पालघर - 'क्यार'नंतर आता 'महा' चक्रीवादळाचे संकट राज्यावर घोंगावत आहे. 'महा' चक्रीवादळाच्या भीतीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त मच्छीमारांच्या मासेमारी बोटी पालघर जिल्ह्यातील डहाणू समुद्रकिनारी आश्रयाला आल्या आहेत.
हेही वाचा- उजनी जलाशयातून ढोकरी ते शहा प्रवासी बोट सुरू
अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी-वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत समुद्र खवळलेला असेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेल्या बोटींनी ऐनवेळी डहाणू बंदरात आश्रय घेतला आहे. बोटींतील सर्व खलाशी सुखरूप आहेत.