ETV Bharat / state

पक्षाला सोडून गेलेल्यांना परत घेण्याच्या भानगडीत पडू नका, अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना दम

कुणा वाचून कुणाचे नडत नाही, असे म्हणत आता बाहेर गेलेल्यांना सहज प्रवेश नसल्याचे अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मंत्रिमंडळाबाबतचे सर्व निर्णय शरद पवार घेतील, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. विधानसभेचे निकाल लागल्यानंतर झालेल्या सत्तानाट्यानंतर अजित पवारांनी प्रथमच पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.

author img

By

Published : Dec 14, 2019, 11:43 PM IST

Updated : Dec 14, 2019, 11:57 PM IST

pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

पुणे - पक्षाच्या पडत्या काळात पक्षाला सोडून गेले त्यांना परत घेण्याच्या भानगडीत पडू नका, असा दम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. विधानसभेचे निकाल लागल्यानंतर झालेल्या सत्तानाट्यानंतर अजित पवारांनी प्रथमच पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. मंत्रिमंडळाबाबतचे सर्व निर्णय शरद पवार घेतील, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

कुणा वाचून कुणाचे नडत नाही, असे म्हणत आता बाहेर गेलेल्यांना सहज प्रवेश नसल्याचे अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काही निर्णय घेतला, तर तो आपल्याला स्विकारावा लागेल, असेही ते म्हणाले. 'माझ्या बाबतीत पवार साहेब आणि जयंत पाटलांनी निर्णय घेतला म्हणून मी इथे उभा आहे', अशी टिप्पणीदेखील त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा - नागपुरातील 'देवगिरी' जयंत पाटील, की अजित पवारांचे करणार स्वागत?

अमोल मिटकरींना विधान परिषदेत संधी द्यावी यासाठी आपण आग्रही असल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत. यावेळी अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्या, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. यावर अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री पद मीच घेणार आहे, असे म्हणताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, पक्षाकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत तरी हेही एक गूढच राहणार आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर

अजित पवारांनी यावेळी राज्याच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. राज्यावर पावणेपाच लाख कोटी कर्ज आहे, असे आपण म्हणत होतो. मात्र, प्रत्यक्षात ते कर्ज पावणे सात लाख कोटी असल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केला आहे. त्यासोबतच आधीच्या सरकारने हाती घेतलेले प्रकल्प केवळ विरोधासाठी बंद करणार नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. त्या प्रकल्पांचा आढावा घेऊन मगच योग्य ते निर्णय घेतले जातील, असे पवार म्हणाले.

पुणे - पक्षाच्या पडत्या काळात पक्षाला सोडून गेले त्यांना परत घेण्याच्या भानगडीत पडू नका, असा दम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. विधानसभेचे निकाल लागल्यानंतर झालेल्या सत्तानाट्यानंतर अजित पवारांनी प्रथमच पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. मंत्रिमंडळाबाबतचे सर्व निर्णय शरद पवार घेतील, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

कुणा वाचून कुणाचे नडत नाही, असे म्हणत आता बाहेर गेलेल्यांना सहज प्रवेश नसल्याचे अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काही निर्णय घेतला, तर तो आपल्याला स्विकारावा लागेल, असेही ते म्हणाले. 'माझ्या बाबतीत पवार साहेब आणि जयंत पाटलांनी निर्णय घेतला म्हणून मी इथे उभा आहे', अशी टिप्पणीदेखील त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा - नागपुरातील 'देवगिरी' जयंत पाटील, की अजित पवारांचे करणार स्वागत?

अमोल मिटकरींना विधान परिषदेत संधी द्यावी यासाठी आपण आग्रही असल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत. यावेळी अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्या, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. यावर अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री पद मीच घेणार आहे, असे म्हणताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, पक्षाकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत तरी हेही एक गूढच राहणार आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर

अजित पवारांनी यावेळी राज्याच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. राज्यावर पावणेपाच लाख कोटी कर्ज आहे, असे आपण म्हणत होतो. मात्र, प्रत्यक्षात ते कर्ज पावणे सात लाख कोटी असल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केला आहे. त्यासोबतच आधीच्या सरकारने हाती घेतलेले प्रकल्प केवळ विरोधासाठी बंद करणार नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. त्या प्रकल्पांचा आढावा घेऊन मगच योग्य ते निर्णय घेतले जातील, असे पवार म्हणाले.

Intro:पुण्याचा पालकमंत्री मीच, पडत्या काळात पक्षातून गेल्याना घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, अजित पवारBody:mh_pun_02_ajit_pawar_to_ncp_worker_7201348


anchor
पक्षाच्या पडत्या काळात जे गेले त्यांना परत घेण्याच्या भानगडीत पडू नका असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना दिला, कुणा वाचून कुणाचं नडत नाही असे सांगत आता बाहेर गेलेल्या सहज प्रवेश नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले, अर्थात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कुणाबाबत काही निर्णय घेतला तर मात्र आपल्याला काही बोलता येणार, पक्षाच्या नेत्यांनी काही निर्णय घेतला तर स्विकारावा लागेल
माझ्या बाबतीत पवार साहेब आणि जयंत पाटलांनी निर्णय घेतला म्हणून मी इथे उभा आहे अशी मिश्किल टिप्पणी करत अजित पवारांनी शनिवारी पुण्यातल्या पक्ष पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली....विधानसभेचे निकाल लागल्यानंतर झालेल्या सत्तांतर नाट्यानंतर अजित पवारांनी प्रथमच पक्षाच्या पुNयातील पदाधिकाऱ्यांना
संबोधित केले यावेळी अजित पवारांनी त्यांच्या चिरपरिचित बिनधास्त स्टाइल मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला,
5 वर्ष सरकार नसताना जे काम करत होते, दोन डगरींवर पाय ठेवून नव्हते अशांची नावे काढा त्यांना महामंडळावर संधी देण्याचा प्रयत्न आहे असे यावेळी अजित पवार म्हणाले तसेच आगामी काळात पक्षासाठी झोकून काम केलेल्याचा पक्ष नक्कीच विचार करेल हे सांगत असताना, निवडणूक काळात पक्ष प्रचारात झंझावाती दौरे करणाऱ्या
अमोल मिठकरीं यांना विधान परिषदेत संधी द्यावी यासाठी मी आग्रही आहे असे अजित पवार यावेळी म्हणाले....आता राज्यात आपले सरकार आहे त्यामुळे जबाबदारीने वागा, तीन पक्षाचे सरकार असले तरी काँगेस, राष्ट्रवादी च्या विचारधारेत फार फरक नाही मात्र शिवसेनेची विचारधारा काहीशी वेगळी असं असताना पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांनी समतोल विचार केला इच्छाशक्ती असेल तर काहीही घडू शकतं, यातून महाविकास आघाडी उदयास आली असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले दरम्यान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद घ्या असा आग्रह कार्यकर्त्यांनी करताच आता पुण्याच्या विविध प्रश्नांवर तुमच्याशी चर्चा करतोय ती काय उगाच का, पालकमंत्री मीच होणार असे अजित पवारांनी स्पष्ट करून टाकले आणि कार्यकर्त्यांनी एकच घोषणबाजी केली...जी खाती 15 वर्षे आपल्याकडे नव्हती ती आपण घेतली आहेत, आणखी एखाद दुसरं खातं येऊ शकतं असे सांगत महापालिका निवडणुकीसाठी 4 ऐवजी 1 किंवा 2 सभासदांचा प्रभाग करण्याचा विचार सुरू आहे असे त्यांनी स्पष्ट केले ...दरम्यान
आधीच्या सरकारने हाती घेतलेले प्रकल्प विरोधासाठी विरोध म्हणून बंद करणार नाही. त्यांचा आढावा घेऊन जनतेचे हित लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतले जातील.
राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. राज्यावर आपण पावणेपाच लाख कोटी
कर्ज म्हणत होतो, ते पावणे सात लाख कोटी आहे असे देखील त्यांनी सांगितले....Conclusion:
Last Updated : Dec 14, 2019, 11:57 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.