ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय विमानतळ काळाची गरज.. तसेच साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर चर्तेतून तोडगा काढू -पवार

author img

By

Published : Jan 19, 2020, 3:24 PM IST

पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा या शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज असल्याचे मतही पवारांनी व्यक्त केले. पुरंदर विमानतळासंदर्भात नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात राहिलेल्या बैठका येत्या काळात घेणार असल्याचं म्हटले आहे.

अजित पवार, उममुख्यमंत्री
अजित पवार, उममुख्यमंत्री

पुणे - साईबाबा जन्मस्थळावरून सध्या सुरू असलेल्या वादावर चर्चेतून मार्ग काढण्यात येईल, कोणीही कोणाच्या भावना दुखावणार नाही. याची काळजी घ्यावी. कारण एखाद्या विषयातून नवीन समस्या पुढे येतात. मात्र यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जनतेला शांततेच आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावलेली आहे. जन्म स्थळाच्या वादासंदर्भात एकत्र बैठक सर्वांनी या चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. अजित पवारांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओ डोस देऊन शुभारंभ झाला. यावेळी देशात पोलिओ निर्मूलन झालेले आहे. मात्र, पोलिओचे समूळ उच्चाटन होण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. निरोगी देशासाठी ही मोहीम गरजेची असून पुढील चार दिवस ही मोहीम सुरू राहील. जिल्ह्यात 6368 पोलिओ बूथ व्यवस्था असून पाच हजार पेक्षा जास्त ग्रुप काम करणार असल्याचे मत अजित पवारांनी व्यक्त केले. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मत मांडले. त्यावेळी शिर्डी आणि पाथरीच्या वादावरही स्पष्टीकरण दिले.

दारू बंदी संदर्भात बोलताना पवार म्हणाले, अभय बंग यांच्याशी दारू बंदी संदर्भात चर्चा झाली आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी वेगवेगळ्या विभागाची नक्की काय परिस्थिती आहे. रिसोर्सेस वाढवण्यासाठी काय काय करता येतील त्यांच्या सूचना घेऊन आढावा घेतला जाईल. सर्वांच्या माहितीनुसार निर्णय घेऊ. डॉ. बंग यांना वस्तुस्थिती संगितली असून त्यांनी गैरसमज झाला असल्याचे सांगितले असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.

पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा या शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज असल्याचे मतही पवारांनी व्यक्त केले. पुरंदर विमानतळासंदर्भात नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात राहिलेल्या बैठका येत्या काळात घेणार असल्याचं म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी वाडिया रुग्णालया संदर्भात केलेल्या वक्त्व्यावर बोलताना पवार म्हणाले, की प्रकाश आंबेडकर यांनी सद्सद्विवेक बुद्धीने ही भूमिका मांडली आहे. मात्र राज्य सरकार 24 कोटी आणि महानगरपालिका 22 कोटी असे एकूण 46 कोटी वाडिया रुग्णालयास दिलेत. पुढचा मार्ग सर्वांना एकत्र घेऊन चर्चेतून काढू. तातडीची गरज म्हणून 46 कोटी दिलाच अजित पवारांनी स्पष्ट केले.

तर चंद्रकांत पाटील यांच्या मेगा भरतीवर बोलताना पवार यांनी पाटील आदल्या दिवशी एक बोलतात मात्र दुसऱ्या दिवशी म्हणतात मी तसं बोललो नाही, असा टोला लगावला आहे.

तर मुंबईसारखी नाईट लाईफ पुण्यातही असं नाही-

मुंबईचा लाईफ वेगळी आहे. मुंबई कधीच झोपत नाही असे बोलले जाते. मुंबई 24 तास जागी असते.मुंबईचा जो निर्णय घेतला आहे. त्यावर तिथला अनुभव काय येतो, हे पाहूया त्यानंतर अनुभवातून निष्पन्न झालं तर पुण्याबाबत पुढचा विचार करू, तसेच तिथे सुरू झालं तर इथे सुरू करूअसे होत नसते. आपण पुणेकर असून पुणेकरांचं वेगळे मत असू शकते. पुणेकरांना मान्य होईल, यावर भर आहे. मुंबईतील अनुभव घेतल्यानंतर मी पुन्यात नाईटलाईफ सुरू करणार असेही म्हटले नसल्याचेही सांगत पवारांनी सावध भूमिका घेतली.

तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर बोलताना-
दोन राज्यांचे वाद असल्यानंतर वेगळ्या कुरघोडी होत असतात. मात्र हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. तिथे निष्णात वकील देण्याचा प्रयत्न आहे. हरीश साळवे यांची आता इंग्लंडच्या राणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. हरीश साळवेंना वेळ नसल्यास तशाच तोडीच्या निष्णांत वकिलांची नियुक्ती केली जाईल. सीमा विषय मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवला असल्याचेही स्पष्टीकरण यावेळी पवारांनी दिले.

पुणे - साईबाबा जन्मस्थळावरून सध्या सुरू असलेल्या वादावर चर्चेतून मार्ग काढण्यात येईल, कोणीही कोणाच्या भावना दुखावणार नाही. याची काळजी घ्यावी. कारण एखाद्या विषयातून नवीन समस्या पुढे येतात. मात्र यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जनतेला शांततेच आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावलेली आहे. जन्म स्थळाच्या वादासंदर्भात एकत्र बैठक सर्वांनी या चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. अजित पवारांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओ डोस देऊन शुभारंभ झाला. यावेळी देशात पोलिओ निर्मूलन झालेले आहे. मात्र, पोलिओचे समूळ उच्चाटन होण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. निरोगी देशासाठी ही मोहीम गरजेची असून पुढील चार दिवस ही मोहीम सुरू राहील. जिल्ह्यात 6368 पोलिओ बूथ व्यवस्था असून पाच हजार पेक्षा जास्त ग्रुप काम करणार असल्याचे मत अजित पवारांनी व्यक्त केले. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मत मांडले. त्यावेळी शिर्डी आणि पाथरीच्या वादावरही स्पष्टीकरण दिले.

दारू बंदी संदर्भात बोलताना पवार म्हणाले, अभय बंग यांच्याशी दारू बंदी संदर्भात चर्चा झाली आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी वेगवेगळ्या विभागाची नक्की काय परिस्थिती आहे. रिसोर्सेस वाढवण्यासाठी काय काय करता येतील त्यांच्या सूचना घेऊन आढावा घेतला जाईल. सर्वांच्या माहितीनुसार निर्णय घेऊ. डॉ. बंग यांना वस्तुस्थिती संगितली असून त्यांनी गैरसमज झाला असल्याचे सांगितले असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.

पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा या शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज असल्याचे मतही पवारांनी व्यक्त केले. पुरंदर विमानतळासंदर्भात नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात राहिलेल्या बैठका येत्या काळात घेणार असल्याचं म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी वाडिया रुग्णालया संदर्भात केलेल्या वक्त्व्यावर बोलताना पवार म्हणाले, की प्रकाश आंबेडकर यांनी सद्सद्विवेक बुद्धीने ही भूमिका मांडली आहे. मात्र राज्य सरकार 24 कोटी आणि महानगरपालिका 22 कोटी असे एकूण 46 कोटी वाडिया रुग्णालयास दिलेत. पुढचा मार्ग सर्वांना एकत्र घेऊन चर्चेतून काढू. तातडीची गरज म्हणून 46 कोटी दिलाच अजित पवारांनी स्पष्ट केले.

तर चंद्रकांत पाटील यांच्या मेगा भरतीवर बोलताना पवार यांनी पाटील आदल्या दिवशी एक बोलतात मात्र दुसऱ्या दिवशी म्हणतात मी तसं बोललो नाही, असा टोला लगावला आहे.

तर मुंबईसारखी नाईट लाईफ पुण्यातही असं नाही-

मुंबईचा लाईफ वेगळी आहे. मुंबई कधीच झोपत नाही असे बोलले जाते. मुंबई 24 तास जागी असते.मुंबईचा जो निर्णय घेतला आहे. त्यावर तिथला अनुभव काय येतो, हे पाहूया त्यानंतर अनुभवातून निष्पन्न झालं तर पुण्याबाबत पुढचा विचार करू, तसेच तिथे सुरू झालं तर इथे सुरू करूअसे होत नसते. आपण पुणेकर असून पुणेकरांचं वेगळे मत असू शकते. पुणेकरांना मान्य होईल, यावर भर आहे. मुंबईतील अनुभव घेतल्यानंतर मी पुन्यात नाईटलाईफ सुरू करणार असेही म्हटले नसल्याचेही सांगत पवारांनी सावध भूमिका घेतली.

तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर बोलताना-
दोन राज्यांचे वाद असल्यानंतर वेगळ्या कुरघोडी होत असतात. मात्र हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. तिथे निष्णात वकील देण्याचा प्रयत्न आहे. हरीश साळवे यांची आता इंग्लंडच्या राणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. हरीश साळवेंना वेळ नसल्यास तशाच तोडीच्या निष्णांत वकिलांची नियुक्ती केली जाईल. सीमा विषय मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवला असल्याचेही स्पष्टीकरण यावेळी पवारांनी दिले.

Intro:पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिम शुभारंभ करण्यात आला. अजित पवारांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओ डोस देऊन शुभारंभ झाला. यावेळी अजित पवारांनी देशात पोलिओ निर्मूलन केलंय. माञ पोलिओ समूळ उच्चाटनसाठी ही मोहीम आहे. निरोगी देशासाठी ही मोहीम गरजेची असून पुढील चार दिवस ही मोहीम सुरु राहील. जिल्ह्यात 6368 पोलिओ बूथ व्यवस्था असून पाच हजार पेक्षा जास्त ग्रुप काम करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय.

यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. शिर्डी आणि पाथरी चा वादावर बोलताना
मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पाथरी आणि शिर्डीच्या नागरिकांना आव्हान केेेेलय. चर्चेतून मार्ग काढून कोणाच्या ही भावना दुखावणार नाही.
एखादा विषयतून नवीन समस्या पुढे येतात. मात्र यासंदर्भात मुख्यमंत्री आवाहन केलं असून मी पण आव्हान करत आहे. की एकत्र बैठक सर्वांनी या चर्चेतून मार्ग काढावा.

पाथरी आणि शिर्डीच्या लोकांचा काय म्हणणं आहे. हे एकूणच विचार निर्णय घेतील. साई भक्तांना माझा आव्हानही कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही. कोणाचं गैरसमज होणार नाही, असा मुख्यमंत्री मार्ग काढतील असंही अजितदादांनी म्हटलंय.

तर अभय बंग यांच्या दारू बंदी संदर्भात बोलताना
अभय बंग यांच्याशी दारू बंदी संदर्भात चर्चा झाली. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी वेगवेगळ्या भागाचे नक्की काय परिस्थिती आहे. रिसोर्सेस वाढवण्यासाठी काय काय करता येतील त्यांच्या सूचना घेऊन आढावा घेतला जाईल. सर्वांचा माहितीनुसार निर्णय घेऊ. डॉ. बंग यांना वस्तुस्थिती संगितीली असून त्यांनी गैरसमज झाल्याचं म्हटल्याचे अजितदादांनी सांगितलं.

तर पुरंदर विमानतळ बोलताना नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ काळाची गरज आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. आमच्या राहिलेल्या बैठका येत्या काळात घेणार असल्याचं म्हटलंय.

तर प्रकाश आंबेडकर आणि वाडिया रुग्णालयावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सद्सद्विवेक बुद्धीने ही भूमिका मांडली आहे. माञ राज्य सरकार 24 कोटी आणि महानगरपालिका 22 कोटी असे एकूण 46 कोटी रुपये दिलेत. पुढचा मार्ग सर्वांना एकत्र घेऊन चर्चेतून काढू. तातडीची गरज म्हणून 46 कोटी दिलाच अजित पवारांनी म्हटलं.

तर चंद्रकांत पाटील यांच्या मेगा भरतीवर बोलताना
आदल्या दिवशी एक बोलतात माञ दुसऱ्या दिवशी म्हणतात मी तसं बोललो नाही. नक्की ते काय बोलले हे मी समजून घेतो आणि नंतर बोलतो, असंही अजित पवारांनी म्हटलं.

तर मुंबईसारखा पुण्यातील नाईट लाईफ संदर्भात बोलताना
मुंबईचा लाईफ वेगळा आहे. मुंबई कधीच झोपत नाही असं बोललं जातं. मुंबई 24 तास जागी असते.मुंबईचा जो निर्णय घेतला तिथला अनुभव काय येतो हे पाहूया नंतर अनुभवातून निष्पन्न झालं तर पुण्याबाबत पुढचा विचार करू, असही अजित पवारांनी म्हटलं.

इकडं सुरू झालं तर इथ सुरू कर असं नसतं. आपण पुणेकर असून पुणेकरांचं वेगळे मत असु शकतो.
पुणेकरांना मान्य होईल, यावर भर आहे. मुंबईतील अनुभव घेतल्यानंतर मी सुरू करणार आणि नाही करणार असे म्हटले नाही. माञ मुंबईचा अनुभव घेतल्यानंतर गोष्टीचा विचार करू, अशी सावध भूमिका त्यांनी घेतली.

तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर बोलताना
दोन राज्यांचे वाद असल्यानंतर वेगळ्या कुरघोडी होत असतात. मात्र हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. तिथं निष्णात वकील देण्याचा प्रयत्न आहे. हरीश साळवे हे आता इंग्लंडच्या राणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे,
हरीश सळवेना वेळ नसल्यास तशाच तोडीचा निष्णात वकिलाची नियुक्ती केली जाईल. सीमा विषय मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदेवर सोपवल्याचं त्यांनी सांगितलं.

तर पुणे पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न आहे. ज्या काही उपयोग उपाय योजना राबवल्या जात आहे. त्यासाठी मतमतांतर असू शकतात मात्र सर्वांना मान्य होईल असाच निर्णय घेतला जाईल असेही अजित पवारांनी म्हटलं.Body:...Conclusion:...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.