ETV Bharat / state

कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू, सुरक्षेच्या दृष्टीने थांबवल्या होत्या गाड्या

author img

By

Published : Jul 27, 2019, 2:56 PM IST

माणगावच्या घोट नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे वाहतूक साडे दहा पासून थांबविण्यात आली होती. दुपारी दीड वाजता रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

Kokan railway service started again trains were stopped due to heavy rain

रायगड - बदलापूर वांगणी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या धर्तीवर कोकण रेल्वे मार्गावर असा प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून, कोकण रेल्वेने पॅसेंजर गाड्या रेल्वे स्थानकांवर थांबविल्या होत्या. यासोबतच माणगावच्या घोट नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे वाहतूक सकाळी साडेदहा पासून थांबविण्यात आली होती. दुपारी दीड वाजता रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

रत्नागिरी-दादर एक्स्प्रेस वीर येथे, दिवा-सावंतवाडी कोलाड येथे, मंगल एक्स्प्रेस करंजाडी येथे तर मांडवी एक्सप्रेस रोहा येथे थांबविण्यात आली होती. मात्र, आता रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली.

रायगड - बदलापूर वांगणी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या धर्तीवर कोकण रेल्वे मार्गावर असा प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून, कोकण रेल्वेने पॅसेंजर गाड्या रेल्वे स्थानकांवर थांबविल्या होत्या. यासोबतच माणगावच्या घोट नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे वाहतूक सकाळी साडेदहा पासून थांबविण्यात आली होती. दुपारी दीड वाजता रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

रत्नागिरी-दादर एक्स्प्रेस वीर येथे, दिवा-सावंतवाडी कोलाड येथे, मंगल एक्स्प्रेस करंजाडी येथे तर मांडवी एक्सप्रेस रोहा येथे थांबविण्यात आली होती. मात्र, आता रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली.

Intro:
खबरदारी म्हणून कोकण रेल्वे पॅसेंजर गाड्या स्थानकावर थांबविल्या

दीड वाजता कोकण रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू


रायगड : बदलापूर वांगणी येथे पुराच्या पाण्यात अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या धर्तीवर कोकण रेल्वे मार्गावर असा खबरदारी म्हणून असा प्रकार घडू नये यासाठी कोकण रेल्वेने पॅसेंजर गाड्या रेल्वे स्थानकावर थांबविल्या होत्या. तर माणगावच्या घोट नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असल्याने रेल्वे रुळावर पाणी आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे वाहतूक साडे दहा पासून थांबविण्यात आली आहे. दीड वाजता रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.Body:माणगावच्या घोट नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. साडे दहाच्या दरम्यान कोकणे रेल्वेच्या रत्नागिरी दादर वीर येथे, दिवा सावंतवाडी कोलाड येथे, मंगल एक्सप्रेस करंजाडी येथे तर मांडवी रोहा येथे थांबवली होती. सदर रेल्वे वाहतूक दीड वाजता सुरू करण्यात आली आहे.
Conclusion:माणगाव येथे घोट नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वे पॅसेंजर रेकवे स्थानकावर थांबवली होती. मात्र आता रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.