ETV Bharat / state

नाणेघाट येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन; शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद

author img

By

Published : Sep 16, 2019, 2:06 PM IST

Updated : Sep 16, 2019, 7:53 PM IST

रानभाज्यांची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी या उद्देशाने भिमाशंकर परिसर व जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

रानभाज्या महोत्सवातील दृश्ये

पुणे- पावसाळ्याच्या दिवसात सह्याद्री डोंगराच्या कुशीला जमिनीवरील स्वर्ग म्हटले जाते. या ठिकाणी विशिष्ट हंगामात रानभाज्यांचा स्वाद अगदी तृप्त करणारा असतो. या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. त्यामुळे या रानभाज्यांची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने भिमाशंकर परिसर व जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

भिमाशंकर परिसर व जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

माड, कारटुले, चावावेल, पेरा, शेऊन लेथी, यासारख्या चाळीसहून अधिक जातीच्या रानभाज्या या आदिवासी भागात सापडतात. या साऱ्या भाज्या १०० टक्के नैसर्गिक औषधी व पोषणमुल्यांनी उपयुक्त असतात. आदिवासी बांधवांना परंपरेने या नैसर्गिक रानभाज्यांची माहिती असतेच शिवाय अगदी चवदार पद्धतीने या भाज्या बनवून ते खायलाही देतात.

रानभाज्यांमधील काही भाज्या हंगामातून एक दोन वेळा खाल्या की वर्षभर पोटाचे आरोग्य चांगले रहाण्यास मदत होते. रामकेळी ही खोकल्याच्या विकारावर उपयुक्त असते. ती सह्याद्री डोंगर रांगातील भागात मोठ्या संख्येने उगवते. मात्र या भाज्यांना योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने त्या दुर्लक्षित होत चालल्याची खंत आदिवासी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; जन्मदिनीच डॉक्टरसह चालकाचा मृत्यू

या महोत्सवात बचत गटाच्या महिलांनी तोंडाल पाणी सुटेल अशा रान भाज्या तयार केल्या होत्या. या भाजीचा पर्यटकांनी भरपूर आस्वाद घेतला. या महोत्सवाला शहरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदिवासी समाजाकडे असणारे निसर्गाचे देणे शहरी लोकांपर्यत पोहाचावे. तसेच त्यांना निसर्गातून मिळणाऱ्या वस्तुंमधून काही प्रमाणात तरी अर्थप्राप्ती व्हावी हा या महोत्सवाच्या आयोजनामागचा हेतू होता.

पुणे- पावसाळ्याच्या दिवसात सह्याद्री डोंगराच्या कुशीला जमिनीवरील स्वर्ग म्हटले जाते. या ठिकाणी विशिष्ट हंगामात रानभाज्यांचा स्वाद अगदी तृप्त करणारा असतो. या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. त्यामुळे या रानभाज्यांची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने भिमाशंकर परिसर व जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

भिमाशंकर परिसर व जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

माड, कारटुले, चावावेल, पेरा, शेऊन लेथी, यासारख्या चाळीसहून अधिक जातीच्या रानभाज्या या आदिवासी भागात सापडतात. या साऱ्या भाज्या १०० टक्के नैसर्गिक औषधी व पोषणमुल्यांनी उपयुक्त असतात. आदिवासी बांधवांना परंपरेने या नैसर्गिक रानभाज्यांची माहिती असतेच शिवाय अगदी चवदार पद्धतीने या भाज्या बनवून ते खायलाही देतात.

रानभाज्यांमधील काही भाज्या हंगामातून एक दोन वेळा खाल्या की वर्षभर पोटाचे आरोग्य चांगले रहाण्यास मदत होते. रामकेळी ही खोकल्याच्या विकारावर उपयुक्त असते. ती सह्याद्री डोंगर रांगातील भागात मोठ्या संख्येने उगवते. मात्र या भाज्यांना योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने त्या दुर्लक्षित होत चालल्याची खंत आदिवासी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; जन्मदिनीच डॉक्टरसह चालकाचा मृत्यू

या महोत्सवात बचत गटाच्या महिलांनी तोंडाल पाणी सुटेल अशा रान भाज्या तयार केल्या होत्या. या भाजीचा पर्यटकांनी भरपूर आस्वाद घेतला. या महोत्सवाला शहरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदिवासी समाजाकडे असणारे निसर्गाचे देणे शहरी लोकांपर्यत पोहाचावे. तसेच त्यांना निसर्गातून मिळणाऱ्या वस्तुंमधून काही प्रमाणात तरी अर्थप्राप्ती व्हावी हा या महोत्सवाच्या आयोजनामागचा हेतू होता.

Intro:Anc--पाऊसाळ्याच्या दिवसात सह्याद्री डोंगराच्या कुशीला जमिनीवरील स्वर्ग म्हटलं जातं त्याच ठिकाणी रानभाज्या पहायला मिळतात विशिष्ट हंगामात येणा-या या रानभाज्यांचा स्वाद अगदी त्रुप्त करणारा असतो भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म उपयुक्त असतात अशा रानभाज्यांची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी या उद्देशाने भिमाशंकर परिसर व जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला चला पहावुयात एक स्पेशल रिपोर्ट......


Vo--या आहेत आदिवासी भागातील रानभाज्या या भाज्यांची ओळख म्हणजे माड, कारटुले, चावावेल, पेरा, शेऊन लेथी, यासारख्या चाळीसहुन अधिक जातीच्या रानभाज्या आहे,नक्कीच हि नावं आपण फार कमी ऐकली असेल पण या सा-या भाज्या १०० टक्के नैसर्गिक औषधी व पोषणमुल्यांनी उपयुक्त असुन नैसर्गिक रित्या उगवुन येणा-या रानभाज्यांमध्ये विलक्षण असे गुणधर्म असतात,या रानभाज्यांची महिती आदिवासी बांधवांना परंपरेने असतेच आणि अगदी चवदार पद्धतीने तयार करुन खायला देतात

Byte-सुरेखा आढारी__आदिवासी महिला

Byte_ वनाबाई रावते__आदिवासी महिला


Vo--या रानभाज्यांमधील काही भाज्या हंगामातुन एक दोन वेळा खाल्या की वर्षभर पोटाचं आरोग्य चांगलं रहाण्यास मदत होते रामकेळी हि खोकल्याच्या विकारावर उपयुक्त आहे सह्याद्री डोंगराच्या रांगातील भागात या भाज्यां मोठ्या संख्येने येत असतात मात्र या भाज्यांना योग्य बाजारपेठ व आदिवासी बांधवांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने या भाज्या दुर्लक्षीतच होत चालल्याची खंत येथील आदिवासी बांधव व्यक्त करत आहे. 


Byte- - सुगंधा तळे_आदिवासी महिला 


Vo---या  आहेत रानभाज्यां पासुन तयार केलेल्या भाज्या पाहिलं तरी तोंडाला अगदी पाणीच सुटेल अशा पद्धतीचे हे मेनु बचत गटांच्या महिलांच्या माध्यमातुन तयार करण्यात आले असुन या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक या भाज्यांची चव चोकुनच पुढे जातो आदिवासी समाजाकडे असणारं निसर्गाचं देणं शहरी लोकांपर्यत पोहवुन आदिवासी बांधवांना काही प्रमाणात तरी अर्थप्राप्ती होण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे 


Byte -सह्याद्री बचत गट ओतुर महिला..

Byte__सुरेश दिवटे__पर्यटक


End vo-- आदिवासी बांधवांकडे असणारं हे रानभाज्यांचं नैसर्गिक देणं दुर्लक्षीत करुन चालणार नाही यासाठी योग्य पद्धतीचे नियोजन करुन शहरीलोकांपर्यत पोहण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याची गरज मात्र आहेBody:Spl pkgConclusion:
Last Updated : Sep 16, 2019, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.