ETV Bharat / state

सरकारने प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण करण्याचा घाट घातला - बाळासाहेब थोरात - प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण

पुण्यातील खडकी आयुध निर्माण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी त्या कामगारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली.

सरकारने प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण करण्याचा घाट घातला - बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Aug 24, 2019, 2:57 PM IST

पुणे - सरकारचा प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण करण्याचा उद्देश आहे. देशात सध्या बेरोजगारी वाढत असून या बेरोजगारीमध्ये भर टाकली जात आहे. सरकार काही घराण्याचे हितसंबंध जपत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

सरकारने प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण करण्याचा घाट घातला - बाळासाहेब थोरात

पुण्यातील खडकी आयुध निर्माण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. थोरात यांनी शनिवारी त्या कामगारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी आहे. सरकार मंदीऐवजी भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. सरकार साम दाम दंड भेद सर्वांचा वापर करत आहे. निवडणुका समोर असताना लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या घटना घडत असल्याचे थोरात म्हणाले.

काँग्रेसने यापूर्वी पूर हाताळला आहे. मात्र, लोक पाण्यात बुडत असताना यांची जल्लोष यात्रा सुरू होती. सरकारला गांभीर्य ओळखता न आल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या प्रकरणी सरकारने माफी मागितली पाहिजे, असेही थोरात म्हणाले.

पुणे - सरकारचा प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण करण्याचा उद्देश आहे. देशात सध्या बेरोजगारी वाढत असून या बेरोजगारीमध्ये भर टाकली जात आहे. सरकार काही घराण्याचे हितसंबंध जपत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

सरकारने प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण करण्याचा घाट घातला - बाळासाहेब थोरात

पुण्यातील खडकी आयुध निर्माण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. थोरात यांनी शनिवारी त्या कामगारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी आहे. सरकार मंदीऐवजी भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. सरकार साम दाम दंड भेद सर्वांचा वापर करत आहे. निवडणुका समोर असताना लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या घटना घडत असल्याचे थोरात म्हणाले.

काँग्रेसने यापूर्वी पूर हाताळला आहे. मात्र, लोक पाण्यात बुडत असताना यांची जल्लोष यात्रा सुरू होती. सरकारला गांभीर्य ओळखता न आल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या प्रकरणी सरकारने माफी मागितली पाहिजे, असेही थोरात म्हणाले.

Intro:देशात प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे, बाळासाहेब थोरातBody:mh_pun_01_balasaheb_thorat_on_gov_av_7201348

anchor
प्रत्येक क्षेत्रात सरकारचा खासगीकरण करण्याचा उद्देश असून काही उद्योजकांचे हितसंबंध सरकार जपत आहे. देशात सध्या बेरोजगारी वाढत असून या बेरोजगारीत भर टाकली जातेय. सरकार काही घराण्याचे हितसंबंध जपत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय. सरकार शेतकरी विरोधी आणि कामगार विरोधी आहे. सरकार मंदी ऐवजी भावनिक राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.पुण्यातील खडकीतील ऑर्डीनन्स फॅक्टरीत संप करणाऱ्या
कामगारांची त्यांनी शनिवारी भेट घेतली. यावेळी ऑर्डीनन्स फॅक्टरी कामगारांच्या देशव्यापी संपला बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा देत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. सध्या सुरु असलेल्या चौकशीवर बोलताना, सरकार साम दाम दंड भेद अवलंबन करत आहेत. निवडणूक समोर ठेऊन लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या घटना घडत असल्याच त्यांनी यावेळी सांगितले. पूरपरिस्थिती वर बोलताना आम्ही पूर हाताळला आहे. मात्र लोकं पाण्यात बुडत असताना यांची जल्लोष यात्रा सुरु होती. सरकारला गांभीर्य ओळखता न आल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या प्रकरणी सरकारने माफी मागितली पाहिजे, असेही थोरात म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.