पुणे - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, मणीपूर, आसाम,ओरीसा, पश्चिम बंगाल व मिझोराम या राज्यामधील 2 लाख 5 हजार 684 प्रवाशांना घेऊन रेल्वे रवाना झाल्या आहेत. पुणे विभागातून 4 जून 2020 अखेर 154 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 62, उत्तराखंडसाठी 2, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 8, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मीरसाठी 1, मणिपूरसाठी 1, आसामसाठी 1, ओरीसासाठी 2, पश्चिम बंगालसाठी 12 आणि मिझोराम 1, अशा एकूण 154 रेल्वेगाडया 2 लाख 5 हजार 684 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.