रायगड - जागतिक आदिवासी दिनानिमित्त अलिबाग शहरात आदिवासी बांधवांनी आपली पारंपरिक वेशभूषा करून फेरी काढली. यावेळी आदिवासी बांधवांनी लाकडाच्या मोळ्या, रानभाज्या घेऊन नृत्य केले. शहरात फेरी काढल्यानंतर आदिवासी बांधवांसाठी भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
रायगडमध्ये आदिवासी दिन उत्साहात साजरा; पारंपरिक वेशभूषा ठरली लक्षवेधी
9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. रायगडमध्येही अलिबाग शहरात आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषा करून फेरी काढली होती.
![रायगडमध्ये आदिवासी दिन उत्साहात साजरा; पारंपरिक वेशभूषा ठरली लक्षवेधी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4088692-thumbnail-3x2-raigad-day.jpg?imwidth=3840)
अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, कृष्णा पिंगळा, अध्यक्ष भगवान नाईक, जयपाल पाटील व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी पुरूषांनी आपली पारंपरिक हत्यारे घेऊन, तसेच काठ्यांवर चालून मिरवणुकीत भाग घेतला होता. तर महिला वर्ग डोक्यात रानफुले घालून आदिवासी गाणी आणि संगीतावर ठेका धरून नाचत होत्या.
आदिवासी समाज हा आजही आपली पारंपरिक संस्कृती टिकवून ठेवत आहे. 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. आदिवासी समाज हा पूर्वापार जंगलात राहत आहे. आजही हा समाज डोंगरदऱ्यांत आपल्या कुटूंबासह राहतो. शासनाकडून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आदिवासींसाठी अनेक योजना शासनस्तरावर आहेत. मात्र आजही हा समाज आर्थिकदृष्ट्या मागासच राहिलेला दिसतो. आदिवासी समाज हा अजूनही मुख्य प्रवाहात पूर्णतः आलेला नाही. त्यामुळे या समाजाने याबाबत पुढच्या पिढीचा विचार करून मुख्य प्रवाहासोबत येऊन आपली प्रगती साधणे गरजेचे आहे.
रायगड - जागतिक आदिवासी दिनानिमित्त अलिबाग शहरात आदिवासी बांधवांनी आपली पारंपरिक वेशभूषा करून फेरी काढली. यावेळी आदिवासी बांधवांनी लाकडाच्या मोळ्या, रानभाज्या घेऊन नृत्य केले. शहरात फेरी काढल्यानंतर आदिवासी बांधवांसाठी भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, कृष्णा पिंगळा, अध्यक्ष भगवान नाईक, जयपाल पाटील व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी पुरूषांनी आपली पारंपरिक हत्यारे घेऊन, तसेच काठ्यांवर चालून मिरवणुकीत भाग घेतला होता. तर महिला वर्ग डोक्यात रानफुले घालून आदिवासी गाणी आणि संगीतावर ठेका धरून नाचत होत्या.
आदिवासी समाज हा आजही आपली पारंपरिक संस्कृती टिकवून ठेवत आहे. 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. आदिवासी समाज हा पूर्वापार जंगलात राहत आहे. आजही हा समाज डोंगरदऱ्यांत आपल्या कुटूंबासह राहतो. शासनाकडून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आदिवासींसाठी अनेक योजना शासनस्तरावर आहेत. मात्र आजही हा समाज आर्थिकदृष्ट्या मागासच राहिलेला दिसतो. आदिवासी समाज हा अजूनही मुख्य प्रवाहात पूर्णतः आलेला नाही. त्यामुळे या समाजाने याबाबत पुढच्या पिढीचा विचार करून मुख्य प्रवाहासोबत येऊन आपली प्रगती साधणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधव रॅलीत सहभागी
आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या आजही मागासच
रायगड : जागतिक आदिवासी दिनानिमित्त अलिबाग शहरात आदिवासी महिला, पुरुष बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत नाचतगाजत फेरी काढली. यावेळी आदिवासी बांधव लाकडाची मोळी, रानभाज्या घेऊन नाचगण्यात रंगली होती. शहरात फेरी काढल्यानंतर आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये आयोजित केले होते.
अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, कृष्णा पिंगळा, अध्यक्ष भगवान नाईक, जयपाल पाटील व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.Body:अलिबागेत आज आदिवासी बांधवांनी स्वतःचा आपला हा एक दिवस स्वछदीपणे जगण्यासाठी आपल्या पारंपरिक वेशभूषेत शहरातून नाचत गाजत फेरी काढली. यावेळी आदिवासी बांधवांनी आपली पारंपरिक हत्यारे घेऊन तसेच काठ्यांवर चालून रॅलीत सहभाग घेतला होता. तर महिला वर्ग डोक्यात रान फुले घालून गाणी बोलत संगीतावर ठेका धरून नाचत होत्या. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. आदिवासी समाज हा आजही आपली पारंपरिक संस्कृती टिकून ठेवत आहे. शहरात फेरी मारून झाल्यानंतर भाग्यलक्ष्मी हॉल येथे आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. आदिवासी समाज हा पूर्वापार पासून जंगलात राहत आहे. आजही हा समाज डोंगर दऱ्यात आपल्या कुटूंबासह राहत आहे. शासनाकडून या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आदिवासीसाठी अनेक योजना शासनस्तरावर आहेत. मात्र आजही हा समाज आर्थिकदृष्ट्या मागासच राहिलेला आहे.Conclusion:आदिवासी समाज हा अजूनही मुख्य प्रवाहात पूर्णतः आलेला नाही. या समाजातील पिढी आजही शिक्षित नाही. जंगलातील रानभाज्या, लाकूड विकून हा समाज आपला उदरनिर्वाह करीत आहे. शिक्षणाची दारे शासनाने खुली करून दिलेली असतानाही आजही आदिवासी समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत. त्यामुळे शिक्षण नसल्याने नोकरीच्या संधी मिळत नाहीत. त्यामुळे शेतावर, वीटभट्टी वा मोलमजुरी करण्यातच याचे आयुष्य जात आहे.
9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा होत असताना आजही स्वातंत्र्यानंतरही आदिवासी समाज बांधव दिनच राहिला आहे. त्यामुळे समाजाने याबाबत पुढच्या पिढीचा विचार करून मुख्य प्रवाहसोबत येऊन आपली प्रगती साधणेही गरजेचे आहे. तरच आदिवासी दिन साजरा होण्याचे समाधान समाजाला मिळू शकते.