पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटा येथील कोटुंबी नदीत टँकर उलटल्याची घटना घडली. त्यातील रसायन पाण्यात पडल्यामुळे पाण्यात पांढऱ्या रंगाचे फेसांचे १५ ते २० फूटांचे डोंगर तयार झाले.
या टँकरमध्ये नेमके कुठले रसायन होते, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र, यामुळे नदीतील अनेक मासे जीवजंतू मृत पावले आहेत. स्थानिकांनी मासे पकडण्यासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून याबाबत कुठलीच माहिती स्थानिकांना दिली गेली नाही. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. तर, स्थानिकांनी आणि प्रवाशांनी या ठिकाणी फोटो काढण्यासाठी गर्दी केली.