ETV Bharat / state

महापरिक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी परभणीत विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

author img

By

Published : Sep 18, 2019, 11:16 PM IST

राज्यभरात सर्व नोकर भरती बंद ठेवली आहे. नव्या पोर्टलचे मोठ्या प्रमाणात नवनवीन घोटाळे उघडकीस येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे सामाजिक आणि शैक्षणिक शोषण थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड व स्वामी विवेकानंद करिअर अॅकडमीच्या वतीने विविध स्तरातील विद्यार्थांना सोबत घेऊन हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

महापरिक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी परभणीत विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

परभणी - संभाजी ब्रिगेड व स्वामी विवेकानंद किरअर अॅकडमीच्या वतीने बुधवारी स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांचा आक्रोश मोर्चा निघाला. राज्यभरात सध्या प्रचंड बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल निर्माण करुन नवी बेरोजगारी वाढवली, असा आरोप करत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला होता.

महापरिक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी परभणीत विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

हेही वाचा - नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळे फुगे सोडून

जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात सर्व नोकर भरती बंद ठेवली आहे. नव्या पोर्टलचे मोठ्या प्रमाणात नवनवीन घोटाळे उघडकीस येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे सामाजिक आणि शैक्षणिक शोषण थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड व स्वामी विवेकानंद करिअर अॅकडमीच्या वतीने विविध स्तरातील विद्यार्थांना सोबत घेऊन हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड, प्राध्यापक विठ्ठल कांगणे, अॅड अमोल गिराम, स्वप्नील गरुड यांनी नेतृत्व केले. तर मोर्चात स्वामी विवेकानंद, संघर्ष, रिलायबल, व्हिजन, जिजाऊ, द्रोण, अभिनव, चौरे स्टडी सर्कल, ज्ञानगंगा, जिजाऊ ज्ञानतीर्थ आदी क्लासेस व स्टडी सर्कलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

हेही वाचा - राष्ट्रवादीची 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे परळीतून रिंगणात महाजनादेश यात्रेचा निषेध

दरम्यान, कॅरिअर अॅकडमीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून अभ्यास करुनही केवळ भरती प्रक्रिया माहिती नसल्यामुळे अनेक उमेदवार नैराश्यात आहेत. त्यामुळे अनेक घोटाळेयुक्त आणि कीचकट झालेल्या सरकारच्या या महापोर्टल भरती विरोधात मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.

हेही वाचा - धुळ्यात लाचखोर मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात

परभणी - संभाजी ब्रिगेड व स्वामी विवेकानंद किरअर अॅकडमीच्या वतीने बुधवारी स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांचा आक्रोश मोर्चा निघाला. राज्यभरात सध्या प्रचंड बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल निर्माण करुन नवी बेरोजगारी वाढवली, असा आरोप करत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला होता.

महापरिक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी परभणीत विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

हेही वाचा - नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळे फुगे सोडून

जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात सर्व नोकर भरती बंद ठेवली आहे. नव्या पोर्टलचे मोठ्या प्रमाणात नवनवीन घोटाळे उघडकीस येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे सामाजिक आणि शैक्षणिक शोषण थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड व स्वामी विवेकानंद करिअर अॅकडमीच्या वतीने विविध स्तरातील विद्यार्थांना सोबत घेऊन हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड, प्राध्यापक विठ्ठल कांगणे, अॅड अमोल गिराम, स्वप्नील गरुड यांनी नेतृत्व केले. तर मोर्चात स्वामी विवेकानंद, संघर्ष, रिलायबल, व्हिजन, जिजाऊ, द्रोण, अभिनव, चौरे स्टडी सर्कल, ज्ञानगंगा, जिजाऊ ज्ञानतीर्थ आदी क्लासेस व स्टडी सर्कलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

हेही वाचा - राष्ट्रवादीची 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे परळीतून रिंगणात महाजनादेश यात्रेचा निषेध

दरम्यान, कॅरिअर अॅकडमीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून अभ्यास करुनही केवळ भरती प्रक्रिया माहिती नसल्यामुळे अनेक उमेदवार नैराश्यात आहेत. त्यामुळे अनेक घोटाळेयुक्त आणि कीचकट झालेल्या सरकारच्या या महापोर्टल भरती विरोधात मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.

हेही वाचा - धुळ्यात लाचखोर मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात

Intro:परभणी - येथील संभाजी ब्रिगेड व स्वामी विवेकानंद किरअर अॅकडमीच्या वतीने आज स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांचा आक्रोश मोर्चा निघाला. राज्यभरात सध्या प्रचंड बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल निर्माण करुन नवी बेरोजगारी वाढवली, असा आरोप करत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला.Body: जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात सर्व नोकर भरती बंद ठेवली आहे. नव्या पोर्टलचे मोठ्या प्रमाणात नवनवीन घोटाळे उघडकीस येत आहेत. यामुळे विद्यार्थाचे होणारे सामाजिक आणि शैक्षणिक शोषण थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड व स्वामी विवेकानंद करिअर अॅकडमीच्या वतीने विविध स्तरातील विद्यार्थांना सोबत घेऊन हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड, प्रा.विठ्ठल कांगणे, अॅड अमोल गिराम, स्वप्नील गरुड यांनी नेतृत्व केले. तर मोर्चात स्वामी विवेकानंद, संघर्ष, रिलायबल, व्हिजन, जिजाऊ, द्रोण, अभिनव, चौरे स्टडी सर्कल, ज्ञानगंगा, जिजाऊ ज्ञानतीर्थ आदी क्लासेस व स्टडी सर्कलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान, कॅरिअर अॅकडमीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून अभ्यास करुनही केवळ भरती प्रक्रिया माहिती नसल्यामुळे अनेक उमेदवार नैराश्यात आहेत. त्यामुळे अनेक घोटाळेयुक्त आणि किचकट झालेल्या शासनाच्या या महापोर्टल भरती विरोधात मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला. या प्रसंगी प्रा.माणिक जव्हार, प्रा.दिलीप उबाळे, प्रा.ज्ञानेश्वर घुगे, प्रा.नाथराव कुटुंले, प्रा.अशोक भोरकडे, प्रा.दिलीप गिराम, प्रा.मुंजाजी घोडवे, प्रा.बालासाहेब आव्हाड, दिनकर गरुड, साहेब शिंदे, सखाराम रणेर, अनमोल झाडे, गोपाल मोहिते , गजानन प्रधान यांच्यासह असंख्य स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व विद्यार्थीनीचा सहभाग होता.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photos 1 to 3 & vis - pbn_march_against_mahportal_vis
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.