ETV Bharat / state

'मच्छीमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे हमीभाव मिळावा' - डॉ. कैलास चौलकर

हमीभाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो. मच्छीमारांना मात्र कुठलाही हमीभाव मिळत नाही. बऱ्याच वेळा व्यापाऱ्यांकडून त्यांची फसवणूकही होते. त्यामुळे त्यांना हमीभाव मिळावा, अशी मागणी राज्याच्या वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेलफेअर असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे.

patra
राज्याच्या वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित पत्रकार परिषद
author img

By

Published : Jan 1, 2020, 8:31 PM IST

रायगड - मच्छीमारांना हमीभाव मिळावा आणि कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणे मच्छीमारांचीही 'मासे उत्पन्न बाजार समिती' स्थापन करावी अशी मागणी राज्याच्या वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेलफेअर असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे. असोसिएशनच्या वतीने अलिबाग येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी असोसिएशनचे संचालक डॉ. कैलास चौलकर यांनी आपल्या मागण्या मांडल्या.

राज्याच्या वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित पत्रकार परिषद

जिल्ह्यात 109 तर राज्यात दीड हजार पर्ससीन नेट परवाना धारक मच्छीमार असून समुद्र हे कोळी बांधवांचे शेत आहे. नोकऱ्यांअभावी अनेक सुशिक्षित कोळी बांधव मच्छीमारी हाच व्यवसाय करत आहेत. पारंपरिक मच्छीमारी करताना आधुनिक मासेमारी करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे पर्ससीन नेट ही आधुनिक मासेमारी पद्धत तीन वर्षांपासून अस्तित्वात आली आहे. मात्र पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्य विभागाकडून नेहमी कारवाई केली जाते, असा आरोप चौलकर यांनी केला आहे.

हेही वाचा - रायगड जिल्ह्यातील कोटयवधींचा डिझेल परतावा रखडला, मच्‍छिमार बांधव मेटाकुटीला

गोवा, कर्नाटक राज्यात पर्ससीन नेट मासेमारी करण्यास परवानगी आहे. पर्ससीन नेटने मासे कमी होतात अशी बोंब केली जाते. मात्र, प्रत्यक्षात मग्रोज तोड, औद्योगिक प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण यामुळे समुद्रातील मासे कमी झाले आहेत. शासनाने प्रत्यक्ष मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना एकत्रित बोलवून, चर्चा करून यावर धोरण निश्चित करणे गरजेचे आहे, अशी भावना कोळी बांधवांनी या पत्रकार परिषदेर व्यक्त केली.

हमीभाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो. मच्छीमारांना मात्र कुठलाही हमीभाव मिळत नाही. बऱ्याच वेळा व्यापाऱ्यांकडून त्यांची फसवणूकही होते. त्यामुळे त्यांना हमीभाव मिळावा, अशी मागणी चौलकर यांनी केली आहे. यावेळी अलिबाग तालुका पर्ससीन मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी आनंद बुराडे, भगवान नाखवा, सत्यजित पेरेकर, निनाद हाले आणि पर्ससीन नेट धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमच्या बोटीवरच कारवाई का?

परदेशातील मच्छीमार आपल्याकडे येऊन आधुनिक पद्धतीने मासेमारी करून परकीय चलन कमवत आहेत. परकीय देशातील मच्छीमार बोटी बेकायदेशीरपणे घुसून आपल्या समुद्रात मासेमारी करतात आणि निघून जातात. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. राज्यातील पर्ससीन नेट बोटीवर मात्र कारवाईचे सत्रच सुरू आहे. त्यामुळे आमच्याच बोटीवरच कारवाई का, असा सवाल मच्छीमार बांधवांनी उपस्थित केला आहे.

रायगड - मच्छीमारांना हमीभाव मिळावा आणि कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणे मच्छीमारांचीही 'मासे उत्पन्न बाजार समिती' स्थापन करावी अशी मागणी राज्याच्या वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेलफेअर असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे. असोसिएशनच्या वतीने अलिबाग येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी असोसिएशनचे संचालक डॉ. कैलास चौलकर यांनी आपल्या मागण्या मांडल्या.

राज्याच्या वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित पत्रकार परिषद

जिल्ह्यात 109 तर राज्यात दीड हजार पर्ससीन नेट परवाना धारक मच्छीमार असून समुद्र हे कोळी बांधवांचे शेत आहे. नोकऱ्यांअभावी अनेक सुशिक्षित कोळी बांधव मच्छीमारी हाच व्यवसाय करत आहेत. पारंपरिक मच्छीमारी करताना आधुनिक मासेमारी करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे पर्ससीन नेट ही आधुनिक मासेमारी पद्धत तीन वर्षांपासून अस्तित्वात आली आहे. मात्र पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्य विभागाकडून नेहमी कारवाई केली जाते, असा आरोप चौलकर यांनी केला आहे.

हेही वाचा - रायगड जिल्ह्यातील कोटयवधींचा डिझेल परतावा रखडला, मच्‍छिमार बांधव मेटाकुटीला

गोवा, कर्नाटक राज्यात पर्ससीन नेट मासेमारी करण्यास परवानगी आहे. पर्ससीन नेटने मासे कमी होतात अशी बोंब केली जाते. मात्र, प्रत्यक्षात मग्रोज तोड, औद्योगिक प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण यामुळे समुद्रातील मासे कमी झाले आहेत. शासनाने प्रत्यक्ष मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना एकत्रित बोलवून, चर्चा करून यावर धोरण निश्चित करणे गरजेचे आहे, अशी भावना कोळी बांधवांनी या पत्रकार परिषदेर व्यक्त केली.

हमीभाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो. मच्छीमारांना मात्र कुठलाही हमीभाव मिळत नाही. बऱ्याच वेळा व्यापाऱ्यांकडून त्यांची फसवणूकही होते. त्यामुळे त्यांना हमीभाव मिळावा, अशी मागणी चौलकर यांनी केली आहे. यावेळी अलिबाग तालुका पर्ससीन मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी आनंद बुराडे, भगवान नाखवा, सत्यजित पेरेकर, निनाद हाले आणि पर्ससीन नेट धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमच्या बोटीवरच कारवाई का?

परदेशातील मच्छीमार आपल्याकडे येऊन आधुनिक पद्धतीने मासेमारी करून परकीय चलन कमवत आहेत. परकीय देशातील मच्छीमार बोटी बेकायदेशीरपणे घुसून आपल्या समुद्रात मासेमारी करतात आणि निघून जातात. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. राज्यातील पर्ससीन नेट बोटीवर मात्र कारवाईचे सत्रच सुरू आहे. त्यामुळे आमच्याच बोटीवरच कारवाई का, असा सवाल मच्छीमार बांधवांनी उपस्थित केला आहे.

Intro:
मच्छीमारानाही शेतकऱ्यासारखा हमीभाव मिळावा

पर्ससीन नेट मासेमारीला परवानगी मिळावी

सोमवंशी अहवालाची पूर्तता शासनाने करावी


वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेलफेअर असोसिएशनची मागणी




रायगड : राज्यात शेतकऱ्याच्या भातपिक, कडधान्य, पाले भाज्या, उसाला शासन हमीभाव देत असून तसा हमीभाव हा मच्छीमारांनाही मिळावा आणि कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणे मच्छीमाराचीही मासे उत्पन्न बाजार समिती स्थापन करावी अशी मागणी वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, यांच्यामार्फ़त शासनाकडे करण्यात आलेली आहे. तसेच पर्ससीन नेट मासेमारीलाही शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेलफेअर असोसिएशनतर्फे करण्यात आली
आहे.

अलिबाग गुरुप्रसाद हॉटेल मधील हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेलफेअर असोसिएशनची पत्रकार परिषद अलिबाग तालुका पर्ससीन मच्छीमारतर्फे आयोजित केली होती. यावेळी असोसिएशनचे संचालक डॉ. कैलास चौलकर यांनी कोळी बांधवातर्फे माशानाही हमीभाव देण्याची मागणी शासनाकडे केली. आहे. यावेळी अलिबाग तालुका पर्ससीन मच्छीमार पदाधिकारी आनंद बुराडे, भगवान नाखवा, सत्यजित पेरेकर, निनाद हाले आणि मोठ्या संख्येने पर्ससीन नेट धारक कोळी बांधव यावेळी उपस्थित होते.

भात, ऊस शेती, कडधान्य, पालेभाजी, कांदा, बटाटा, यासारख्या शेती पिकासाठी राज्यात शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केल्या आहेत. शेतकऱ्यांना यासाठी योग्य तो हमीभाव शासन देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. मात्र मच्छीमार बांधवाना मासेमारी बाबत कोणताही हमी भाव दिला जात नाही. मासे घेणाऱ्या होलसेल व्यापारी वर्गाकडून कोळी बांधवांची अनेकदा फसवणूक होत असते. त्यामुळे कोळी बांधवाना आर्थिक नुकसान सोसावे लागते. कोळी बांधवांनाही शेतीप्रमाणे हमीभाव मिळावा अशी मागणी पत्रकार परिषदेत डॉ. कैलास चौलकर यांनी असोसिएशनतर्फे केली आहे.






Body:जिल्ह्यात 109 तर राज्यात दीड हजार पर्ससीन नेट परवाना धारक मच्छीमार असून समुद्र हा कोळी बांधवांचे शेत आहे. 1990 पासून कोळी बांधवांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आज सुशिक्षित कोळी बांधव हा मच्छीमारी हाच व्यवसाय करीत आहे. पारंपरिक मच्छीमारी करताना आधुनिक मासेमारी करण्याकडे कोळी बांधवांचा कल वाढला आहे. त्यामुळे पर्ससीन नेट ही आधुनिक मासेमारी पद्धत तीन वर्षांपासून अस्तित्वात आली आहे. मात्र पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्य विभागाकडून नेहमी कारवाई केली जात आहे. असा आरोप डॉ कैलास चौलकर यांनी केला आहे.

पारंपारिक मासेमारी करण्याबाबत शासन सांगत असले तरी पारंपारिक मासेमारी म्हणजे काय असा प्रश्नही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. गोवा, कर्नाटक राज्यात पर्ससीन नेट मासेमारी करण्यास परवानगी आहे. पर्ससीन नेटने मासे कमी होत आहेत अशी बोंब केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात मग्रोज तोड, औद्योगिक प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण यामुळे समुद्रातील मासे कमी झाले आहेत. शासनाने प्रत्यक्ष मच्छीमार करणाऱ्या मच्छीमाराना एकत्रित बोलवून चर्चा करून यावर धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. अशी भावना कोळी बांधवांनी पत्रकार परिषदेर व्यक्त केली आहे.Conclusion:आमच्या बोटीवरच कारवाई का ? मच्छीमारांचा सवाल

परदेशातील मच्छीमार आपल्याकडे येऊन आधुनिक पद्धतीने मासेमारी करून परकीय चलन कमवत आहेत. बेकायदेशीर पणे ह्या परकीय देशातील मच्छीमार बोटी घुसून आपल्या समुद्रात मासेमारी करतात व निघून जातात. मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. राज्यातील पर्ससीन नेट बोटीवर मात्र कारवाईचे सत्रच सुरू केले आहे. त्यामुळे आमच्या बोटीवरच कारवाई का असा सवाल मच्छीमार बांधवांनी उपस्थित केला आहे.


------------------------

सोमवंशी अहवालाची पूर्तता होणे गरजेचे

शासनाकडे मच्छीमारीबाबत सोमवंशी समितीने अहवाल सादर केला असून त्याची पूर्तता होणे गरजेचे आहे. सोमवंशी अहवालमध्ये घटना, कायदे कोणते असायला पाहिजे, कशा पद्धतीने मासेमारी करायला हवी याबाबत सविस्तर दिले असताना शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. सोमवंशी अहवालाबाबत निर्णय घेतल्यास मच्छीमारांचे अनेक प्रश्न सुटू शकतात.

___________

बाईट : डॉ कैलास चौलकर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.