ETV Bharat / state

बिबट्याने शेळीसह 30 कोंबड्याचा पाडला फडशा - जुन्नरमध्ये बिबट्याने शेळीचा पाडला फडशा न्यूज

जुन्नर तालुक्यात बिबट्याने बेल्हे व नळावणे परिसरात हल्ला करत 30 कोंबड्या व एका शेळीचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard kills goat and 30 Hens in pune district
बिबट्याने शेळीसह 30 कोंबड्याचा पाडला फडशा
author img

By

Published : Dec 19, 2020, 1:01 AM IST

जुन्नर (पुणे) - जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. शुक्रवारी पहाटे बिबट्याने बेल्हे व नळावणे परिसरात हल्ला करत 30 कोंबड्या व एका शेळीचा फडशा पाडला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याने शेळीसह 30 कोंबड्याचा पाडला फडशा
जुन्नर तालुक्यातील नळावण येथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने महादू गगे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील शेळीवर हल्ला करत शेळीला ठार केले. तर पहाटेच्या सुमारास बेल्हे येथे दिलीप बांगर या शेतकऱ्याच्या घरासमोरील कोंबड्याच्या खुराड्यात बिबट्याने प्रवेश करत 30 गावठी कोंबड्या फस्त केल्या. त्यामुळे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमा भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतक-यांचे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
शेतीला पाणी देत असताना दिवसा विजेचा लपंडाव सुरु असून त्यामुळे शेतक-यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यायला बाहेर पडावे लागत आहे. अशात बिबट्याची दहशत वाढल्याने शेतक-यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून शेतात पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

जुन्नर (पुणे) - जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. शुक्रवारी पहाटे बिबट्याने बेल्हे व नळावणे परिसरात हल्ला करत 30 कोंबड्या व एका शेळीचा फडशा पाडला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याने शेळीसह 30 कोंबड्याचा पाडला फडशा
जुन्नर तालुक्यातील नळावण येथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने महादू गगे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील शेळीवर हल्ला करत शेळीला ठार केले. तर पहाटेच्या सुमारास बेल्हे येथे दिलीप बांगर या शेतकऱ्याच्या घरासमोरील कोंबड्याच्या खुराड्यात बिबट्याने प्रवेश करत 30 गावठी कोंबड्या फस्त केल्या. त्यामुळे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमा भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतक-यांचे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
शेतीला पाणी देत असताना दिवसा विजेचा लपंडाव सुरु असून त्यामुळे शेतक-यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यायला बाहेर पडावे लागत आहे. अशात बिबट्याची दहशत वाढल्याने शेतक-यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून शेतात पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.