ETV Bharat / state

...म्हणून पाथरीच्या नूकसानग्रस्त शेतकऱ्याने ओढ्यावर बनवला लाकडी पूल

author img

By

Published : Nov 8, 2019, 10:36 AM IST

शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतात जाणासाठी रस्ता नसल्याने पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द येथील ज्ञानोबा सोपानराव गायकवाड यांनी ओढ्यावर लाकडी पुल बनवला आहे. नुकसान भरपाईसाठी पंचनाम्याची अट असल्याने पंचनामा व्हावा आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या शेतातील परिस्थिती पहावी, यासाठी जमेल ते प्रयत्न शेतकरी करत आहेत.

ओढ्यावर बनवलेला लाकडी पुल

परभणी - आतिवृष्टीने बाधित शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतात जाणासाठी रस्ता नसल्याने एका शेतकऱ्याने ओढ्यावर लाकडी पूल बनवला आहे. पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द येथील शेतकरी ज्ञानोबा सोपानराव गायकवाड यांनी हा पुल बनवून अधिकाऱ्यांची सोय केली.

शेतकऱ्याने ओढ्यावर बनवला लाकडी पुल

तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांसारखे प्रशासकीय अधिकारी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेताची पाहणी करण्यासाठी फिरत आहेत. नुकसान भरपाईसाठी पंचनाम्याची अट असल्याने पंचनामा व्हावा आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या शेतातील परिस्थिती पहावी, यासाठी जमेल ते प्रयत्न शेतकरी करत आहेत. शेतालगत असलेल्या ओढ्यावरील पुल वाहून गेल्याने शेतात ये-जा कारण्यासाठीचा रस्ता बंद झाला होता. रस्ता नसल्यामुळे पंचनामा करण्यात अडचण येऊ नये म्हणून ज्ञानोबा यांनी हा पुल बंधला. गोपाळ नाईक, नामदेव नाईक, मधुकर आगलावे, तुकाराम गायकवाड, विजय माळी या शेतकऱ्यांनीही हा पूल बनवण्यासाठी ज्ञानोबा यांना मदत केली आहे.

हेही वाचा - पंचनाम्याच्या प्रश्नांना वैतागून शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी; जिंतूर तालुक्यातील प्रकार

यंदा एकट्या पाथरी मंडळात 1200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे. आतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतीचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आता प्रशासनाकडे आशेने पाहत आहे.

परभणी - आतिवृष्टीने बाधित शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतात जाणासाठी रस्ता नसल्याने एका शेतकऱ्याने ओढ्यावर लाकडी पूल बनवला आहे. पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द येथील शेतकरी ज्ञानोबा सोपानराव गायकवाड यांनी हा पुल बनवून अधिकाऱ्यांची सोय केली.

शेतकऱ्याने ओढ्यावर बनवला लाकडी पुल

तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांसारखे प्रशासकीय अधिकारी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेताची पाहणी करण्यासाठी फिरत आहेत. नुकसान भरपाईसाठी पंचनाम्याची अट असल्याने पंचनामा व्हावा आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या शेतातील परिस्थिती पहावी, यासाठी जमेल ते प्रयत्न शेतकरी करत आहेत. शेतालगत असलेल्या ओढ्यावरील पुल वाहून गेल्याने शेतात ये-जा कारण्यासाठीचा रस्ता बंद झाला होता. रस्ता नसल्यामुळे पंचनामा करण्यात अडचण येऊ नये म्हणून ज्ञानोबा यांनी हा पुल बंधला. गोपाळ नाईक, नामदेव नाईक, मधुकर आगलावे, तुकाराम गायकवाड, विजय माळी या शेतकऱ्यांनीही हा पूल बनवण्यासाठी ज्ञानोबा यांना मदत केली आहे.

हेही वाचा - पंचनाम्याच्या प्रश्नांना वैतागून शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी; जिंतूर तालुक्यातील प्रकार

यंदा एकट्या पाथरी मंडळात 1200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे. आतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतीचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आता प्रशासनाकडे आशेने पाहत आहे.

Intro:परभणी - आतिवृष्टिने बाधित शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांना शेतात येता यावे, यासाठी रामपुरी खु. (ता.पाथरी) येथील शेतकरी ज्ञानोबा सोपानराव गायकवाड यांनी ओढ्यावर लाकडी पूल बनवून सोय केली आहे.
Body:परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. एकट्या पाथरी मंडळात 1200 मिमीवर पाऊस झाला. हा पाऊस जवळपास वार्षिक सरासरीच्या दुप्पटीच्या जवळपास आहे. नुकसान भरपाईसाठी पंचनाम्याची अट असल्याने पंचनामा व्हावा आणि त्यासाठी साहेबांनी आपल्या शेतातील पीक परिस्थिती पहावी, यासाठी वाट्टेल ते प्रयत्न शेतकरी करत आहेत. त्यानुसारच पाथरी शहरातून येणाऱ्या सर्व ओढ्याच पाणी हे एकाच ओढ्यातून येत असल्यामुळे नाल्यावर असलेल्या नळी टाकून केलेला पूल वाहून गेला. त्यामुळे या ओढ्यावर लाकडी पुल तयार करण्यात आला आहे. हा पूल बनवण्यासाठी गोपाळ नाईक, नामदेव नाईक, मधुकर आगलावे, तुकाराम गायकवाड, विजय माळी या शेतकऱ्यांनी मदत केली.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pool_photo & pool_vis
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.