ETV Bharat / state

विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरा जातोय - सुनिल तटकरे

सुनिल तटकरे यांचा २०१४ मध्ये निसटता पराभव झाला होता. यावेळी ते केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात लढत आहेत. ईटीव्ही भारतने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, की मी गेल्या ३५ वर्षांपासून समाजसेवा करत आहे. जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

author img

By

Published : Mar 31, 2019, 11:59 AM IST

राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे

रायगड - या लोकसभा निवडणुकीला मी विकासाचा मुद्दा घेऊन सामोरा जात आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी केले. ते ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी रायगडमध्ये बोलत होते. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नावेद यांच्या शिवसेनेत जाण्याने फारसा फरक पडणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नावेद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशामुळे फारसा फरक पडणार नसल्याचे तटकरे म्हणाले

सुनिल तटकरे यांचा २०१४ मध्ये निसटता पराभव झाला होता. यावेळी ते केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात लढत आहेत. ईटीव्ही भारतने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, की मी गेल्या ३५ वर्षांपासून समाजसेवा करत आहे. जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. २५ वर्षे विधीमंडळात, ३ वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष, ८ वर्षे काँग्रेस युवक अध्यक्ष म्हणून काम करण्याचा मला अनुभव आहे.

केंद्राच्या अनेक योजना जिल्ह्यात पोहोचल्या नाहीत. त्या पोहोचविण्याचा मानस असल्याचे तटकरे म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, बीएसएनएल, सागरी महामार्ग, बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रकल्प निर्मीती, मच्छीमारांसाठी जेट्टी, कोल्ड स्टोरेज यासारखे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील ५ वर्षात प्रयत्न करणार असल्याचे तटकरेंनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नावेद यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावर बोलताना तटकरे म्हणाले, की त्यांच्या जाण्याने फारसा फरक पडणार नाही. नावेद यांना पुढे काय मिळेल हे काही दिवसात कळेलच. बॅ. अंतुलेंनी रायगडला पुढे नेण्याचे काम केले. शिवसेना जेव्हा-जेव्हा अंतुलेंच्या विरोधात लढली तेव्हा गीतेंना त्यांच्याविरोधात ओकलेली गरळ लोक विसरले नाहीत असे तटकरे म्हणाले.

रायगड - या लोकसभा निवडणुकीला मी विकासाचा मुद्दा घेऊन सामोरा जात आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी केले. ते ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी रायगडमध्ये बोलत होते. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नावेद यांच्या शिवसेनेत जाण्याने फारसा फरक पडणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नावेद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशामुळे फारसा फरक पडणार नसल्याचे तटकरे म्हणाले

सुनिल तटकरे यांचा २०१४ मध्ये निसटता पराभव झाला होता. यावेळी ते केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात लढत आहेत. ईटीव्ही भारतने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, की मी गेल्या ३५ वर्षांपासून समाजसेवा करत आहे. जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. २५ वर्षे विधीमंडळात, ३ वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष, ८ वर्षे काँग्रेस युवक अध्यक्ष म्हणून काम करण्याचा मला अनुभव आहे.

केंद्राच्या अनेक योजना जिल्ह्यात पोहोचल्या नाहीत. त्या पोहोचविण्याचा मानस असल्याचे तटकरे म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, बीएसएनएल, सागरी महामार्ग, बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रकल्प निर्मीती, मच्छीमारांसाठी जेट्टी, कोल्ड स्टोरेज यासारखे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील ५ वर्षात प्रयत्न करणार असल्याचे तटकरेंनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नावेद यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावर बोलताना तटकरे म्हणाले, की त्यांच्या जाण्याने फारसा फरक पडणार नाही. नावेद यांना पुढे काय मिळेल हे काही दिवसात कळेलच. बॅ. अंतुलेंनी रायगडला पुढे नेण्याचे काम केले. शिवसेना जेव्हा-जेव्हा अंतुलेंच्या विरोधात लढली तेव्हा गीतेंना त्यांच्याविरोधात ओकलेली गरळ लोक विसरले नाहीत असे तटकरे म्हणाले.

Intro:विकासाचा मुद्दा घेऊनच मी निवडणुकीला सामोरा जात आहे - सुनील तटकरे

रायगड : जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा घेऊन 2019 ची लोकसभा निवडणूक लढवीत असून शिवसेनेत गेलेले माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए आर अंतुले यांचा फारसा प्रभाव पडणार नाही तर काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी दिलेल्या पाठींब्याचा मला फायदा होणार असल्याचे महा आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी इ टीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे पुन्हा 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विरोधात तटकरे निवडणूक लढवीत आहेत. ही निवडणूक कोणत्या मुद्यावर लढविणार आहात याबाबत तटकरे म्हणाले की, विकासाचा मुद्दा घेऊन मी निवडणुकीला सामोरे जात आहे. 1985 पासून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली असून 35 वर्ष मी समाजसेवा करीत आहे. जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. पंचवीस वर्षे विधिमंडळात, तीन वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष, आठ वर्षे काँग्रेस युवक अध्यक्ष म्हणून काम केले आहे. Body:यावेळी खासदारकी निवडणूक लढवीत असताना केंद्राच्या अनेक योजना आपल्या जिल्ह्यात पोहचलेल्या नाहीत. त्या राबविण्याचा मनोदय आहे. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, बीएसएनएल, सागरी महामार्ग, बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रकल्प निर्मिती मच्छीमारीसाठी जेट्टी, कोल्ड स्टोरेज यासारखे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील पाच वर्षे प्रयत्न करणार आहेत.
Conclusion:माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ ए आर अंतुले यांचर चिरंजीव नविद अंतुले हे शिवसेनेत गेले आहेत याचा फटका निवडणुकीत आपल्याला पडू शकतो का याबाबत ते म्हणाले, यावर तटकरे म्हणाले की, बॅ ए आर अंतुले यांनी देशात, राज्यात, जिल्ह्यात भरीव काम केलेले आहे हे जिल्ह्यातील नागरिकांना चांगलेच माहीत आहे. देशाला, राज्याला व जिल्ह्याला पुढे नेण्याचे काम अंतुले यांनी केले आहे. त्यांनी एका विचारधारेने काम केले आहे असे असताना नविद अंतुले हे शिवसेनेत गेले असल्याने त्यांना काय मिळणार हे पुढे पाहायला मिळेल. मात्र शिवसेना हे अंतुले विरोधात लढले तेव्हा तेव्हा त्याच्या विरोधात गीतेंनी गरळ ओकली होती. त्यामुळे सामान्य मतदार हे विसरले नाहीत.


काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी पाठिंबा जाहीर केला असल्याने त्याचा कितपत फायदा होणार यावर तटकरे म्हणाले की, मधुकर ठाकूर हे काँग्रेसचे नेते असून काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांनी कष्ट घेतले असून त्याच्या पाठिंब्याचा मला नक्की फायदा होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.