ETV Bharat / state

राज्य सहकारी बँक प्रकरण : कोणाच्या चुका असतील तर त्या पुढे येतीलच - अजित पवार

author img

By

Published : Aug 22, 2019, 11:57 PM IST

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ५५ जणांना उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. याप्रकरणी बोलताना अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार

परभणी - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ५५ जणांना उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. ५ दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. याप्रकरणी बोलताना अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. 'कोणाच्या चुका असतील तर त्या पुढे येतीलच आणि नसल्या तर तेही पुढे येईल, असे पवार म्हणाले.

अजित पवार


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे परभणीत आगमन झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने अजित पवारांसह इतर 55 राजकीय पुढाऱ्यांवर राज्य सहकारी बँकेच्या संबंधाने गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की कुणीतरी यासंदर्भात 'पीआयएल' दाखल केले आहे. त्यावरून उच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याचे मला समजले आहे. परंतु, आमच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे 'जोपर्यंत निर्णयाची प्रत हातात येत नाही, तोपर्यंत याबाबत वक्तव्य करणे उचित नसल्याचे पवार म्हणाले.

राज्य सहकारी बँकेच्या संचालक पदावर असताना मी उपमुख्यमंत्री आणि मंत्री देखील होतो. त्यावेळी कमिटीच्या बैठकीला मी कधीच हजर राहिलो नाही. संचालक बोर्डाच्या बैठकींना मात्र काहीवेळा हजर होतो. त्याठिकाणी काय निर्णय झाले, ते मला माहित नाहीत. परंतु वकिलांशी सल्लामसलत करू आणि पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. मी यात एकटा नाही, 55 संचालक आहेत. ते वेगवेगळ्या पक्षाचे लोक असल्याचे पवार म्हणाले.

या विषयावर मी अधिक बोलणार नाही. कारण, एखाद्या वेळेस न्याय व्यवस्थेचा अपमान होऊ शकतो. तसे काही होऊ नये याची आपण खबरदारी घेत असल्याचे पवार म्हणाले. यावेळी शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजानी दुर्रानी, विजय भांबळे, रामराव वडकुते, सतीश चव्हाण, विक्रम काळे, राजेश विटेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

परभणी - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ५५ जणांना उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. ५ दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. याप्रकरणी बोलताना अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. 'कोणाच्या चुका असतील तर त्या पुढे येतीलच आणि नसल्या तर तेही पुढे येईल, असे पवार म्हणाले.

अजित पवार


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे परभणीत आगमन झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने अजित पवारांसह इतर 55 राजकीय पुढाऱ्यांवर राज्य सहकारी बँकेच्या संबंधाने गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की कुणीतरी यासंदर्भात 'पीआयएल' दाखल केले आहे. त्यावरून उच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याचे मला समजले आहे. परंतु, आमच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे 'जोपर्यंत निर्णयाची प्रत हातात येत नाही, तोपर्यंत याबाबत वक्तव्य करणे उचित नसल्याचे पवार म्हणाले.

राज्य सहकारी बँकेच्या संचालक पदावर असताना मी उपमुख्यमंत्री आणि मंत्री देखील होतो. त्यावेळी कमिटीच्या बैठकीला मी कधीच हजर राहिलो नाही. संचालक बोर्डाच्या बैठकींना मात्र काहीवेळा हजर होतो. त्याठिकाणी काय निर्णय झाले, ते मला माहित नाहीत. परंतु वकिलांशी सल्लामसलत करू आणि पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. मी यात एकटा नाही, 55 संचालक आहेत. ते वेगवेगळ्या पक्षाचे लोक असल्याचे पवार म्हणाले.

या विषयावर मी अधिक बोलणार नाही. कारण, एखाद्या वेळेस न्याय व्यवस्थेचा अपमान होऊ शकतो. तसे काही होऊ नये याची आपण खबरदारी घेत असल्याचे पवार म्हणाले. यावेळी शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजानी दुर्रानी, विजय भांबळे, रामराव वडकुते, सतीश चव्हाण, विक्रम काळे, राजेश विटेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:परभणी - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व इतर 55 जणांवर येत्या 5 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आर्थिक गुन्हे शाखेला
दिले आहेत. दरम्यान याबाबत बोलताना अजित पवार यांनी 'कोणाच्या चुका असतील तर ते पुढे येईलच आणि नसेल तर तेही पुढे येईल, अशी सावध प्रतिक्रिया आज (गुरुवारी) परभणी दिली आहे.Body:राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त परभणीत गुरुवारी अजित पवार आले असता, त्यांनी सायंकाळी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी प्रथम त्यांनी काही तासांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्यासह इतर 55 राजकीय पुढाऱ्यांवर राज्य सहकारी बँकेच्या संबंधाने गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कुणीतरी यासंदर्भात 'पीआयएल' दाखल केले आहे. त्यावरून उच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याचे मला समजले आहे; परंतु आमच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे 'जोपर्यंत निर्णयाची प्रत हातात येत नाही, तोपर्यंत याबाबत वक्तव्य करणे उचित नाही. दरम्यान, राज्य सहकारी बँकेच्या संचालक पदावर असताना मी उपमुख्यमंत्री आणि मंत्री देखील होतो. त्यावेळी कमिटीच्या बैठकीला मी कधीच हजर राहिलो नाही. संचालक बोर्डाच्या बैठकींना मात्र काहीवेळा हजर होतो. त्याठिकाणी काय निर्णय झाले, ते मला माहित नाही; परंतु वकिलांशी सल्लामसलत करू आणि पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. मी यात एकटा नाही, 55 संचालक आहेत. ते वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत.
याच सहकार बँकेवर वसंतदादा पाटील विलासराव देशमुख आदी मान्यवरांनी देखील प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास सांगितले असेल तर पुढच्या काही दिवसात नियमाप्रमाणे काय कारवाई होईल. यात कोणाच्या चुका असतील तर त्या पुढे येतील आणि चुका नसतील तर तेही पुढे येईल. याबद्दल एवढेच बोलणे सध्या उचित राहील. हा विषय मी येथेच थांबवतो, असेही अजित पवार म्हणाले.
तसेच ऑर्डर येईपर्यंत अधिक बोलणार नाही, एखाद्या वेळेस न्याय व्यवस्थेचा अपमान होऊ शकतो, तसे काही होऊ नये याची आपण खबरदारी घेत आहोत, असेही शेवटी अजित पवारांनी सांगितले. यावेळी शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजानी दुर्रानी, विजय भांबळे, रामराव वडकुते, सतीश चव्हाण, विक्रम काळे, राजेश विटेकर, प्रताप देशमुख, स्वराजसिंह परिहार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- अजित पवार यांची byte...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.