ETV Bharat / state

शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शिवसेनेची मागणी

author img

By

Published : Nov 25, 2019, 3:08 PM IST

शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांना दिले. तसेच जिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबतही शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकिस्तकांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची अलिबाग शिवसैनिकांकडून मागणी

रायगड - राज्यात सर्वत्र परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. रायगड जिल्हा देखील याला अपवाद नसून, येथील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी अलिबाग तालुक्यातील शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेत त्यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, याबाबतचे निवेदन दिले.

शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई देण्याची अलिबाग येथील शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून मागणी...

हेही वाचा... जन्मदातीने भरथंडीत रस्त्यावर सोडले, मुलगा गमावलेल्या दाम्पत्यानी दिली मायेची उब

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रमाणेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपुऱ्या सोईसुविधांबाबत या शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकिस्तकांची भेट घेत त्यांनाही निवेदन दिले. शिवसेनेच्या या शिष्टमंडळात शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी, संघटक सतीश पाटील, माजी सरपंच शंकर गुरव, संतोष निगडे, सुरेश म्हात्रे, शहरप्रमुख संदीप पालकर, मारुती भगत, सरपंच प्रफुल पाटील, नंदकुमार पाटील यांचा समावेश होता.

हेही वाचा... देशभरातील बीएसएनएल कर्मचारी संघटनांचे आज उपोषण

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ऐंशी टक्के शेतीचे नुकसान झाले. हजारो शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक पावसाने वाया गेले. त्यामुळे शासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. ती लवकरात लवकर मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा... जे पेरलं तेच उगवलं! वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पवारांना निसर्गाचं उत्तरं - शालीनीताई पाटील

जिल्हा रुग्णालय हेच विविध समस्यांना ग्रासलेले आहे. डॉक्टरांची कमतरता असल्याने जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागत आहे. अथवा खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. या समस्येबाबत शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. अजित गवळी यांची भेट घेत, प्रश्न विचारले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी कारभार लवकरात लवकर सुधारावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा... 'चार वजा तीन'... राष्ट्रवादीचे 3 आमदार स्वगृही

तुम्हीच रुग्णालयाला डॉक्टर द्या... जिल्हा शल्यचिकिस्तकांचे अजब उत्तर

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना मानधन दिले नसल्याने ते कामावर येत नाही. डॉक्टरांचे मानधन देण्याबाबत शासनाला कळविले असल्याचे डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावर नवीन डॉक्टरांची भरती करण्याबाबत शिष्टमंडळाने सुचवले असता, तुम्हीच डॉक्टर द्या, असे अजब उत्तर डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला दिले.

रायगड - राज्यात सर्वत्र परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. रायगड जिल्हा देखील याला अपवाद नसून, येथील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी अलिबाग तालुक्यातील शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेत त्यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, याबाबतचे निवेदन दिले.

शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई देण्याची अलिबाग येथील शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून मागणी...

हेही वाचा... जन्मदातीने भरथंडीत रस्त्यावर सोडले, मुलगा गमावलेल्या दाम्पत्यानी दिली मायेची उब

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रमाणेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपुऱ्या सोईसुविधांबाबत या शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकिस्तकांची भेट घेत त्यांनाही निवेदन दिले. शिवसेनेच्या या शिष्टमंडळात शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी, संघटक सतीश पाटील, माजी सरपंच शंकर गुरव, संतोष निगडे, सुरेश म्हात्रे, शहरप्रमुख संदीप पालकर, मारुती भगत, सरपंच प्रफुल पाटील, नंदकुमार पाटील यांचा समावेश होता.

हेही वाचा... देशभरातील बीएसएनएल कर्मचारी संघटनांचे आज उपोषण

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ऐंशी टक्के शेतीचे नुकसान झाले. हजारो शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक पावसाने वाया गेले. त्यामुळे शासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. ती लवकरात लवकर मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा... जे पेरलं तेच उगवलं! वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पवारांना निसर्गाचं उत्तरं - शालीनीताई पाटील

जिल्हा रुग्णालय हेच विविध समस्यांना ग्रासलेले आहे. डॉक्टरांची कमतरता असल्याने जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागत आहे. अथवा खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. या समस्येबाबत शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. अजित गवळी यांची भेट घेत, प्रश्न विचारले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी कारभार लवकरात लवकर सुधारावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा... 'चार वजा तीन'... राष्ट्रवादीचे 3 आमदार स्वगृही

तुम्हीच रुग्णालयाला डॉक्टर द्या... जिल्हा शल्यचिकिस्तकांचे अजब उत्तर

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना मानधन दिले नसल्याने ते कामावर येत नाही. डॉक्टरांचे मानधन देण्याबाबत शासनाला कळविले असल्याचे डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावर नवीन डॉक्टरांची भरती करण्याबाबत शिष्टमंडळाने सुचवले असता, तुम्हीच डॉक्टर द्या, असे अजब उत्तर डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला दिले.

Intro:शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या

शिवसेना शिष्टमंडळाने तहसीलदार यांना दिले निवेदन

जिल्हा रुग्णालयातील समस्येबाबतही शिष्टमंडळाने घेतली जिल्हा शल्यचिकिस्तक यांची भेट

तुम्हीच डॉक्टर देण्याची जिल्हा शल्यचिकिस्तकाचे उत्तर




रायगड : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिबसेना शिष्टमंडळाने अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ याची भेट घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या याबाबत निवेदन दिले.

तालुकाप्रमुख राजा केणी, संघटक सतीश पाटील, माजी सरपंच शंकर गुरव, संतोष निगडे, सुरेश म्हात्रे, शहरप्रमुख संदीप पालकर, मारुती भगत, सरपंच प्रफुल पाटील, नंदकुमार पाटील या शिष्टमंडळाने तहसीलदार याची भेट घेतली.





.Body:अवेळी पावसाने जिल्ह्यातील ऐशी टक्के भातशेतीचे नुकसान झाले. त्यामुळे हजारो शेतकऱ्याची भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक पावसाने वाया गेले. शासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या या समस्येबाबत तालुकास्तरावर तहसीलदार यांना भेटून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्याबाबत शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आज अलिबाग तालुका शिवसेनेतर्फे शिष्टमंडळाने तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या अशी सूचना शिष्टमंडळाने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.Conclusion:जिल्हा शल्यचिकिस्तक यांचीही शिष्टमंडळाने घेतली भेट

जिल्हा सामान्य रुग्णालय हे सध्या समस्येने ग्रासलेले आहे. डॉक्टरांची कमतरता असल्याने जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागत आहे अथवा खाजगी रुग्णालय किंवा मुंबईकडे धाव घ्यावी लागत आहे. या समस्येबाबत शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. अजित गवळी याची भेट घेऊन जाब विचारला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी कारभार लवकरात लवकर सुधारावा अशी तंबीही शिष्टमंडळाने दिली आहे.

------------------------

तुम्हीच रुग्णालयाला डॉक्टर द्या, जिल्हा शल्यचिकिस्तक यांचे अजब उत्तर

जिल्हा रुग्णालयातील एनआरएचएम डॉक्टरांना मानधन दिले नसल्याने ते कामावर येत नाही. डॉक्टरांचे मानधन देण्याबाबत शासनाला कळविले असल्याचे डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावर नवीन डॉक्टरांची भरती करण्याबाबत शिष्टमंडळाने सांगितले असता, तुम्हीच डॉक्टर द्या असे अजब उत्तर डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला दिले. या उत्तराने सारेच निरुत्तर झाले

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.