ETV Bharat / state

फुटपाथ सुविधांचा प्रशासनाला पडला विसर; पादचाऱ्यांना मनस्ताप - No foothpaths for pedestrians in Raigad

जिल्ह्यातील काही शहरात फुटपाथ केलेले असले तरी छोट्या व्यवसायिकांना ते आंदण दिले आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

फुटपाथच्या सुविधेचा अभाव
फुटपाथच्या सुविधेचा अभाव
author img

By

Published : Feb 22, 2021, 8:10 PM IST

Updated : Feb 22, 2021, 9:33 PM IST

रायगड - जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण हे जास्त असले तरी शहरात फुटपाथ अपघात घटना घडलेल्या नाहीत. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील शहरातील स्थानिक प्रशासनाने नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथची सुविधा निर्माण केली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना गर्दीमध्ये जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

जिल्ह्यातील काही शहरात फुटपाथ केलेले असले तरी छोट्या व्यवसायिकांना ते आंदण दिले आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्यावर चालण्याचा पहिला अधिकार हा पादचाऱ्यांचा आहे. मात्र, शहरातील रस्त्यावर वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे चालणाऱ्या पादचाऱ्यांना चालताना कसरत करावी लागत आहे. मुंबई, पुणे, ठाणे तसेच इतर मोठ्या शहरात रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांसाठी फुटपाथची सुविधा करण्यात आलेली असते. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शहरामध्ये फुटपाथ सुविधा ही मात्र कुठेच पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून वयस्कर व लहान मुले यांना फुटपाथ नसल्याने रस्त्याच्या कडेने चालावे लगत असते. त्यामुळे अनेकवेळा वाहनांची ठोकर बसून अपघात होण्याची शक्यता वाढत आहे.

फुटपाथ सुविधांचा प्रशासनाला पडला विसर

हेही वाचा-कोरोनाच्या लसीकरणात भारताला प्राधान्य; संयम बाळगण्याचे सीरमकडून देशांना आवाहन

फुटपाथ हे छोट्या व्यवसायिकांना आदण

No footpath on the road
फुटपाथच्या सुविधेचा अभाव
रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने लाखो पर्यटक हे जिल्ह्यात पर्यटनासाठी येत असतात. अलिबाग, पेण, माणगाव, इंदापूर, महाड, पोलादपूर, कर्जत, खालापूर हे तालुके आहेत. त्यामुळे याठिकाणी पर्यटक तसेच नागरिकांची ये-जा असते. या शहरात चालत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना फुटपाथ सुविधा नसल्याने वाहनांची गर्दी चुकवित रस्ता काढावा लागतो. काही शहरात स्थानिक प्रशासनाने चालण्यासाठी फुटपाथ तयार केले आहेत. मात्र, या फुटपाथवर छोटे व्यावसायिकांनी कब्जा केला असल्याने नागरिकांना रस्त्याच्या कडेने चालावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने केलेले फुटपाथ हे नागरिकांसाठी केले आहेत की व्यावसायिकांसाठी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
encroachment on footpath
फुटपाथवर विक्रेत्यांचे अतिक्रमण

हेही वाचा-संगमनेरच्या ग्रुपकडून करचुकवेगिरीचा संशय; आयटी विभागाचे राज्यात ३४ मालमत्तांवर छापे



फुटपाथ अपघाताच्या घटना जिल्ह्यात नाहीत, पण...

encroachment on footpath
फुटपाथवर विक्रेत्यांचे अतिक्रमण
मोठ्या शहरात फुटपाथवर झोपणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्यांना वाहनाने चिरडण्याच्या घटना नेहमी घडत असतात. रायगड जिल्ह्यात सुदैवाने अशा अपघाताच्या घटना अद्यापही घडलेल्या नाहीत. फुटपाथ हे नागरिकांसाठी चालण्यासाठी असल्याने त्यावर चालण्याचा अधिकार हा पादचाऱ्यांचा आहे. मात्र फुटपाथवर छोट्या व्यावसायिकांनी कब्जा केला असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने फुटपाथ बनवून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे महत्वाचे आहे. मात्र, याकडे कुठेतरी कानाडोळा होताना दिसत आहे.

रायगड - जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण हे जास्त असले तरी शहरात फुटपाथ अपघात घटना घडलेल्या नाहीत. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील शहरातील स्थानिक प्रशासनाने नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथची सुविधा निर्माण केली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना गर्दीमध्ये जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

जिल्ह्यातील काही शहरात फुटपाथ केलेले असले तरी छोट्या व्यवसायिकांना ते आंदण दिले आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्यावर चालण्याचा पहिला अधिकार हा पादचाऱ्यांचा आहे. मात्र, शहरातील रस्त्यावर वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे चालणाऱ्या पादचाऱ्यांना चालताना कसरत करावी लागत आहे. मुंबई, पुणे, ठाणे तसेच इतर मोठ्या शहरात रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांसाठी फुटपाथची सुविधा करण्यात आलेली असते. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शहरामध्ये फुटपाथ सुविधा ही मात्र कुठेच पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून वयस्कर व लहान मुले यांना फुटपाथ नसल्याने रस्त्याच्या कडेने चालावे लगत असते. त्यामुळे अनेकवेळा वाहनांची ठोकर बसून अपघात होण्याची शक्यता वाढत आहे.

फुटपाथ सुविधांचा प्रशासनाला पडला विसर

हेही वाचा-कोरोनाच्या लसीकरणात भारताला प्राधान्य; संयम बाळगण्याचे सीरमकडून देशांना आवाहन

फुटपाथ हे छोट्या व्यवसायिकांना आदण

No footpath on the road
फुटपाथच्या सुविधेचा अभाव
रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने लाखो पर्यटक हे जिल्ह्यात पर्यटनासाठी येत असतात. अलिबाग, पेण, माणगाव, इंदापूर, महाड, पोलादपूर, कर्जत, खालापूर हे तालुके आहेत. त्यामुळे याठिकाणी पर्यटक तसेच नागरिकांची ये-जा असते. या शहरात चालत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना फुटपाथ सुविधा नसल्याने वाहनांची गर्दी चुकवित रस्ता काढावा लागतो. काही शहरात स्थानिक प्रशासनाने चालण्यासाठी फुटपाथ तयार केले आहेत. मात्र, या फुटपाथवर छोटे व्यावसायिकांनी कब्जा केला असल्याने नागरिकांना रस्त्याच्या कडेने चालावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने केलेले फुटपाथ हे नागरिकांसाठी केले आहेत की व्यावसायिकांसाठी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
encroachment on footpath
फुटपाथवर विक्रेत्यांचे अतिक्रमण

हेही वाचा-संगमनेरच्या ग्रुपकडून करचुकवेगिरीचा संशय; आयटी विभागाचे राज्यात ३४ मालमत्तांवर छापे



फुटपाथ अपघाताच्या घटना जिल्ह्यात नाहीत, पण...

encroachment on footpath
फुटपाथवर विक्रेत्यांचे अतिक्रमण
मोठ्या शहरात फुटपाथवर झोपणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्यांना वाहनाने चिरडण्याच्या घटना नेहमी घडत असतात. रायगड जिल्ह्यात सुदैवाने अशा अपघाताच्या घटना अद्यापही घडलेल्या नाहीत. फुटपाथ हे नागरिकांसाठी चालण्यासाठी असल्याने त्यावर चालण्याचा अधिकार हा पादचाऱ्यांचा आहे. मात्र फुटपाथवर छोट्या व्यावसायिकांनी कब्जा केला असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने फुटपाथ बनवून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे महत्वाचे आहे. मात्र, याकडे कुठेतरी कानाडोळा होताना दिसत आहे.
Last Updated : Feb 22, 2021, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.