रायगड - शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाट सायमाळ वळण रस्त्यावर कार व दुधाचा टँकर यांच्यात भीषण अपघात घडला. या अपघातात, कारमधील दोन व टँकर चालक असे तिघे जण जखमी झालेत. सुदैवाने दोन्ही वाहने उलटली व दरीत जाण्यावाचून वाचली म्हणून पुढील मोठा अनर्थ टळला.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली-
हा अपघात अतिवेगामुळे वळण रस्त्यावर वाहन अनियंत्रित होऊन झाल्याचे स्पष्ट झाले. अपघात होताच सायमाळ येथील स्थानिक, महामार्ग पोलीस व खोपोली पोलिसांनी तातडीने मदत पोहचवून जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात नेले. यातील कोणालाही गंभीर व मोठी इजा नसल्याने उपचार करून तिन्ही जखमींना सोडण्यात आले.
हेही वाचा- प्राप्तिकर विभागाची सलग तिसर्या दिवशी छापेमारी सुरू