ETV Bharat / state

विक्रमगडच्या विक्रमशाह वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

या घटनेमुळे पालघरमध्ये वसतीगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा अजूनही रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

author img

By

Published : Jul 8, 2019, 6:11 PM IST

संपादित छायाचित्र

पालघर- समाज कल्याण विभागाच्या विक्रमगड येथील विक्रमशाह या अनुदानीत वसतिगृहात राहणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंता तुळशीराम वायात असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये वसतीगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा अजूनही रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

अनंताचे वडील तुळशीराम वायात, वसतीगृह अधीक्षक नरेश धोंडे आणि सामाजिक कार्यकर्ते लहू नडगे यांच्या प्रतिक्रिया

अनंता हा विक्रमगड मधील खुडेद महालपाडा येथील रहिवासी होता. तो विक्रमगड येथील शाळेत सातवीत शिक्षण घेत होता. मात्र, काल रात्री वसतीगृहात असताना 1 वाजेच्या सुमारास त्याला अचानक उलटी झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात उपचार सुरू असताना अनंताचा 4 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने अनंताचा मृत्यू झाल्याचा आरोप अनंताच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, अनंताच्या मृत्यूनंतर समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

पालघर- समाज कल्याण विभागाच्या विक्रमगड येथील विक्रमशाह या अनुदानीत वसतिगृहात राहणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंता तुळशीराम वायात असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये वसतीगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा अजूनही रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

अनंताचे वडील तुळशीराम वायात, वसतीगृह अधीक्षक नरेश धोंडे आणि सामाजिक कार्यकर्ते लहू नडगे यांच्या प्रतिक्रिया

अनंता हा विक्रमगड मधील खुडेद महालपाडा येथील रहिवासी होता. तो विक्रमगड येथील शाळेत सातवीत शिक्षण घेत होता. मात्र, काल रात्री वसतीगृहात असताना 1 वाजेच्या सुमारास त्याला अचानक उलटी झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात उपचार सुरू असताना अनंताचा 4 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने अनंताचा मृत्यू झाल्याचा आरोप अनंताच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, अनंताच्या मृत्यूनंतर समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Intro:समाज कल्याण विभागाच्या विक्रमगड येथील विक्रमशाह या अनुुदानित वसतिगृहात राहणाऱ्या अनंता तुळशीराम वायात या 13 वर्षीय इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांचा वस्तीगृहात मृत्यूBody: समाज कल्याण विभागाच्या विक्रमगड येथील विक्रमशाह या अनुुदानित वसतिगृहात राहणाऱ्या अनंता तुळशीराम वायात या 13 वर्षीय इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांचा वस्तीगृहात मृत्यू

नमित पाटील,
पालघर, दि.8/7/2019

समाज कल्याण विभागाच्या विक्रमगड येथील विक्रमशाह या अनुुदानित वस्तीगृहात राहणाऱ्या अनंता तुळशीराम वायात या 13 वर्षीय इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वस्तीगृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . त्यामुळे पालघरमध्ये वस्तीगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा अजूनही रामभरोसे असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे .

अनंता हा विक्रमगड मधील खुडेद महालपाडा येथील राहणारा विद्यार्थी असून तो विक्रमगड येथील शाळेत सातवीत शिक्षण घेत होता. मात्र काल रात्री वस्तीगृहात असताना 1 वाजताच्या सुमारास त्याला अचानक उलटी झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना अनंताचा 4 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने अनंता चा मृत्यू झाल्याचा आरोप अनंता च्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान अनंताच्या मृत्यूनंतर समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.


बाईट - तुळशीराम वायात - अनंताचे वडील
बाईट - नरेश धोंडे - वसतिगृह अधीक्षक
बाईट - लहू नडगे - सामाजिक कार्यकर्ते Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.