ETV Bharat / state

वाढवण बंदर उभारणीला माझा पाठिंबा, पण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे - रामदास आठवले

author img

By

Published : Jan 3, 2021, 10:20 PM IST

केंद्र शासनाने 65 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी गुंतवणूक केल्याने सव्वा लाख लोकांना रोजगार उत्पन्न होत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आणि जमिनीचा चांगला मोबदला मिळणार आहे. त्यामुळे, वाढवण बंदराला विरोध न करता पाठिंबा द्यावा, असे सांगून आपला वाढवण बंदराला पाठिंबा असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

Wadhwan port ramdas athavle support
रामदास आठवले

पालघर - केंद्र शासनाने 65 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी गुंतवणूक केल्याने सव्वा लाख लोकांना रोजगार उत्पन्न होत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आणि जमिनीचा चांगला मोबदला मिळणार आहे. त्यामुळे, वाढवण बंदराला विरोध न करता पाठिंबा द्यावा, असे सांगून आपला वाढवण बंदराला पाठिंबा असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. पालघर दौऱ्यावर आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

रिपाईचा वाढवण बंदर उभारणीला पाठिंबा

देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून वाढवण बंदर ओळखले जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 65 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध असून मच्छीमार व्यावसायाला धोका निर्माण होणार असल्याची माझी माहिती आहे. परंतु, माझी सर्वांना नम्र विनंती आहे, की बऱ्याच वर्षानंतर इतका महत्वपूर्ण आणि मोठा प्रकल्प होणार आहे, ज्यामुळे सव्वा लाख लोकांना रोजगार निर्माण होऊन स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत. अनेकांचा यामुळे फायदा होणार असून, दुसरीकडे रस्त्यासाठी 550 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - आमची कुस्ती भाजप आणि एमआयएमसोबत - बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

पत्रकारांनी, अणुऊर्जा प्रकल्पासाठी पोखरण, अक्करपट्टी मधील जमिनी संपादित केलेल्या स्थानिकांना आतापर्यंत किती नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या? काय सुविधा दिल्या? तसेच वाढवण बंदरामुळे समुद्रात 5 हजार एकरावर भराव टाकल्याने तेथील मासेमारीचे क्षेत्र संपुष्टात येणार असल्याने मच्छिमारांसाठी पर्यायी व्यवस्था काय? आदी प्रश्न विचारल्यावर राज्यमंत्री समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. लोकांच्या भावनांचा विचार करणे अवश्यक असल्याचे सांगून आपल्या अडचणी, प्रश्नांबाबत आपण केंद्र सरकारशी बोलू, असे उत्तर त्यांनी दिले.

काय आहे वाढवण बंदर प्रकल्प

केंद्रीय नौकानयन व बंदर मंत्रालयातर्फे डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारणी प्रस्तावित आहे. वाढवण बंदर हे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर, तसेच जगातील सर्वोत्कृष्ट १० बंदर, अशी या बंदाराची रचना आहे. हे बंदर बनवण्यासाठी २२ मीटर खोल समुद्रामध्ये ५ हजार एकराचा भराव करावा लागणार आहे.

बंदर उभारणीस स्थानिकांचा विरोध

वाढवण बंदर उभारणीमुळे वाढवण, वरोर, धाकटी डहाणू, बाडा पोखरणसह अनेक गावे विस्थापित होणार असून स्थानिकांच्या जमिनी देखील घेतल्या जाणार आहेत. वाढवण बंदर हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असून, येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. या बंदराची उभारणी झाल्यास शेती, बागायती, डायमेकर व्यवसाय नामशेष होणार आहे. मच्छीमारी देखील उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. तसेच, ५ हजार एकर समुद्रात भराव टाकला जाणार असल्याने अडणारे पाणी खाड्यांतून गावात जाऊन गावच्या गावे समुद्रात गडप होण्याची भीती इथले नागरिक व्यक्त करत आहेत.

महाकाय बंदराची व्यापकता, नष्ट होणारी बागायती शेती, किनारपट्टीतील लक्षावधी तिवरीची झाडे, समुद्रातील बिजोत्पादन खडकाळ प्रदेश, मोठ्या मालवाहू बोटीच्या वर्दळीमुळे मासेमारी क्षेत्र संपुष्टात येणार असून परिसरातील जैवविविधता व मासेमारीवर मोठा परिणाम होणार आहे. या बंदर उभारणीला स्थानिक ग्रामस्थांचा आणि मच्छिमारांचा तीव्र विरोध आहे.

हेही वाचा - आमची कुस्ती भाजप आणि एमआयएमसोबत - बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

पालघर - केंद्र शासनाने 65 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी गुंतवणूक केल्याने सव्वा लाख लोकांना रोजगार उत्पन्न होत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आणि जमिनीचा चांगला मोबदला मिळणार आहे. त्यामुळे, वाढवण बंदराला विरोध न करता पाठिंबा द्यावा, असे सांगून आपला वाढवण बंदराला पाठिंबा असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. पालघर दौऱ्यावर आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

रिपाईचा वाढवण बंदर उभारणीला पाठिंबा

देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून वाढवण बंदर ओळखले जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 65 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध असून मच्छीमार व्यावसायाला धोका निर्माण होणार असल्याची माझी माहिती आहे. परंतु, माझी सर्वांना नम्र विनंती आहे, की बऱ्याच वर्षानंतर इतका महत्वपूर्ण आणि मोठा प्रकल्प होणार आहे, ज्यामुळे सव्वा लाख लोकांना रोजगार निर्माण होऊन स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत. अनेकांचा यामुळे फायदा होणार असून, दुसरीकडे रस्त्यासाठी 550 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - आमची कुस्ती भाजप आणि एमआयएमसोबत - बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

पत्रकारांनी, अणुऊर्जा प्रकल्पासाठी पोखरण, अक्करपट्टी मधील जमिनी संपादित केलेल्या स्थानिकांना आतापर्यंत किती नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या? काय सुविधा दिल्या? तसेच वाढवण बंदरामुळे समुद्रात 5 हजार एकरावर भराव टाकल्याने तेथील मासेमारीचे क्षेत्र संपुष्टात येणार असल्याने मच्छिमारांसाठी पर्यायी व्यवस्था काय? आदी प्रश्न विचारल्यावर राज्यमंत्री समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. लोकांच्या भावनांचा विचार करणे अवश्यक असल्याचे सांगून आपल्या अडचणी, प्रश्नांबाबत आपण केंद्र सरकारशी बोलू, असे उत्तर त्यांनी दिले.

काय आहे वाढवण बंदर प्रकल्प

केंद्रीय नौकानयन व बंदर मंत्रालयातर्फे डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारणी प्रस्तावित आहे. वाढवण बंदर हे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर, तसेच जगातील सर्वोत्कृष्ट १० बंदर, अशी या बंदाराची रचना आहे. हे बंदर बनवण्यासाठी २२ मीटर खोल समुद्रामध्ये ५ हजार एकराचा भराव करावा लागणार आहे.

बंदर उभारणीस स्थानिकांचा विरोध

वाढवण बंदर उभारणीमुळे वाढवण, वरोर, धाकटी डहाणू, बाडा पोखरणसह अनेक गावे विस्थापित होणार असून स्थानिकांच्या जमिनी देखील घेतल्या जाणार आहेत. वाढवण बंदर हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असून, येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. या बंदराची उभारणी झाल्यास शेती, बागायती, डायमेकर व्यवसाय नामशेष होणार आहे. मच्छीमारी देखील उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. तसेच, ५ हजार एकर समुद्रात भराव टाकला जाणार असल्याने अडणारे पाणी खाड्यांतून गावात जाऊन गावच्या गावे समुद्रात गडप होण्याची भीती इथले नागरिक व्यक्त करत आहेत.

महाकाय बंदराची व्यापकता, नष्ट होणारी बागायती शेती, किनारपट्टीतील लक्षावधी तिवरीची झाडे, समुद्रातील बिजोत्पादन खडकाळ प्रदेश, मोठ्या मालवाहू बोटीच्या वर्दळीमुळे मासेमारी क्षेत्र संपुष्टात येणार असून परिसरातील जैवविविधता व मासेमारीवर मोठा परिणाम होणार आहे. या बंदर उभारणीला स्थानिक ग्रामस्थांचा आणि मच्छिमारांचा तीव्र विरोध आहे.

हेही वाचा - आमची कुस्ती भाजप आणि एमआयएमसोबत - बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.