ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; बोंदरगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू

author img

By

Published : Apr 27, 2019, 7:26 PM IST

उष्माघातामुळे शनिवारी सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात उष्माघाताचा बळी

परभणी - जिल्ह्यातील तापमान ४६ अंशावर पोहचल्याने उष्णतेची लाट आली आहे. या उष्माघातामुळे आज( शनिवारी) सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सोनपेठ पोलिसांनी नोंद घेतली आहे.

सोमेश्वर रघुनाथ सपकाळ (४२) असे उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर सूर्यनारायण आग ओकत आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ताप, खोकला, घशाचे आजार वाढले आहेत. जास्त काळ उन्हात काम करणाऱ्यांना उन्हालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. शुक्रवारी परभणी जिल्ह्यात तब्बल ४५.७ अंश सेल्सिअस तापमान होते.

रखरखत्या उन्हात सोमेश्वर सपकाळ यांनी बोंदरगाव शिवारातील आपल्या शेतात दिवसभर काम केले. सध्या ज्वारीचे खळे असल्यामुळे त्यांनी शेतातील आखाड्यावर रात्री मुक्काम केला. मात्र, शनिवारी सकाळच्या सुमारास त्यांचे चुलत भाऊ मोटर चालू करण्यासाठी गेले असता सोमेश्वर झोपलेले दिसले. त्यांच्या भावाने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उठले नाहीत. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

परभणी - जिल्ह्यातील तापमान ४६ अंशावर पोहचल्याने उष्णतेची लाट आली आहे. या उष्माघातामुळे आज( शनिवारी) सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सोनपेठ पोलिसांनी नोंद घेतली आहे.

सोमेश्वर रघुनाथ सपकाळ (४२) असे उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर सूर्यनारायण आग ओकत आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ताप, खोकला, घशाचे आजार वाढले आहेत. जास्त काळ उन्हात काम करणाऱ्यांना उन्हालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. शुक्रवारी परभणी जिल्ह्यात तब्बल ४५.७ अंश सेल्सिअस तापमान होते.

रखरखत्या उन्हात सोमेश्वर सपकाळ यांनी बोंदरगाव शिवारातील आपल्या शेतात दिवसभर काम केले. सध्या ज्वारीचे खळे असल्यामुळे त्यांनी शेतातील आखाड्यावर रात्री मुक्काम केला. मात्र, शनिवारी सकाळच्या सुमारास त्यांचे चुलत भाऊ मोटर चालू करण्यासाठी गेले असता सोमेश्वर झोपलेले दिसले. त्यांच्या भावाने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उठले नाहीत. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

Intro:परभणी - परभणी जिल्ह्यातील तापमान 46 अंशावर पोहचल्याने उष्णतेची लाट आली आहे. यामुळे नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. या उष्माघातातच आज सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तशी नोंद सोनपेठ पोलिसांनी घेतली असून सोमेश्वर रघुनाथ सपकाळ (४२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. Body:सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर सूर्यनारायण आग ओकत आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ताप, खोकला, घशाचे आजार वाढले आहेत. जास्त काळ उन्हात काम करणाऱ्यांना उन्हालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. दरम्यान, काल शुक्रवारी परभणी जिल्ह्यात तब्बल 45.7 अंश सेल्सिअस तापमान होते. अश्या रखरखत्या उन्हात सोमेश्वर रघुनाथ सपकाळ या शेतकऱ्यानी बोंदरगाव शिवारातील आपल्या शेतात दिवसभर काम केले. सध्या ज्वारीचे खळे असल्यामुळे त्यांनी शेतातील आखाड्यावर रात्री मुकाम केला. मात्र आज शनिवारी सकाळच्या सुमारास त्यांचे चुलत भाऊ शेतातील मोटर चालू करण्यासाठी गेले असता, सोमेश्वर झोपलेले दिसले. त्यांना उठवायचा प्रयत्न केला, परंतू ते उठलेच नाहीत. त्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांनामृत घोषित केले. तर या प्रकरणी सोमेश्वर यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची नोंद सोनपेठ पोलिसांनी करून पुढील तपास सुरू केला आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- शेतकरी सोमेश्वर यांचा फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.