ETV Bharat / state

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता पीपीई किट घालून बाहेर पडावे'

author img

By

Published : Apr 19, 2021, 4:19 PM IST

राज्य सरकार हे सगळे विषय केंद्रावर सोडून मोकळे होत आहे. जर सर्वकाही केंद्राने करायचे असेल, तर राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करणार आहात, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

chief minister uddhav thackeray should come out with ppe kit said chandrakant patil in pune
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता पीपीई किट घालून बाहेर पडावे'

पुणे - पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील लसीकरण केंद्राचे उदघाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार हे सगळे विषय केंद्रावर सोडून मोकळे होत आहे. जर सर्वकाही केंद्राने करायचे असेल, तर राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करणार आहात, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट घालून बाहेर पडावे -

गुजरात ने रेमडेसिवीर इंजेक्शन एक निर्माण करायला लागणारा 19 दिवसांचा कालावधी 4 दिवसांवर आणला. उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजन बनवण्याचे केंद्र सुरू झाले आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन केंद्र निर्माण करण्यासाठी असलेला निधी खर्चदेखील केलेला नाही, हे तुम्ही जनतेला केंव्हा सांगणार आहात, असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीपीई किट घालून बाहेर पडावे आणि कारखानदाऱ्यांच्या भेटी गाठी कराव्या. फक्त केंद्रावर टीका करून काहीही होणार नाही, अशा सुचनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या.

महाविकास आघाडी सरकारने लसीकरणाचे राजकारण केले -

देशात सर्वात जास्त लसी या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. लसीकरण करताना वयोगटाचे टप्पे ठरलेले आहेत. त्या टप्प्यानुसारच लसी दिल्या जात आहे. परंतु महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. तसेच 45 वयाच्या पुढे नागरिकांना लसीकरण देण्याच ठरले असताना कमी वयातील लोकांना लस कशी दिली, असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रात लसीचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधीपक्ष नेत्याला मुख्यमंत्र्यांइतकेच अधिकार -

शनिवारी ब्रुकफार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर राज्यातील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्याबद्दल विचारणा केली होती. यासंदर्भातही चंद्रकात पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. आम्ही राज्यातील पोलिसांवर दबाव आणत नसून निरपराध माणसांना उचलून नेणे आम्ही सहन करणार नाही. विरोधीपक्ष नेत्याला मुख्यमंत्र्यां इतकेच अधिकार असतात, त्यामुळेच देवेंद्र फडणवीस पोलील ठाण्यात गेले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - शाब्बास रे पठ्ठ्या!!! वर्षभरापासून कोरोना योद्ध्यांना विनामूल्य रिक्षा सेवा

पुणे - पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील लसीकरण केंद्राचे उदघाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार हे सगळे विषय केंद्रावर सोडून मोकळे होत आहे. जर सर्वकाही केंद्राने करायचे असेल, तर राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करणार आहात, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट घालून बाहेर पडावे -

गुजरात ने रेमडेसिवीर इंजेक्शन एक निर्माण करायला लागणारा 19 दिवसांचा कालावधी 4 दिवसांवर आणला. उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजन बनवण्याचे केंद्र सुरू झाले आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन केंद्र निर्माण करण्यासाठी असलेला निधी खर्चदेखील केलेला नाही, हे तुम्ही जनतेला केंव्हा सांगणार आहात, असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीपीई किट घालून बाहेर पडावे आणि कारखानदाऱ्यांच्या भेटी गाठी कराव्या. फक्त केंद्रावर टीका करून काहीही होणार नाही, अशा सुचनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या.

महाविकास आघाडी सरकारने लसीकरणाचे राजकारण केले -

देशात सर्वात जास्त लसी या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. लसीकरण करताना वयोगटाचे टप्पे ठरलेले आहेत. त्या टप्प्यानुसारच लसी दिल्या जात आहे. परंतु महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. तसेच 45 वयाच्या पुढे नागरिकांना लसीकरण देण्याच ठरले असताना कमी वयातील लोकांना लस कशी दिली, असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रात लसीचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधीपक्ष नेत्याला मुख्यमंत्र्यांइतकेच अधिकार -

शनिवारी ब्रुकफार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर राज्यातील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्याबद्दल विचारणा केली होती. यासंदर्भातही चंद्रकात पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. आम्ही राज्यातील पोलिसांवर दबाव आणत नसून निरपराध माणसांना उचलून नेणे आम्ही सहन करणार नाही. विरोधीपक्ष नेत्याला मुख्यमंत्र्यां इतकेच अधिकार असतात, त्यामुळेच देवेंद्र फडणवीस पोलील ठाण्यात गेले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - शाब्बास रे पठ्ठ्या!!! वर्षभरापासून कोरोना योद्ध्यांना विनामूल्य रिक्षा सेवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.