रायगड - अलिबागची शान असलेल्या कुलाबा किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊन भावी पिढीला किल्ल्याचा इतिहास कळावा, या दृष्टीने राज्य शासन आणि केंद्रामार्फत पावले उचलली जात आहेत, असे राज्य पर्यटनमंत्री, पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.

हेही वाचा - विदर्भातील 'या' भाजपा आमदाराने घेतला वरळीत 42.5 कोटींचा फ्लॅट
कुलाबा किल्याच्या पडझडीबाबत 46 लाखाचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. कामाची निविदा लवकरच निघणार असून नोव्हेंबरपर्यंत कामाला सुरुवात केली जाणार आहे. पुरातत्व अधिकारी यांच्यात समन्वय साधून किल्ल्याची डागडुजी केली जाणार आहे. किल्ल्यात होणाऱ्या माघी गणेशोत्सव जयंतीबाबतही पुरातत्व अधिकाऱ्यांशी बोलणी झाली आहेत. तसेच, कुलाबा किल्ल्याचा इतिहास येणाऱ्या पर्यटकांना कळावा यासाठी स्थानिक गाईड नेमले जाणार आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून पुन्हा किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून दिले जाणार आहे, असे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
किल्ल्यातील स्वच्छतागृह, पाणी समस्याही सोडविण्यात येणार आहे. कुलाबा किल्ल्यातील ऐतिहासिक असलेल्या तोफा तसेच इतर पुरातन वस्तूंचे जतन करून पर्यटकांसाठी पाहण्यासाठी एका दालनात ठेवले जाणार आहे. किल्ल्याचा इतिहास हा भावी पिढीला कळावा, यादृष्टीने कुलब्याला पुन्हा गतवैभव मिळवून देणारा आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा - कोल्हापूर : खासगी हॉस्पिटल लूट करत असतील तर, तक्रार करा - सतेज पाटील