ETV Bharat / state

आगामी निवडणुकीच्या निर्णयाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक सुरू

या बैठकीतनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीसोबत जाते की, ‘एकला चलो रे’ची भूमिका घेते हे समोर येईल.

author img

By

Published : Mar 12, 2019, 2:28 PM IST

Updated : Mar 12, 2019, 4:23 PM IST

भिमानी शेतकरी संघटना पुणे येथे सुरू असलेली बैठक

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आगामी निर्णयाबाबत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पुणे येथे सुरू झाली आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीमध्ये स्वाभिमानीने हातकणंगले, वर्धा आणि बुलडाणा या जागा मागितल्या होत्या. मात्र, दोन्ही काँग्रेसने स्वाभिमानीला केवळ हातकणंगले येथील जागा देण्याची तयारी दाखवली होती. तसेच बुलडाण्यातील जागेवरूनही आघाडी आणि स्वाभिमानीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. किमान ३ जागा मिळाव्यात यासाठी स्वाभिमानी आग्रही आहे.

रविकांत तुपकर यांच्यासाठी बुलडाण्याच्या जागेसाठी खासदार राजू शेट्टी आग्रही आहेत. दरम्यान, भाजपला खाली खेचण्याची दोन्ही काँग्रेसची मानसिकता नसल्याची टीका तुपकर यांनी केली होती. तसेच १२ मार्चपर्यंत जागावाटपाचा तिढा न सोडवल्यास १५ स्वतंत्र उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचाही इशारा तुपकर यांनी यावेळी दिला होता. त्यामुळे आणखी जागा देण्यास दोन्ही काँग्रेसनी आखडता हात घेतल्याने स्वाभिमानीने ‘एकला चलो रे’ची मानसिकता केल्याचे दिसत आहे.

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आगामी निर्णयाबाबत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पुणे येथे सुरू झाली आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीमध्ये स्वाभिमानीने हातकणंगले, वर्धा आणि बुलडाणा या जागा मागितल्या होत्या. मात्र, दोन्ही काँग्रेसने स्वाभिमानीला केवळ हातकणंगले येथील जागा देण्याची तयारी दाखवली होती. तसेच बुलडाण्यातील जागेवरूनही आघाडी आणि स्वाभिमानीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. किमान ३ जागा मिळाव्यात यासाठी स्वाभिमानी आग्रही आहे.

रविकांत तुपकर यांच्यासाठी बुलडाण्याच्या जागेसाठी खासदार राजू शेट्टी आग्रही आहेत. दरम्यान, भाजपला खाली खेचण्याची दोन्ही काँग्रेसची मानसिकता नसल्याची टीका तुपकर यांनी केली होती. तसेच १२ मार्चपर्यंत जागावाटपाचा तिढा न सोडवल्यास १५ स्वतंत्र उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचाही इशारा तुपकर यांनी यावेळी दिला होता. त्यामुळे आणखी जागा देण्यास दोन्ही काँग्रेसनी आखडता हात घेतल्याने स्वाभिमानीने ‘एकला चलो रे’ची मानसिकता केल्याचे दिसत आहे.

Intro:Body:

MS Dhoni speaks about match fixing in IPL



MS Dhoni, speaks, match, fixing, IPL, महेंद्रसिंह धोनी, आयपीएल, मॅच फिक्सिंग, चेन्नई सुपर किंग्स, पुणे



मी खून करू शकतो पण मॅच फिक्सिंग करू शकणार नाही - महेंद्रसिंह धोनी



मुंबई - आयपीएलच्या आगामी हंगामाची सुरुवात २३ मार्चला होत आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्सचे नाव घेतले जाते. चेन्नईला सर्वात यशस्वी संघ बनवण्याचे श्रेय हे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिले जाते. परंतु, चेन्नईच्या २०१६ आणि २०१७ साली स्पॉट फिक्सिंगच्या कारणामुळे निलंबित करण्यात आले होते. आता धोनीने प्रथमच या विषयावर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.







आयपीएलच्या पूर्वसंध्येला २० मार्चपासून धोनीवर एक डॉक्यूमेंट्री रिलीज होत आहे. रोअर ऑफ दी लायन या डॉक्यूमेंट्रीच्या सुरुवातीलाच धोनी म्हणतो, की माझ्यासाठी सर्वात मोठा अपराध हत्या करणे नाही तर, मॅच फिक्सिंग ठरेल. ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये धोनी म्हणतो, संघ मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होता. माझ्यावरही आरोप झाले होते. आम्हा सर्वांसाठी हा कठीण काळ होता. पुनरागमन करतानाचा क्षण चाहते आणि आमच्यासाठी खूप भावूक होता. मी याआधीही म्हटले आहे, ज्या गोष्टीमुळे तुमचा मृत्यू होत नाही, ती गोष्ट तुम्हाला मजबूत बनवते.





स्पॉट फिक्सिंगमुळे चेन्नईच्या खेळाडूंना दुसऱया संघांकडून २ वर्षे खेळावे लागले होते. महेंद्रसिंह धोनी २ वर्ष रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाकडून खेळला. पहिल्यावर्षी खराब कामगिरी झाल्यामुळे धोनीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्याच्याऐवजी स्मिथला कर्णधार करण्यात आले होते. यावरुन बरीच चर्चा रंगली होती. चेन्नईच्या संघाने जोरदार पुनरागमन करताना धोनीच्या नेतृत्वात गेल्यावर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.




Conclusion:
Last Updated : Mar 12, 2019, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.