ETV Bharat / state

'पीक विमा किंवा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणार'

author img

By

Published : Nov 6, 2019, 8:02 PM IST

डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खेड, आंबेगाव, जुन्नर या 3 तालुक्यात परतीच्या पावसाने शेती व इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पंचनामा करण्याचे काम सुरू असून 2 दिवसात पंचनामे पूर्ण केले जातील, असे म्हैसेकर यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे - जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली. उत्तर पुणे जिल्ह्यात बटाटा, सोयाबीन, द्राक्ष, कांदा, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतितात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना पिकविमा किंवा सरकारच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे, असे पाहणी दरम्यान माध्यमांशी बोलताना म्हैसेकर यांनी सांगितले.

डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त

हेही वाचा - 'बिव्हीजी'च्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा, राष्ट्रपती भवनात पुरवते स्वच्छता सेवा

डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खेड, आंबेगाव, जुन्नर या 3 तालुक्यात परतीच्या पावसाने शेती व इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पंचनामा करण्याचे काम सुरू असून 2 दिवसात पंचनामे पूर्ण केले जातील. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्यांना पीक विम्याच्या माध्यमातून मदत दिली जाईल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नसेल त्यांना सरकारच्या माध्यमातून मदत पुरवण्या संदर्भात कार्यवाही सुरू असल्याचेही म्हैसेकर यांनी सांगितले.

हेही वाचा - पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय

सध्या रब्बी हंगाम सुरू होत असताना खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी तत्काळ कर्जपुरवठा व अतितत्काळ मदत देण्यासाठी शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी लवकरच मदत देण्याचे आश्वासन म्हैसेकर यांनी दिले.

पुणे - जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली. उत्तर पुणे जिल्ह्यात बटाटा, सोयाबीन, द्राक्ष, कांदा, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतितात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना पिकविमा किंवा सरकारच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे, असे पाहणी दरम्यान माध्यमांशी बोलताना म्हैसेकर यांनी सांगितले.

डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त

हेही वाचा - 'बिव्हीजी'च्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा, राष्ट्रपती भवनात पुरवते स्वच्छता सेवा

डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खेड, आंबेगाव, जुन्नर या 3 तालुक्यात परतीच्या पावसाने शेती व इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पंचनामा करण्याचे काम सुरू असून 2 दिवसात पंचनामे पूर्ण केले जातील. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्यांना पीक विम्याच्या माध्यमातून मदत दिली जाईल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नसेल त्यांना सरकारच्या माध्यमातून मदत पुरवण्या संदर्भात कार्यवाही सुरू असल्याचेही म्हैसेकर यांनी सांगितले.

हेही वाचा - पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय

सध्या रब्बी हंगाम सुरू होत असताना खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी तत्काळ कर्जपुरवठा व अतितत्काळ मदत देण्यासाठी शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी लवकरच मदत देण्याचे आश्वासन म्हैसेकर यांनी दिले.

Intro:Anc_ जुन्नर,आंबेगाव,खेड तालुक्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज दिवसभर पहाणी केली. उत्तर पुणे जिल्ह्यात बटाटा,सोयाबीन,द्राक्ष,कांदा,ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अतितात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना पिकविमा किंवा सरकारच्या माध्यमातून आतित्काळ मदत करण्यात येणार आहे नुकसान पहाणी दरम्यान माध्यमांशी बोलताना विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर यांनी माहिती दिली.

आज सकाळपासून विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी खेड आंबेगाव जुन्नर या तीन तालुक्यात परतीच्या पावसाने शेती व इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केली यामध्ये प्रामुख्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळत असून शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यासाठी पंचनामा करण्याचे काम सुरू असून दोन दिवसात पंचनामे पूर्ण केले जाऊन ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्यांना पीक विम्याच्या माध्यमातून मदत दिली जाईल व ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नसेल त्यांना सरकारच्या माध्यमातून अति तात्काळ मदत पुरविण्यास संदर्भात कारवाई सुरू असल्याचे डॉ म्हैसेकर यांनी सांगितले

सध्या रब्बी हंगाम सुरू होत असताना खरीप हंगाम हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले असून शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी तात्काळ कर्जपुरवठा व अतितात्काळ मदत देण्यासाठी शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी लवकरच मदत देण्याचे आश्वासन डॉ म्हैसेकर यांनी शेतकऱ्यांना दिले

विभागिय आयुक्तांनी दिलेली आकडेवारी.....

# 1 लाख 87 हजार हेक्टर पैकी 90 हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले असुन उर्वरित पंचनामे गुरुवारी सायंकाळ पर्यंत पूर्ण करणार.

#ज्या शेतक-यांनी पीक विमा काढलय त्यांना पीक विम्यातून आणि ज्यांनी पीक विमा काढला नाही त्यांना सरकारच्या माध्यमातुन अति तात्काळ मदत देणार. या पैकी एका माध्यमातून मदत नक्की होणार आहे

#अतिरिक्त पंचनाम्याची गरज पडल्यास पुढील काळात तेही केले जातील.

#रब्बी हंगामासाठी अति तात्काळ कर्ज पुरवठा करण्याच नियोजन सुरू असल्याची ग्वाही

Byte_डॉ दीपक म्हैसेकर,विभागीय आयुक्तBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.