ETV Bharat / state

गौतम नवलखाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण ११ नोव्हेंबरला संपले. त्यानंतर त्याने अटकपूर्व जामीनासाठी पुणे जिल्हा न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा फेटाळून लावला आहे.

author img

By

Published : Nov 13, 2019, 7:51 AM IST

गौतम नवलखा

पुणे - एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलखाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळून लावला. न्यायालयाने अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिल्याने नवलाखाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.


एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणी नवलाखाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण ११ नोव्हेंबरला संपले. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुणे जिल्हा न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला. नवलाखाच्या अर्जावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पुर्ण झाल्यानंतर, याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. नवलखाच्या अर्जावरील निकाल देईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. मात्र, मंगळवारी न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यामुळे अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या सत्ताकारणासाठी किमान समान कार्यक्रमाचा झांगडगुत्ता?


नवलखा यांच्यावतीने अ‍ॅड. रागिणी आहुजा यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी पुन्हा तीन दिवसांचे अंतरिम संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केला. यापूर्वी भीमा कोरेगाव प्रकरणातील आनंद तेलतुंबडेला अशा प्रकारचे संरक्षण देण्यात आले आहे, असा युक्तिवाद आहुजा यांनी केला. त्याला सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला. नवलाखावर दीडवर्षापूर्वी नक्षलवादी संघटनेच्या सदस्यांशी संबंध असल्या कारणाने गुन्हा दाखल केलेले आहे.

हेही वाचा - 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे दुर्दैवी.. स्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा'


त्याच्याविरोधात पोलिसांना प्रथमदर्शनी सबळ पुरावे मिळाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास होणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत नवलाखाला वेळोवेळी न्यायालयाने अटकपूर्व संरक्षण दिलेले आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्यात यावा, असा पठारे यांनी सांगितले. याप्रकरणी बचाव पक्षाच्या वकीलांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

पुणे - एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलखाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळून लावला. न्यायालयाने अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिल्याने नवलाखाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.


एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणी नवलाखाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण ११ नोव्हेंबरला संपले. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुणे जिल्हा न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला. नवलाखाच्या अर्जावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पुर्ण झाल्यानंतर, याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. नवलखाच्या अर्जावरील निकाल देईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. मात्र, मंगळवारी न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यामुळे अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या सत्ताकारणासाठी किमान समान कार्यक्रमाचा झांगडगुत्ता?


नवलखा यांच्यावतीने अ‍ॅड. रागिणी आहुजा यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी पुन्हा तीन दिवसांचे अंतरिम संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केला. यापूर्वी भीमा कोरेगाव प्रकरणातील आनंद तेलतुंबडेला अशा प्रकारचे संरक्षण देण्यात आले आहे, असा युक्तिवाद आहुजा यांनी केला. त्याला सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला. नवलाखावर दीडवर्षापूर्वी नक्षलवादी संघटनेच्या सदस्यांशी संबंध असल्या कारणाने गुन्हा दाखल केलेले आहे.

हेही वाचा - 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे दुर्दैवी.. स्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा'


त्याच्याविरोधात पोलिसांना प्रथमदर्शनी सबळ पुरावे मिळाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास होणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत नवलाखाला वेळोवेळी न्यायालयाने अटकपूर्व संरक्षण दिलेले आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्यात यावा, असा पठारे यांनी सांगितले. याप्रकरणी बचाव पक्षाच्या वकीलांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

Intro:गौतम नवलाखा यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील संशयीत आरोपी गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी पेâटाळून लावला. दरम्यान न्यायालयाने त्यांना अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिल्याने नवलाखा यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणी नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण ११ नोव्हेंबर रोजी संपले होते. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुणे जिल्हा न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला. नवलाखा यांच्या अर्जावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पुर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. या अर्जावरील निकाल होईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, त्यांचा अर्ज पेâटाळल्यामुळ त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवलाखा यांचे वतीने अ‍ॅड. रागिणी आहुजा यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी पुन्हा तीन दिवसांचा अंतरिम संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केला. यापूर्वी आनंद तेलतुंबडे यांना अशा प्रकारचे संरक्षण देण्यात आले आहे असा युक्तिवाद त्यांनी केला. त्याला सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला. नवलाखा यांचेवर सुमारे दिडवर्षा पूर्वी माओवादी संघटना सदस्य यांच्याशी संबंध असल्याने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात पोलीसांना प्रथमदर्शनी सबळ पुरावे मिळाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास होणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत त्यांना वेळोवेळी न्यायालयाने अटकपूर्व संरक्षण दिलेले आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्यात यावा. त्यानंतर न्यायालयाने अंतरिम संरक्षण मिळण्यासाठी नवलाखा यांनी केलेला अर्जही पेâटाळून लावला.
याप्रकरणी बचाव पक्ष वकीलांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता, त्यांना उच्च न्यायालयाने लवकर संरक्षण दिले नाही तर त्यांना कधीही अटक होऊ शकते.Body:।।Conclusion:।।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.