ETV Bharat / state

नियमित सोसायटी कर्ज भरणे हा गुन्हा आहे का? पालघरमधील शेतकऱ्यांचा सरकारला सवाल - PALGHAR LOAN RELIEF FOR FARMERS

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकरीवर्गाला 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीमुळे थकबाकीदार शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला. मात्र, सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहर्‍यावर सध्या निराशा पसरली आहे.

palghar
पालघरमधील शेतकऱ्यांचा सरकारला सवाल
author img

By

Published : Dec 25, 2019, 9:16 AM IST

पालघर- सरकार कर्जमाफी करून थकीतांना प्रोत्साहन देते. पण दागिने गहाण ठेवून सोसायटी भरणाऱ्या शेतकर्‍यांचे यात काही हित होत नाही. यापुढे अशा कर्जमाफीमुळे सेवा सहकारी सोसायट्या बंद पडतील, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून नियमित कर्जे भरणाऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान द्यावे, असे मत या शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

ठाकरे सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर पालघरमधील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकरीवर्गाला 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीमुळे थकबाकीदार शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला. मात्र, सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहर्‍यावर सध्या निराशा पसरली आहे.

आम्ही काबाडकष्ट करून गावात इभ्रतीचा प्रश्न म्हणून घरातील दागिने मोडून कर्ज भरत असतो. परंतु, सरकार वर्षानुवर्षे कर्ज थकविणाऱ्या शेतकरीवर्गाला कर्जमाफी देते. त्यांना कर्जमाफी जरूर द्यावी. मात्र, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरीवर्गाला सरकारने दिलासा मिळेल अशी काही मदत करावी.

आजवर नियमित शेतकरी कर्जे भरणाऱ्या शेतकरीवर्गाच्या आधारावरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोसायट्या चालतात. थकीतांची जर कर्जमाफी होत असेल तर आम्ही सोसायटीचे कर्ज नियमीत भरणाऱ्या शेतकऱ्यांनी गुन्हा केला आहे का, असा उद्विग्न सवाल शेतकरी या कर्जमाफीवर करीत आहेत. याबाबत सरकार नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याची भूमिका होती. अवकाळी पावसाने होरपळलेल्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, आता प्रत्यक्षात हे दिसत नाही. महापुरात व अवकाळी पावसात शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी भरीव मदत मिळत नाही. मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

कर्जमाफीबाबत नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकरीवर्गाला शासनाने लवकरच प्रोत्साहन अनुदान द्यावे. अन्यथा यापुढे कर्ज भरणार नाही, अशीही भूमिका पालघर जिल्ह्यातील दशरथ हरी पाटील, दामोद पदू पाटील, सदानंद बाबू पाटील, पंढरी रामचंद्र पाटील, सुधाकर जगन पाटील, रवींद्र विठ्ठल पाटील आणि रमेश ठाकरे या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

पालघर- सरकार कर्जमाफी करून थकीतांना प्रोत्साहन देते. पण दागिने गहाण ठेवून सोसायटी भरणाऱ्या शेतकर्‍यांचे यात काही हित होत नाही. यापुढे अशा कर्जमाफीमुळे सेवा सहकारी सोसायट्या बंद पडतील, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून नियमित कर्जे भरणाऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान द्यावे, असे मत या शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

ठाकरे सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर पालघरमधील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकरीवर्गाला 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीमुळे थकबाकीदार शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला. मात्र, सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहर्‍यावर सध्या निराशा पसरली आहे.

आम्ही काबाडकष्ट करून गावात इभ्रतीचा प्रश्न म्हणून घरातील दागिने मोडून कर्ज भरत असतो. परंतु, सरकार वर्षानुवर्षे कर्ज थकविणाऱ्या शेतकरीवर्गाला कर्जमाफी देते. त्यांना कर्जमाफी जरूर द्यावी. मात्र, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरीवर्गाला सरकारने दिलासा मिळेल अशी काही मदत करावी.

आजवर नियमित शेतकरी कर्जे भरणाऱ्या शेतकरीवर्गाच्या आधारावरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोसायट्या चालतात. थकीतांची जर कर्जमाफी होत असेल तर आम्ही सोसायटीचे कर्ज नियमीत भरणाऱ्या शेतकऱ्यांनी गुन्हा केला आहे का, असा उद्विग्न सवाल शेतकरी या कर्जमाफीवर करीत आहेत. याबाबत सरकार नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याची भूमिका होती. अवकाळी पावसाने होरपळलेल्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, आता प्रत्यक्षात हे दिसत नाही. महापुरात व अवकाळी पावसात शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी भरीव मदत मिळत नाही. मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

कर्जमाफीबाबत नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकरीवर्गाला शासनाने लवकरच प्रोत्साहन अनुदान द्यावे. अन्यथा यापुढे कर्ज भरणार नाही, अशीही भूमिका पालघर जिल्ह्यातील दशरथ हरी पाटील, दामोद पदू पाटील, सदानंद बाबू पाटील, पंढरी रामचंद्र पाटील, सुधाकर जगन पाटील, रवींद्र विठ्ठल पाटील आणि रमेश ठाकरे या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Intro:नियमीत सोसायटी कर्जे भरणे हा गुन्हा आहे का?

 नियमीत कर्ज  भरणा-या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान हवे - शेतकरीवर्गाची मागणी


यापुढे सोसायटी कर्जे भरणार नाहीत- शेतकरीवर्गाचा पाविञा


थकबाकीला कर्जमाफीने सोसायटी बंद पडण्याच्या शेतकरीवर्गात भीती ? 


पालघर (वाडा) संतोष पाटील 

राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली माञ ही कर्जमाफी नियमीत भरणा-या शेतकरीवर्गाला फायद्याची नाही.सरकार थकीतांना प्रोत्साहन देते आणि दागिना गहाण ठेवून आणि उसनवारी करून सोसायटी भरणा-या शेतकर्‍यांचे काय? यापुढे अशा कर्जमाफी  पाविञ्याने सेवा सहकारी सोसायट्या बंद पडतील  अशी भीती आणि शेतकरी कर्ज भरणार नाही असा पाविञा पालघर जिल्ह्य़ातील शेतकरीवर्गाकडून होत आहे. नियमीत कर्जे भरणा-यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान द्यावे असे मत या कर्जमाफी  शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.


 राज्य सरकारने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकरीवर्गाला 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या कर्जमाफी वर थकबाकीदार शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला.माञ सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज नियमीत भरणा-या शेतकऱ्यांच्या चेहर्‍यावर  सद्या निराशा पसरली आहे.

आम्ही काबाडकष्ट करून आणि इज्जत नाही जाणार नाही घरातले दागिणे, उसनवारी करून कर्ज नियमीत भरत असतो.आणि सरकार माञ वर्षानुवर्षे थकविणा-या शेतकरीवर्गाला कर्जमाफी  देते.कर्जमाफी त्यांना जरूर करा माञ नियमीत कर्ज भरणा-या शेतकरीवर्गाला सरकारने दिलासा मिळेल अशी काही मदत करावी. 

आजवर नियमीत शेतकरी  कर्जे भरणा-या शेतकरीवर्गाच्या आधारावरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोसायट्या चालतात.ते जर शेतकरी कर्जे भरली नाहीत आणि थकीतांची जर कर्जे माफ केली तर आम्ही सोसायटी कर्जे भरणा-यांनी गुन्हा केलाय काय? हा उद्विग्न सवाल शेतकरी या कर्जमाफीवर करीत आहेत. याबाबत सरकार 

हा अन्याय करीत आहे.

सातबारा कोरा करण्याची भुमिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होती. हेक्टरी  25 हजार रूपये नुकसानभरपाई अशा घोषणा होत्या.माञ आता प्रत्यक्षात हे दिसत नाही.

महापुरात व अवकाळी पावसात शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी भरीव मदत मिळत नाही

मग शेतक-यांनी आत्महत्या करावी का?

असा सवाल शेतकरी करीत आहेत. 

कर्जमाफी बाबत नियमीत कर्ज भरणा-या शेतकरीवर्गाला शासनाने लवकरच प्रोत्साहन अनुदान द्यावे.अन्यथा यापुढे कर्ज भरणार नाहीत असाही पविञ्याची  भुमिका पालघर जिल्ह्य़ातील दशरथ हरी पाटील,दामोद पदू पाटील, सदानंद बाबू पाटील,पंढरी रामचंद्र पाटील, सुधाकर जगन पाटील,रविंद्र विठ्ठल पाटील आणि रमेश ठाकरे या शेतकऱ्यांकडून यावर घेण्याचे मत नोंदवत आहेत.

  


Body:verious byte
farmer



Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.