पालघर/विरार - विरार पश्चिम बोळींज रानपाडा येथे एका बंगल्याचा सेफ्टी टॅंक साफ करण्यासाठी उतरलेल्या ४ कामगारांपैकी ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.
नितेश मुकणे, नयन भोये, जयेंद्र मुकणे आणि तेजस भाटे अशी या कामगारांची नावे आहेत. या घटनेत नितेश मुकणे याचे प्राण वाचले असून त्याच्यावर विरारमधील संजीवनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद अर्नाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. लॉकडाऊनमध्ये पोटा-पाण्यासाठी काम करताना या कामगारांचा झालेला मृत्यू दुर्दैवी मृत्यू म्हणावा लागेल.