाणीकपात कशाला? असा प्रश्न या रहिवाशांनी व्यक्त केला आहे

बाईट:कांचन वडगावकर, रहिवाशी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.