ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या 186 शाळा मोडकळीस; दुरुस्तीसाठी 4 कोटींची गरज - जिल्हा परिषद शिक्षण विभाग

रायगड जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी पूरस्थिती निर्माण झाली होती. या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगलाच फटका बसला असुन 186 शाळा दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या 186 शाळा मोडकळीस
author img

By

Published : Aug 16, 2019, 10:02 PM IST

रायगड - जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या 186 शाळांचे नुकसान झाले आहे. शाळा, स्वछतागृहे, स्वयंपाकगृहांच्या दुरुस्तीसाठी साधारण 4 कोटी 11 लाख 70 हजार रुपये निधी आवश्यक असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या 186 शाळा मोडकळीस
शाळा दुरुस्त होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय इतरत्र करण्यात आली आहे. मात्र, कमकुवत शाळांची दुरुस्ती जिल्हा परिषदेने अगोदरच केली असती, तर ही बिकट स्थिती निर्माण झाली नसती.दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यातील आपटवणे (पाली), कसबे (महाड), पोलादपूर (चांदके), आदगाव (श्रीवर्धन), वारळ आदिवासी शाळा (माणगाव) या शाळांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे.रायगडमधील साधारण साडेपाचशे शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
शाळा दुरुस्तीसाठी 2018-19 या वर्षासाठी 16 कोटींची मागणी शासनाकडे केलेली होती. मात्र अद्याप त्यासाठी निधीची तरतूद झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अद्याप नादुरुस्त शाळांची यादी प्राप्त झालेली नाही. यादी आल्यानंतर समितीमार्फत नादुरुस्त शाळेला दुरुस्तीची गरज आहे का? हे पाहूनच निधी वितरित केला जाईल, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले.


अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शाळा

उरण 14, पनवेल 7, पेण 10, पोलादपूर 11, म्हसळा 10, मुरुड 13, महाड 14, माणगाव 8, रोहा 12, अलिबाग 18, सुधागड 45, श्रीवर्धन 3, खालापूर 4, कर्जत 16, तळा 1

रायगड - जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या 186 शाळांचे नुकसान झाले आहे. शाळा, स्वछतागृहे, स्वयंपाकगृहांच्या दुरुस्तीसाठी साधारण 4 कोटी 11 लाख 70 हजार रुपये निधी आवश्यक असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या 186 शाळा मोडकळीस
शाळा दुरुस्त होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय इतरत्र करण्यात आली आहे. मात्र, कमकुवत शाळांची दुरुस्ती जिल्हा परिषदेने अगोदरच केली असती, तर ही बिकट स्थिती निर्माण झाली नसती.दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यातील आपटवणे (पाली), कसबे (महाड), पोलादपूर (चांदके), आदगाव (श्रीवर्धन), वारळ आदिवासी शाळा (माणगाव) या शाळांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे.रायगडमधील साधारण साडेपाचशे शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
शाळा दुरुस्तीसाठी 2018-19 या वर्षासाठी 16 कोटींची मागणी शासनाकडे केलेली होती. मात्र अद्याप त्यासाठी निधीची तरतूद झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अद्याप नादुरुस्त शाळांची यादी प्राप्त झालेली नाही. यादी आल्यानंतर समितीमार्फत नादुरुस्त शाळेला दुरुस्तीची गरज आहे का? हे पाहूनच निधी वितरित केला जाईल, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले.


अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शाळा

उरण 14, पनवेल 7, पेण 10, पोलादपूर 11, म्हसळा 10, मुरुड 13, महाड 14, माणगाव 8, रोहा 12, अलिबाग 18, सुधागड 45, श्रीवर्धन 3, खालापूर 4, कर्जत 16, तळा 1

Intro:
अतिवृष्टी, पुरस्थितीने जिल्हा परिषदेच्या 186 शाळा मोडकळीस

शाळा दुरुस्तीसाठी 4 कोटी 11 लाख निधीची गरज

जुन्या साडे आठशे नादुरुस्त शाळाकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

दुरुस्ती वेळेत केली असती तर नुकसान टळले असते

रायगड : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या 109 शाळा व 77 स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह असे 186 शाळांचे नुकसान झाले आहे. शाळांच्या व स्वछतागृह, स्वयंपाकगृहाच्या दुरुस्तीसाठी साधारण 4 कोटी 11 लाख 70 हजार रुपये निधी लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे शाळा दुरुस्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय इतरत्र करण्यात आलेली आहे. मात्र नादुरुस्त शाळांची दुरुस्ती ही जिल्हा परिषदेने आधीच केली असती तर ही बिकट स्थिती अतिवृष्टीने निर्माण झाली नसती.Body:दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्यात अतिवृष्टीने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यातील आपटवणे (पाली), कसबे (महाड), पोलादपूर (चांदके), आदगाव (श्रीवर्धन), वारळ आदिवासी शाळा (माणगाव) या शाळांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

जिल्ह्यातील साधारण साडेपाचशे शाळा ह्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आधीच आहेत. मात्र या शाळांची दुरुस्ती अद्यापही सुरू केलेली नाही. शाळा दुरुस्तीसाठी 2018-19 या वर्षासाठी 16 कोटींची मागणी शासनाकडे केलेली होती. मात्र अद्याप त्यासाठी निधीची तरतूद केलेली नाही. 2019-20 साठी 16 कोटींचा पुन्हा शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन मार्फत शाळा दुरुस्तीसाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अद्यापही शाळांची यादी जिल्हा नियोजनकडे प्राप्त झालेली नाही.

--------------------
अतिवृष्टी व पुरस्थितीने नुकसान झालेल्या शाळा, स्वछतागृह, स्वयंपाकगृह

उरण 14, पनवेल 7, पेण 10, पोलादपूर 11, म्हसळा 10, मुरुड 13, महाड 14, माणगाव 8, रोहा 12, अलिबाग 18, सुधागड 45, श्रीवर्धन 3, खालापूर 4, कर्जत 16, तळा 1
Conclusion:जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी निधी मंजूर केला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अद्याप नादुरुस्त शाळांची यादी प्राप्त झालेली नाही. यादी आल्यानंतर समितीमार्फत नादुरुस्त शाळेला दुरुस्तीची गरज आहे का हे पाहूनच निधी वितरित केला जाईल. या प्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप पालकमंत्री यांनी काडून टाकलेला आहे.

सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी

-----------------------

अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे जिल्हा परिषदेचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शाळांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. पूर्ण मोडकळीस झालेल्या शाळाच्य नविन इमारतीसाठी निधी देण्याची मागणी करणार आहोत. नादुरुस्त शाळांच्या दुरुस्ती साठी वाढीव निधी देण्याची मागणी शासनाकडे करणार आहोत.

नरेश पाटील, सभापती, शिक्षण व आरोग्य समिती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.