ETV Bharat / state

पीक कर्जातून थकबाकी वसुलीविरोधात शेतकऱ्यांचा स्टेट बँकेवर मोर्चा

दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून बँक परस्पर थकबाकीची रक्कम व्याजासह कपात करत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. पीक कर्जातून थकबाकी वसुलीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज (शुक्रवार) मानवत येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढला.

author img

By

Published : Feb 1, 2019, 9:36 AM IST

anna

परभणी - दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून बँक परस्पर थकबाकीची रक्कम व्याजासह कपात करत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. पीक कर्जातून थकबाकी वसुलीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज (शुक्रवार) मानवत येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढला.


यावेळी शेतकऱ्यांनी कपात केलेली रक्कम बँकेने तत्काळ परत करावी, ही मागणी लावून धरली होती. बसस्थानक परिसरातील महाराणा प्रताप या चौकातून मोर्चास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी बँकेचे व्यवस्थापक मनीष कालरा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, भास्कर खटिंग, राजू शिंदे, केशव आरमाळ, तालुकाध्यक्ष बालासाहेब आळणे, हनुमान मसलकर, माऊली निर्वळ, विक्रम निर्वळ, सुनील पान्हेरे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

परभणी - दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून बँक परस्पर थकबाकीची रक्कम व्याजासह कपात करत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. पीक कर्जातून थकबाकी वसुलीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज (शुक्रवार) मानवत येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढला.


यावेळी शेतकऱ्यांनी कपात केलेली रक्कम बँकेने तत्काळ परत करावी, ही मागणी लावून धरली होती. बसस्थानक परिसरातील महाराणा प्रताप या चौकातून मोर्चास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी बँकेचे व्यवस्थापक मनीष कालरा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, भास्कर खटिंग, राजू शिंदे, केशव आरमाळ, तालुकाध्यक्ष बालासाहेब आळणे, हनुमान मसलकर, माऊली निर्वळ, विक्रम निर्वळ, सुनील पान्हेरे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Intro:परभणी - दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिक कर्जातुन बँक परस्पर थकबाकीची रक्कम व्याजासह कपात केल्या जात आहे. याचा शेतकऱ्यांनी आज मानवतच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.Body:या वेळी शेतकऱ्यांनी कपात केलेली रक्कम तात्काळ परत करावी, ही मागणी लावून धरली होती. हा मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. बसस्थानक परिसरातील महाराणा प्रताप चौकातून या मोर्चास सुरुवात झाली होती. यावेळी बँकेचे व्यवस्थापक मनिष कालरा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.Conclusion:या मोर्चात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, भास्कर खटिंग, राजु शिंदे, केशव आरमाळ, तालुकाध्यक्ष बालासाहेब आळणे, हनुमान मसलकर, माऊली निर्वळ, विक्रम निर्वळ, सुनील पान्हेरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
- गिरीराज भगत, परभणी

सोबत मोर्चा photo
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.